भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध। Pradushan ek samasya in Marathi

Pradushan ek samasya essay in Marathi :   आजकाल वाढत असलेल्या महानगरातील समस्या पैकी प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. हवा अर्थात वायु प्रदूषणा  नंतर ध्वनी व जल प्रदूषण देखील मोठी समस्या बनल्या आहे. 

म्हणूनच आज आपण प्रदूषण एक समस्या ( pradushan ek samasya Nibandh marathi ) या विषयावर मराठी निबंध प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करूया..  

प्रदूषण एक समस्या निबंध -  Pradushan ek samasya

(150 words)

प्रदूषण हे एक हळू हळू प्रभाव दाखवणारे विष आहे. आणि ते प्रत्येक दिवसागणिक आपल्या जीवनाला नष्ट करीत आहे. प्रदूषण नैसर्गिक वातावरणाला दूषित करून पर्यावरणात अस्थिरता निर्माण करते. प्रदूषणाला मुख्यतः तीन भागात विभाजित केले आहे वायू प्रदूषण, ध्वनि प्रदूषण आणि जल प्रदूषण.

वायुप्रदूषण हे वाहनांमधून निघणारे इंधनाचे धूर, औद्योगिक कारखाने, उडणारी धूळ इत्यादी कारणांमुळे होते. या दूषित वायू ला श्वासाद्वारे आत घेतल्याने हृदय संबंधी रोग निर्माण होतात. 

निसर्गाला हानी पोहोचवणारे दुसरे प्रदूषण ध्वनिप्रदूषण आहे, हे प्रदूषण वाहनांचे हॉर्न, औद्योगिक कारखान्यातील मशीन चे आवाज, लग्न तसेच इतर समारंभातील डीजे इत्यादी अनेक कारणांमुळे होते. अत्याधिक ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा आणि काना संबंधी रोग वाढतात.

जल प्रदूषण ही सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली प्रदूषणाची समस्या आहे. नदी व तलावात कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ व प्लास्टिक कचरा टाकल्याने जल प्रदूषण होते. 

आज प्रदूषण हे अनेक पद्धतीने होत आहे. या प्रदूषणाच्या समस्येला कमी करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत व लोकांना प्रदूषणाने होणाऱ्या समस्यांविषयी जागृत करायला हवे.

प्रदूषण मराठी निबंध (Pradushan Marathi Nibandh)

(300 words)

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. जस-जसे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे तसतसे त्याचे दुष्परिणाम देखील वाढत आहेत. 'प्रदूषण' हा असाच तंत्रज्ञानाच्या एक दुष्परिणाम आहे. आज प्रदूषण एक समस्या   बनलेली   आहे.

आपल्या धरतीवर आज तीन तऱ्हेचे प्रदूषण आहे: जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. विकसनशील देश जसे भारत, थायलँड, पाकिस्तान आणि अन्य अनेक देश प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जात आहेत. नैसर्गिक स्त्रोतांचे योग्य वापर न करणे आणि अधिक तांत्रिक माहिती माहीत नसलेले हे देश आपल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यास असमर्थ आहेत. याचा परिणाम नागरिकांना अशुद्ध पानी प्यायल्याने अनेक रोग होतात आणि हे रोग आरोग्याला धोकादायक ठरतात. म्हणून अशुद्ध पाणी हा प्राणघातक शत्रू आहे.

आज मोठ मोठे शहर वाढते मोटरसायकल, चारचाकी वाहने आणि इतर मोटार वाहनामुळे वायु प्रदूषणाचा सामना करत आहेत. विकसित झालेल्या शहरात औद्योगिकरणाच्या दर हा खूप अधिक असतो. यामुळे निसर्ग आपले संतुलन वाचवण्यात अयशस्वी होतो. कारखान्यांच्या धुराड्यातून निघणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो आणि ऑक्सिजनच्या आभाव झाल्याने श्वासांसंबंधी रोग व्हायला लागतात. बऱ्याचदा हे प्रदूषण अधिक झाल्याने हृदय विकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो.

ध्वनि प्रदूषण हे सुद्धा वायुप्रदूषणा एवढेच घातक आहे. मोठ मोठ्या महानगरात वाहनांचे हॉर्न आणि कारखान्यांमुळे ध्वनि प्रदूषण वाढते. बहिरेपणा, मानसिक गोंधळ आणि मानसिक असंतुलन हे ध्वनी प्रदूषणाचे काही दुष्परिणाम आहेत. आज ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी कडक कायदे तयार करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या आवाजात स्पीकर आणि बँड वाजविण्यावर बंदी आणायला हवी. मनुष्य निसर्गाला विषारी करीत आहे, जर मनुष्य स्वतः वेळीच सावध झाला नाही तर त्याला या प्रदूषणामुळे होणाऱ्या धोक्यापासून कोणीच वाचवू शकत नाही.

प्रदूषण कोणत्याही प्रकारचे असो ते मनुष्य जीवनासाठी धोकादायक तर आहेच पण या सोबत वनस्पती आणि प्राण्यांना ही ते घातक आहे. प्रदूषण मानवजातीसाठी एक समस्या आहे. जोपर्यंत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाने होणाऱ्या या दुष्परिणामांना कमी करण्यासाठी उपाय शोधून घेत नाही तोपर्यंत मानवी जीवन धोक्यात आहे. शासनाने याची दखल घ्यायला हवी आणि पर्यावरणाला वाचवण्यासाठी वृक्ष लागवड, जल शुद्धीकरण, गॅस वर चालणारे चुल्हे इत्यादी उपक्रम राबवायला हवेत. आपल्याला प्रदूषणाशी लढा देऊन त्याला कोणत्याही किमतीवर संपवायचे आहे.

प्रदूषण मराठी निबंध 

(400 words).

आजच्या आधुनिक युगात विज्ञानाच्या प्रगती मुळे मानव जातीला ज्याप्रमाणे काही वरदान मिळाले आहे त्याच पद्धतीने त्याला भौतिक प्रगतीचे काही दुष्परिणाम देखील भोगावे लागत आहेत.

आज पृथ्वीवर वाढत असलेला समस्यांपैकी प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. प्रदूषणाचा अर्थ होतो नैसर्गिक संतुलनात दोष निर्माण होणे. श्वासो श्र्वसासाठी शुद्ध हवा न मिळणे, प्यायला स्वच्छ पाणी न मिळणे, स्वच्छ अन्न न मिळणे आणि शांत वातावरण न उपलब्ध होणे ही प्रदूषणाची काही लक्षणे आहेत.  प्रदूषण मानवजातीसाठी किती हानिकारक आहे हे सर्वानाच माहीत झाले आहे. परंतु हे ज्ञान फक्त पुस्तकापर्यंत सीमित आहे. वास्तविक जीवनात मनुष्य आपली प्रगती आणि सुख सुविधामध्ये वृद्धी करण्यासाठी दिवसेंदिवस प्रदूषण करीत आहे. 

पृथ्वी, पानी, हवा, ध्वनि इत्यादींमध्ये आढळणारे तत्व जर असंतुलित असतील तर याला प्रदूषण म्हटले जाते. मनुष्याद्वारे निर्माण झालेला कचरा व टाकाऊ पदार्थ जे निसर्गात फेकले जातात त्या पदार्थांना 'प्रदूषक' म्हटले जाते. प्रदूषण अनेक प्रकारचे असते. प्रदूषणाच्या काही प्रमुख प्रकरांमध्ये जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यांचा समावेश आहे.

भारतातील मोठमोठ्या महानगरामध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात पसरत आहे. 24 तास चालणारे कारखाने, गाड्या मोटारी इत्यादी मधून निघणारा काळा धूर हे सर्व वायुप्रदूषण वाढवण्याचे कार्य करतात. आजकाल दिल्ली-मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये श्वास घेणे सुद्धा कठीण आहे. मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण वाढल्याने श्वास संबंधी विकार जडतात. वायू प्रदूषण रोखण्यासाठी अधिकाधिक झाडे लावायला हवी. खाजगी वाहनांचा उपयोग कमीत कमी करायला हवा.

वायू प्रदूषण नंतर दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे जल प्रदूषण होय. कारखान्यांमधून निघणारे दूषित पाणी नदीत सोडले जाते हे पाणी प्यायल्याने मनुष्य व प्राण्यांना अनेक रोग जडतात. दूषित पाणी पिल्याने बऱ्याचदा मृत्यू देखील होतात. यामुळे शासन तसेच नागरिकाचे हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आजूबाजूचा नदी व पाण्याचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा, त्यात घाण व कचरा टाकू नये.

जल प्रदूषणा नंतर सर्वात मोठी प्रदूषण समस्या म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. ध्वनी प्रदुषण कारखाने, गाड्या मोटारी, लाऊड स्पीकर इत्यादीच्या आवाजामुळे वाढत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा सारख्या समस्या वाढत आहेत. सतत मोठ्या प्रमाणात कर्कश आवज ऐकल्याने मानसिक तणाव वाढतो. म्हणून ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी कारखाने व नागरिकांनी उच्च दर्जाची मशीने वापरायला हवी. 

वायु, जल व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जाऊ शकतात. जास्तीत जास्त हिरवळ निर्माण करायला हवी, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अधिकाधिक झाडे लावायला हवीत. झाडे लावा झाडे जगवा चा संदेश प्रसारित करायला हवा. कारखान्यांना मनुष्य वस्तीपासून दूर ठेवायला हवे. प्रायव्हेट वाहनाचा वापर कमी प्रमाणात करायला हवा. इत्यादी उपाय जर आपण केलेत तर प्रदूषण सारख्या समस्येला दूर करण्यासाठी खूप मदत होईल.

प्रदूषण हे हळू हळू परिणाम करणारे एक विष आहे. ते हवा, पाणी व धुळीच्या माध्यमाने फक्त मनुष्यच नव्हे तर जीव जंतु, पशू पक्षी, झाडे झुडपे या वनस्पतींना देखील नष्ट करते. वाढत्या प्रदूषणामुळे झाडांच्या तसेच प्राण्यांच्या अनेक प्रजाती विलुप्त झाल्या आहेत. जर वेळीच प्रदूषणावर उपाय शोधले नाहीत तर एक वेळ अशी येईल जेव्हा मनुष्याला चांगले अन्न मिळणार नाही. प्यायला शुद्ध पाणी आणि श्वास घ्यायला हवा मिळणे कठीण होईल. आशा परिस्थिति पासून वाचण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करायला हवे.   

तर मित्रानो हे होते प्रदूषण एक समस्या या विषयावर लिहिलेले काही मराठी निबंध आशा करतो की तुमच्यासाठी Pradushan ek samasya nibandh हे निबंध व प्रदूषण विषयावर pradushan ek samasya in marathi लिहिलेली ही माहिती उपयुक्त ठरली असेल. या माहितीला इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद.

  • ध्वनी प्रदूषण एक समस्या मराठी माहिती
  • वायू प्रदूषण मराठी माहिती 
  • जल प्रदूषण मराठी माहिती 

1 टिप्पण्या

essay in pradushan in marathi

Very nice essay I like it that is very helpful for study

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Nibandh shala

प्रदुषण एक समस्या मराठी निबंध | प्रदुषण वर मराठी निबंध | essay on pollution in marathi

प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi :- प्रदुषण ही आज मनुष्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येमुळे माणूस खूप अडचणीत आला आहे. माणसाने तंत्रज्ञानाचा विकास करून आपले दैनंदिन जीवन सुखी तर केले पण यामुळे त्याचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.

आज प्रदुषण ही एक समस्या बनली आहे. त्यामुळे या विषयावर शालेय विद्यार्थ्यासाठी नक्कीच निबंध लिहिण्यासाठी प्रश्न असतो.

आजच्या या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी प्रदुषण एक समस्या मराठी निबंध किंवा प्रदुषण वर मराठी निबंध essay on pollution in marathi या विषयावर सुंदर निबंध लिहिला आहे. हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे .

प्रदुषण एक समस्या मराठी निबंध | प्रदुषण वर मराठी निबंध | essay on pollution in marathi

Essay on pollution in marathi

प्रदुषण ही निसर्गाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. आज मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा जो र्हास होत आहे त्याला कारणीभूत म्हणजे हे प्रदुषण आहे. अतिशय सुंदर असणारा निसर्ग आज या प्रदुषण रुपी आजाराने जडला आहे. पण प्रदुषण म्हणजे नेमकं काय ?

हवेत, पाण्यात, वातावरणात असे काही घटक स्थिरावतात की ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. पर्यावरणाचे संतुलन बिगडवणाऱ्या सर्व घटकांना प्रदूषके असे म्हटले जाते आणि यापासून च प्रदुषण (essay on pollution in marathi) निर्माण होते. आज घडीला प्रदूषणाची मुख्य तीन प्रकार आहेत ते म्हणजे जल प्रदुषण, ध्वनी प्रदुषण आणि हवा प्रदुषण.

मानवाने विकासाच्या हवसापोटी अनेक संशोधन केले, शोध लावले, नवीन तंत्रज्ञान विकसित केले मात्र त्याचबरोबर निसर्गाचा देखील तेवढाच अपव्यव केला. कारखाने, फॅक्टरी, दवाखाने बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली. रस्त्याकाठची झाडे तोडून रस्ता रुंदीकरण केले, मोठे मोठे राष्ट्रीय महामार्ग बांधले.

त्यामुळे वनांचे प्रमाण कमी झाले. झाडे तोडल्यामुळे पक्ष्यांची, प्राण्यांची निवस्थाने नष्ट झाली. कित्येक पशू पक्षी दुर्मिळ झाले. पूर्वी मोठ्या संख्येने नियमित दिसणारे पशू पक्षी आज क्वचितच पाहायला मिळत आहेत, ते देखील केवळ अभयारण्यात ! आता जंगलेच उरली नाहीत तर बिचारे पशू पक्षी तरी कसे जगतील ?

झाडे तोडल्यामुळे आणि पशू पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने निसर्गाचे चक्र कोलमडले. पूर्वी नियमित पडणारा पाऊस आज क्वचितच पडत आहे. दुष्काळी परिस्थिती उद्भवत आहे. त्सुनामी, चक्री वादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीत वाढ झाली आहे.

झाडे कमी झाली, पावसाचे प्रमाण कमी झाले त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढून ग्लोबल वॉर्मिग सारखी जागतिक समस्या निर्माण झाली आहे.

मानवाने तंत्रज्ञानात खूप प्रगती केली. आज तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक गोष्ट शक्य झाली आहे. जग अगदी जवळ आले आहे. प्रत्येकाचे हातात मोबाईल आहेत हवे तेंव्हा जगातील कोणत्याही व्यक्तीसोबत बोलणे शक्य आहे.

ऑनलाईन शिक्षण पद्धती आली त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या शाळा, महाविद्यालये करणे, ऑनलाईन अभ्यास करणे , हवी ती माहिती मिळवणे शक्य झाले आहे. पण मोबाईल हे विकसित तंत्रज्ञान पशू पक्ष्यांच्या जीवावर उठले आहे. या गोष्टीचा आपण कधी विचारच करत नाहीत.

मोबाईल आणि मोबाईलच्या टॉवर मधून निघणाऱ्या आत्मघाती सिग्णलमळे कित्येक पक्षी त्यांचे आयुष्य संपवत आहेत. याच कारणाने आज पक्ष्यांची संख्या झपाट्याने घसरत आहे. पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत. हे असेच चालू राहिले तर एकदिवस सर्व पशू पक्षी नष्ट होतील.

आज ज्याप्रमाणे आपण डायनासोर ची चित्रे पाहून कल्पना करतो की पूर्वीच्या काळी अश्या प्रकारचा डायनासोर नावाचा एक प्राणी अस्तित्वात होता. त्याचप्रमाणे जर पक्षीच उरले नाहीत तर येणाऱ्या पिढीला पक्षी केवळ चित्रात पाहायला मिळतील. भविष्यात खूपच भयावह परिस्थिती ओढवू शकते.

मानवाने दळणवळणाच्या पद्धतीमध्ये देखील खूप विकास केला. बैलगाडी, घोडागाडी यासारखी पूर्वीची दळणवळणाची साधने संपुष्टात येऊन त्यांची जागा आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युक्त वाहनांनी घेतली आहे. यामुळे दळणवळण नक्कीच सोयीचे आणि सुलभ झाले आहे. आज या तंत्रज्ञानामुळे जगाला वळसा घालने देखील शक्य आहे.

पण आज याच दळणवळणाच्या साधनांमुळे कित्येक समस्या देखील निर्माण केल्या आहेत. मोटारसायकल, कार, चारचाकी वाहने यामध्ये डिझेल, पेट्रोल यासारख्या इंधनाचा वापर केला जातो. ही इंधने ज्वलणातून कार्बन डायऑक्साइड (CO२), कार्बन मोनॉक्साईड (CO) यासारखी विषारी आणि घातक वायू बाहेर सोडतात.

त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढून उष्माघाताचा समस्या निर्माण होतात. याच कारणामुळे तपांबर आणि स्थितांबर यासारख्या पृथ्वीच्या आवरणात आढळणारा ओझोन चा थर पातळ होत आहे.

त्यामुळेच सर्याकडून येणारी अतिनील किरणे सरळ पृथ्वीवर पडत आहेत. त्यामुळे अनेक सजीवांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय यामुळे सजीवांना त्वचेचे रोग देखील होत आहेत. आम्ल पर्जन्य ही देखील यातूनच उद्भवणारी एक समस्या आहे.

प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi (भाग २)

Essay on pollution in marathi

जल प्रदुषण ही देखील आज घडीला उपस्थित सर्वात भयानक समस्या आहे. यामुळे पृथ्वीवरील पिण्याच्या पाण्याचे प्रमाण कमी तर झालेच आहे शिवाय जे पाणी उपलब्ध आहे ते देखील पिण्यायोग्य राहिले नाही.

मानवाने स्वताच्या विकासापोठी निसर्गाची पर्वा केली नाही. शहरातील सांड पाणी, कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी द्रव्य, शहरातील घाण सर्रास नदीत, तलावात सोडून दिली. त्यामुळे जलिय प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले. आज पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे टायफॉइड, कॉलरा यासारखे विविध आजार निर्माण झाले. आज घडीला जल प्रदुषण ही मानवासमोरील सर्वात मोठी समस्या आहे.

शिवाय गाड्यांच्या हॉर्न चा आवाज , कारखान्यातून निर्माण होणारा कर्कश आवाज यापासून निर्माण होणारे ध्वनी प्रदुषण (essay on pollution in marathi) ही देखील सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी समस्या अस्तित्वात आहेच की !

मानवाने खूप विकास केला, माणूस चंद्रावर, मंगळावर पोहचला. पण मानवाने निसर्गाचा विचार करायला हवा होता. तो जशी स्वतःची काळजी घेतो तसेच त्याने निसर्गाला देखील जपायला हवे होते. निसर्गातील साधन संपत्तीचा जपून वापर करायला हवा होता. नाहीतर आज या प्रदूषणामुळे समस्या निर्माण झाल्याचं नसत्या !

मानव आजही परिस्थिती बदलवू शकतो, झालेल्या चुका सुधारू शकतो. झाडे लावून, पशू पक्ष्यांचे संगोपन करून निसर्गाचा समतोल राखू शकतो. पण विकासाच्या मटक्यात आडकलेला मनुष्य या गोष्टी लक्षात घेईल का ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

पण जर निसर्गाचा समतोल राहिला नाही तर भविष्यात पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वाला नक्कीच धोका आहे, हे देखील माणसाने लक्ष्यात ठेवायला हवे !

मला शेवटी येवढेच म्हणावेसे वाटते –

काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे !

टीप : विद्यार्थि मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यासाठी खूप उपयुक्त आहे.

तुम्हाला प्रदुषण वर निबंध essay on pollution in marathi हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच इतर कोणत्या विषयावर तुम्हाला निबंध लिहून हवा असेल तर ते ही कमेंट करून सांगा, धन्यवाद…!

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi

Pradushan Ek Samasya Essay in Marathi : मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक समस्या पाहायला मिळतात. जागतिक तापमानवाढ, लोकसंख्या वाढ आणि प्रदूषण.

प्रदूषण ही समस्या अलीकडच्या काळामध्ये खूप झपाट्याने वाढत आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये तर प्रदूषणाची समस्याही खूपच गंभीर रूप धारण केली आहे. प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार पडतात. हवा म्हणजेच वायुप्रदूषण त्यानंतर ध्वनि प्रदूषण आणि जल प्रदूषण यांसारख्या प्रदूषणाच्या गंभीर समस्या बनल्या आहेत.

म्हणून आजच्या या लेखाच्या माध्यमातून Pradushan Ek Samasya Essay in Marathi प्रदूषण एक समस्या मराठी निबंध या विषयावर निबंध शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच परीक्षेमध्ये किंवा शाळेमध्ये प्रदूषणावर निबंध विचारले जातात. त्या लेखामध्ये दिलेला प्रदूषण एक समस्या मराठी निबंध प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi (250 words)

प्रदूषण ही एक अशी समस्या आहे ज्याचा प्रभाव आपल्याला हळूहळू पर्यंत सोबत तीव्र स्वरूपाचा जाणवतो. प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि गंभीर रूप धारण करत आहे. प्रदूषणाचा परिणाम पृथ्वीवर राहणाऱ्या संख्या सजीवसृष्टीला होत आहे.

प्रदूषण म्हणजे हवेमध्ये, पाण्यामध्ये, ध्वनी मध्ये अतिरिक्त पदार्थाचं भर होणे याला प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण नैसर्गिक वातावरणामध्ये दूषित पदार्थाची भर घालून वातावरणात दूषित करते. प्रदूषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात, वायु प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हे प्रदूषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

वातावरणामध्ये वायुप्रदूषण हे वाहनातून निघणारा धूर, इंधन जाळल्याने त्यातून निघणारा धूर, कारखान्यातून निघणारा धूर, वाऱ्यामुळे उडणार्या धुली कणांन मुळे होत असते. वायु प्रदूषणामुळे संपूर्ण वातावरण दूषित होते मनुष्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतो वायू प्रदूषणाचा परिणाम इतर सजीवांवर की पहायला मिळतो.

दुसरे प्रदूषण म्हणजे जल प्रदूषण होय. जलप्रदूषण हीदेखील खूप झपाट्याने वाढणारी प्रदूषणाचे एक समस्या आहे. जल म्हणजे पाणी आणि प्रदूषण म्हणजे दूषित होणै म्हणजे जलप्रदूषण याचा अर्थ असा होतो की पाणी दूषित होऊन. जेव्हा पाण्यामध्ये विषारी घटक मिसळतात तेव्हा जलप्रदूषण होते. कारखान्यातून नदी, नाला आणि तलाव मध्ये सोडणारे विषारी घटक, पाण्यामध्ये सोडणारा प्लास्टिक कचरा या सर्वामुळे जल प्रदूषण होते.

तिसरे मुख्य प्रदूषण म्हणजे ध्वनिप्रदूषण होय. ध्वनी प्रदूषण वाहनांचे हॉर्न, औद्योगिक कारखान्यातील मशीन चे आवाज, लग्न तसेच इतर समारंभातील डीजे इत्यादी अनेक कारणांमुळे होते. अत्याधिक ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा आणि काना संबंधी रोग वाढतात.

प्रदूषण हे अनेक पद्धतीने होत असले तरी देखील आपल्याला रोखण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. प्रदूषणामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आलेली आहे त्यामुळे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज आहे.

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi (500 word)

मित्रांनो आजच्या युगाला विज्ञानाचे युग म्हटले जाते बरोबर विज्ञानाच्या जोरावर प्रत्येक देश आपापली प्रगती साधून घेतात परंतु विज्ञानामुळे जेवढी प्रगती होत आहे तेवढेच त्याचे दुष्परिणाम देखील आहे. प्रदूषण ही समस्या देखील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तर काही प्रमाणात वाढलेली दिसत आहे.

प्रदूषण एक समस्या आहे जी दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे पृथ्वीवर तीन प्रकारचे प्रदूषण पाहायला मिळते, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या तिने प्रदूषणामुळे आपले संपुर्ण वातावरण दूषित होत चालले आहे श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा मिळेना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेना आणि कानावर येणारा कर्कश आवाजामुळे कानाच्या संबंधित गंभीर समस्या उद्भवत आहे.

विकसनशील देशांना प्रदूषणाच्या समस्या मुळे गंभीर नुकसान होत आहे. भारत, थायलंड, पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये प्रदूषणाची समस्या अधिक मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून मोठमोठे उद्योगधंदे उभारले जात आहेत जंगले तोडून त्या ठिकाणी इमारती कारखाने उभारले जात आहेत परंतु याचा परिणाम प्रदूषणामध्ये दिसून येत आहे प्रदूषणामुळे स्वच्छ पाणी प्यायला मिळत नसल्याने अनेक रोगाला आमंत्रण मिळत आहे.

आजच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या शहरांचा आणि महानगर यांचा विस्तार खूप झपाट्याने होत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात वापरली जाणारी वाहने मोटारसायकल, बसेस, रिक्षा यामुळे वायू प्रदूषणाचा सामना करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. उडता विकसित झालेल्या शहर आणि महानगरांमध्ये औद्योगीकरणाची झपाट्याने वाढ झालेली आहे. आणि याचा परिणाम आपल्या संपूर्ण निसर्ग असंतुलित झाले आहे. कारखान्यांच्या धुराड्यातून रुग्णाला कार्बन डाय-ऑक्साइड वायू वातावरणातील ऑक्सिजन वायूचे प्रमाण कमी करतो त्यामुळे माणसाला श्वास घेताना त्रास होत आहे यातून श्वसनाचे आजार यांसारखे गंभीर आजारांची संभावना आधीकच वाढली आहे. बऱ्याचदा दूषित दहाव्या मध्ये श्वास घेतल्यास हृदयाचे झटके देखील येण्याची संभावना आहे.

ध्वनी प्रदूषण हे देखील जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण या प्रमाणेच घातक ठरत आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये वाहनांचे हॉर्न, कारखान्यांचे भोंगे, सण-समारंभ वाजवले जाणारे ताशा, डीजे , कर्कश आवाज इत्यादी सर्व कारणांमुळे ध्वनी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. आपल्या कानाला आवश्यकतेपेक्षा जास्त आवाज पडल्यास बहिरेपणा आणि कानाच्या संबंधित इतर आजार उद्भवत आहेत त्यामुळे ध्वनी प्रदूषण देखील मानवी आरोग्यासाठी खूप घातक, हानिकारक आहे.

प्रदूषण हे कोणत्याही प्रकारचे असो परंतु त्याचा परिणाम हा संपूर्ण सजीवसृष्टीला बघायचा आहे त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे प्रदूषण रोखण्यासाठी आपण वृक्षतोड थांबवली पाहिजे, वृक्षारोपण मोठ्याप्रमाणात केले पाहिजे तसेच खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात करायला हवा आवश्यकतेपेक्षा जास्त मोठा आवाज कोठेही ऐकायला येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. शासनाने देखील प्रदूषणाची समस्या कमी व्हावेत यासाठी उपाययोजना करत आहे परंतु प्रदूषण कमी करायची ही जबाबदारी शासनाची नसून प्रत्येक व्यक्तीची आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जर प्रदूषणाला थांबविण्यासाठी उपाययोजना करू लागला तर प्रदूषणाची समस्या नक्कीच एक दिवशी संपेल.

अशा प्रकारे योग्य त्या उपाययोजना केल्यास नक्कीच प्रदूषणाची समस्या कमी होऊ शकते.

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi (1,000 words)

आजच्या डिजिटल जगाला विज्ञाना कडून बरेच काही वरदान मिळाले आहेत वरदाना सोबत शापही मिळाले आहे यामध्ये प्रदूषण देखील सामील आहे. प्रदूषण ही एक अशी समस्या आहे जी अलीकडच्या काळामध्ये वारंवार वाढत चालली आहे आणि याचे परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीला भोगावे लागत आहेत.

आज पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात जसे की जागतिक तापमान वाढ, लोकसंख्या वाढ, कमी पर्जन्यमान परंतु या सर्व समस्यांमध्ये प्रदूषण ही एक अशी समस्या आहे ज्या समस्येमुळे बाकीच्या सर्व समस्या उद्भवल्या आहेत. प्रदूषण हे मुख्य कारण आहे ज्यामुळे आपल्या आसपास

तापमान वाढ , आणि कमी पर्जन्यमान या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला प्रदूषणाच्या समस्या ला आळा घालणे खूप आवशक्य आहे.

प्रदूषण म्हणजे काय?

प्रदूषण म्हणजेच नैसर्गिक संतुलन ना मध्ये दोष देऊन संपूर्ण निसर्ग असंतुलित होणे म्हणजेच प्रदूषण. प्रदूषणामुळे आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आजार उत्पन्न होत चाललेले आहे त्यामुळे प्रदूषण एक समस्या खूप गंभीर रूप धारण करत आहे.

प्रदूषणाचे प्रकार :

प्रदूषण हे वेगवेगळ्या प्रकारचे असते जसे की जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि भूमी प्रदूषण.

1. जल प्रदूषण ( Water Pollution ) :

जल म्हणजे पाणी आणि प्रदूषण म्हणजे दूषित होणे, म्हणजे पाणी दूषित होणे याला जलप्रदूषण असे म्हणतात. पाण्यामध्ये विषारी पदार्थ मिसळणे त्यामुळे पाणी दूषित होते. अलीकडच्या काळामध्ये वाढलेले औद्योगिकरणामुळे जल प्रदूषणाचे समस्या वाढलेली आहेत औद्योगीकरण मधून निघणारे विषारी पाणी हे जसेच्या तसे नदी, नाले आणि तलावांमध्ये सोडले जाते ज्यामुळे जलप्रदूषण होते. जल प्रदूषणाचा परिणाम हा मनुष्यावर होतो सोबत पाण्यामध्ये राहणार्‍या सजीवांवर देखील होतो. दूषित झालेले पाणी आपण पिल्यास आपल्याला गंभीर समस्या होऊ शकतात जसे की अतिसार, जुलाब ,पोट दुखी.

2. वायू प्रदूषण ( Air Pollution ) :

वायु म्हणजे हवा आणि प्रदूषण म्हणजे दूषित होणे, म्हणजे हवा दूषित होणे याला वायुप्रदूषण असे म्हटले जाते. हावे मध्ये विषारी वायू मिसळल्याने वायू प्रदूषण होते. वायू प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या जाणाऱ्या वाहनांची संख्या वाहनांमधून निघणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईड वायू हा वातावरणामध्ये मिसळला जातो. त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढते. ही हवा आपण श्वसनावाटे शरीरामध्ये घेतल्यास आपल्याला श्‍वसनाचे आजार आणि हृदयाचे आजार होण्याची शक्यता आहे.

3. ध्वनि प्रदूषण ( Sound Pollution ) :

ध्वनी प्रदूषण हे देखील आजच्या काळामध्ये वाढत चाललेली प्रदूषणाची एक समस्या आहे. ध्वनी प्रदूषणाची समस्या मुख्य स्वरूपात मोठ्या शहरांमध्ये आणि महाराजांमध्ये पाहायला मिळतात वाहनांचे हॉर्न, कारखान्याचे भोंगे, लग्न समारंभामध्ये वाजवले जाणारे डीजे, आणि कर्कश आवाज यामुळे ध्वनी प्रदूषणाची समस्या उद्भवते ध्वनी प्रदूषणाच्या समस्या याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो. कानावर पडल्यास बहिरेपणा आणि कानाच्या संबंधित अनेक समस्या उद्भवतात.

4. भूमी प्रदूषण ( Land Pollution ) :

भूमी म्हणजे जमीन आणि प्रदूषण म्हणजे दूषित होणे, म्हणजेच जमीन दूषित होणे याला भूमी प्रदूषण असे म्हणतात.

आजच्या काळामध्ये विज्ञानाने केलेल्या प्रगतीचे बरेच दुष्परिणाम हे देखील आहेत त्यामध्ये प्रदूषणाचा सामावेश आहे. वेग वेगळी कीटकनाशके आणि रसायने जमिनीवर वापरल्यास जमीन नापीक होते. परिणामी भूमी प्रदूषण होते.

प्रदूषणाची कारणे :

प्रदूषणाच्या या विकट समस्येचे मूळ म्हणजे औद्योगिक क्रांती आणि वाढती लोकसंख्या. गिरणी, कारखाने आणि वाहनांमधून निघणारा धूर वातावरणाला दुषित बनवत आहे. गॅस प्लांटमधून होणार्‍या गॅस गळतीच्या दुर्घटनांमुळे वातावरण भयंकर दुषित बनत आहे. रासायनिक कचरा, औद्योगिक वसाहतींमधून निघणारा कचरा आणि गटारींचे पाणी नद्या, तलाव आणि समुद्रांच्या पाण्याला दुषित बनवत आहेत. ट्रेन, विमान, मोटर, रेडिओ, दूरदर्शन आणि लाऊड ​​स्पीकर्समधून निघणारे ध्वनी ध्वनीप्रदूषण वाढवित आहेत. फटाके आणि बॉम्ब हे ध्वनी प्रदूषण वाढविण्यास हातभार लावत आहेत. शहरांमधील घाण वस्ती, यांत्रिकीकरणाची वाढती प्रवृत्ती आणि, जंगले आणि झाडे यांचा नाश ही प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत.

प्रदूषणाचे परिणाम :

प्रत्येक प्रदूषणाचा दुष्परिणाम हा वेगवेगळ्या जरी असला तरी त्याचे परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीला चे भोगावे लागणार आहेत.

प्रत्येक प्रकारचे प्रदूषण हे पृथ्वीवरील जीवनाचे शत्रू आहेत. वायू प्रदूषणामुळे वातावरणात कार्बन-डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. यामुळे, पृथ्वीच्या वातावरणावरील महत्वाचा घटक ओझोन वायुवरही तीव्र परिणाम होत आहे. पृथ्वीच्या अनियमित तापमानामुळे ऋतूंचा बदल देखील विचलित होत आहे. हवा आणि पाण्याच्या प्रदूषणामुळे विविध प्रकारचे प्राणघातक रोग पसरत आहेत. शेती नष्ट होत आहे. पृथ्वीची सुपीकता कमी होत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे माणूस बहिरापणा, निद्रानाश, रक्तदाब आणि मानसिक रोगांना बळी पडत आहे.

प्रदूषण कमी करण्याचे उपाय :

प्रदूषण एक समस्या पासून मानवजातीला वाचवायचे असेल तर प्रदूषण कमी करण्याचे उपाय करणे खूपच आवश्यक आहे. प्रदूषणापासून पूर्णपणे मुक्त होणे शक्य नाही, परंतु ते कमी केले जाऊ शकते. यासाठी लोकांमध्ये जनजागृती करावी लागेल. वृक्षतोड थांबवावी लागेल आणि वृक्ष लागवडीला प्रोत्साहन द्यावे लागेल. जर आपण हुशारीने काम केले तर आम्ही लोकसंख्येचा वाढीचा दर कमी करू शकतो आणि उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवू शकतो, त्यामुळे आपण प्रदूषणाच्या समस्येवर बर्‍याच अंशी विजय प्राप्त करू शकू.

या पृथ्वीतलावर संपूर्ण मानव जातीला सुखी समाधानी जीवन जगायचे असेल तर प्रदूषणा सारखा समस्येला आळा घालणे खूप आवशक्य आहे.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण  ” प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi “  तुम्हाला कस वाटलं हे नक्की  Comment  द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

  • वृक्षाचे महत्व मराठी निबंध । Vruksha Che Mahatva in Marathi
  • विज्ञान वर निबंध मराठी । Essay on Science in Marathi
  • Sampurn Haripath in Marathi । संपूर्ण हरिपाठ मराठी मधून । हरिपाठ संपूर्ण मराठी
  • माणूस हसणे विसरला तर…..? । Manus Hasne Visarla Tar Nibandh Marathi
  • लाला लाजपत राय यांची माहिती मराठी । Lala Lajpat Rai information in Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

“पर्यावरण रक्षण…काळाची गरज”

Pradushan Nibandh in Marathi

आज पर्यावरण प्रदूषणाची समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नसून ही समस्या संपूर्ण विश्वाला भेडसावते आहे. आज प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना प्रदूषणाचे विविध प्रकार, प्रदूषणाची कारण, त्यावरचे उपाय याविषयी अवगत करायला हवे.

आज आपण रहातो त्या जगाची सर्वात मोठी समस्या प्रदूषण ही झाली आहे. आपल्या आसपास जे घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यातून हे प्रदूषण जन्मास येते. या प्रदूषणाच्या विळख्यात केवळ मनुष्य प्राणी अडकलाय असे नव्हे तर समस्त जीवजंतू आणि अवघी जीवसृष्टी याच्या दुष्परिणामांचा सामना करते आहे.

गेल्या काही दशकांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण इतके वाढले आहे की मानवी जीवनच संकटात सापडले आहे. या समस्येवर गांभीर्याने विचार केला गेला नाही तर तो दिवस दूर नाही जेंव्हा दररोज प्रदूषणामुळे कुणा न कुणाचा मृत्यू होईल आणि एक दिवस या जगाचे अस्तित्वच नामशेष होईल.

“या मित्रांनो प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधूया…प्रदूषणाला हद्दपार करूया” – Essay on Environmental Pollution in Marathi

Essay on Pollution in Marathi

प्रदूषण म्हणजे काय? – Definition of Pollution

जेंव्हा दुषित तत्व प्रकृतीच्या परिघात प्रवेश करतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात, त्यामुळे नैसर्गिक संतुलन पूर्णतः बिघडून मनुष्याला शुद्ध वायू, शुद्ध पाणी आणि शांत वातावरण मिळत नाही तेंव्हा त्याला प्रदूषण असं म्हंटलं जातं.

या प्रदुषणामुळे अनेक गंभीर समस्या जन्म घेतात. याचा दुष्परिणाम केवळ आपल्या दैनंदिन जीवनावरच होतो असे नव्हे तर अनेक गंभीर आजार प्रदुषणामुळे निर्माण होतात. ग्लोबल वार्मिंग सारखी समस्या यातूनच निर्माण झाली आहे. आज मनुष्य आपल्या सुखासीन जीवना करता अनेक आरामदायक, सुखसुविधा  देणाऱ्या उपकरणांचा वापर करतो आहे, परंतु त्यामुळे निसर्गाचे संतुलन ढासळते आहे आणि प्रदूषण आपल्या चरमसिमे पर्यंत पोहोचले आहे.

आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मनुष्य या उपकरणांच्या सुखसुविधेत गुरफटला गेला आहे. त्याला या क्षणिक सुख देणाऱ्या उपकरणांची इतकी सवय झाली आहे की याच्याशिवाय तो आपल्या आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही.

परंतु या मानव निर्मित उपकरणांमुळे निसर्गाची अपरिमित हानी होत असून प्रदूषणाची समस्या निरंतर वाढते आहे. त्यामुळे आज या प्रदूषणाच्या समस्येवर अंकुश निर्माण करण्याची आणि समाजाचे लक्ष याकडे केंद्रित करण्याची नितांत आवश्यकता आहे.

स्वच्छ शुद्ध वातावरणात राहिल्याने केवळ मनुष्याचा विकास होतो असे नव्हे तर स्वस्थ समाजाची देखील निर्मिती होते. शुद्ध वातावरण म्हणजे-प्रदूषण रहित वातावरण होय!

आपण सर्वजण मिळून जोवर वातावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत केवळ अस्वच्छता आणि प्रदूषण पसरत राहील. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी याचे दुष्परिणाम आणि त्यापासून वाचण्याचे उपाय याविषयी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तेंव्हाच या प्रदूषणाच्या समस्येवर आळा बसू शकेल.

खरंतर आपण काहीही विचार न करता आपल्या प्राकृतिक साधन संपत्तीचे हनन करत असतो, त्यामुळे प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्याला आपले ज्ञान वाढवावयास हवे आणि विचारांची व्याप्ती वाढवायला हवी. विविध प्रकारचे प्रदूषण, त्याची कारणं आणि मानवी जीवनावर आणि निसर्गावर त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

प्रदूषणाचे प्रमुख प्रकार – Types of Pollution in Marathi

  • वायू प्रदूषण – Air Pollution
  • जल प्रदूषण – Water Pollution

ध्वनी प्रदूषण – Sound Pollution (Noise pollution)

  • रेडीयोधर्मी प्रदूषण – Radioactive Pollution
  • रासायनिक प्रदूषण – Chemical Pollution
  • प्रकाश प्रदूषण – Light Pollution
  • दृश्य प्रदूषण – Visual pollution
  • थर्मल प्रदूषण – Thermal Pollution

काही प्रमुख प्रदुषणाबद्दल आपण विस्तृत माहिती घेऊया – Main types of Pollution

वायू प्रदूषण – air pollution.

आज पूर्ण पृथ्वीवर वायू प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वायू प्रदुषणामुळे मानवाला शुद्ध हवा मिळत नाही आणि परिणामी दमा, अस्थमा, सारख्या श्वसना संबंधित अनेक आजारांचा त्याला सामना करावा लागतो. वास्तविक जेंव्हा आपल्या वायुमंडलात जैविक, रासायनिक, सूक्ष्म असे अनेक तऱ्हेचे विषारी पदार्थ प्रवेश करतात तेंव्हा त्याला वायू प्रदूषण असं म्हंटल्या  जातं.

या दुषित तत्वांमुळे वायू दुषित होतो, आपल्या वायुमंडलात एका निश्चित मात्रेत अनेक गैस असतात पण जेंव्हा दुषित तत्व या वायुमंडलात प्रवेश करतात तेंव्हा या गैसचे संतुलन बिघडते, आणि त्यामुळे वायूप्रदूषण होण्यास सुरुवात होते.  वाढते औद्योगिकीकरण, अनियंत्रित लोकसंख्या, कमी होत जाणारे जंगल आणि वाहनांचा अत्याधिक वापर यामुळे वायुप्रदूषणाची समस्या  सतत वाढते आहे.

जल प्रदूषण – Water pollution

जल प्रदुषणामुळे केवळ मानवी जीवनच नव्हे तर सागरी जीव-जंतू आणि असंख्य वनस्पती देखील प्रभावित झाल्या आहेत. ज्यावेळी नैसर्गिक जल-स्त्रोतांमध्ये विविध प्रकारचे दुषित पदार्थ मिसळले जातात तेंव्हा जल प्रदुषणाची समस्या उग्र रूप धारण करते.

मोठमोठ्या उद्योगक्षेत्रांमधून निघणारा कचरा, रसायन जलस्त्रोतांमध्ये फेकण्यात येतो तेंव्हा पूर्ण पाणी विषारी होऊन जाते. अनेक सागरी जीवजंतू त्यामुळे मृत्युमुखी पडतात. या दुषित पाण्याच्या सेवनाने मनुष्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. जल प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. या समस्येवर गंभीर प्रयत्नांची खूप आवश्यकता आहे.

मोठ्या आवाजाने होणाऱ्या प्रदूषणाला ध्वनी प्रदूषण म्हंटल्या जातं. वाहने, यंत्र, रेडियो, डीजे, लाउडस्पीकर, टेलीविजन सारख्या असंख्य उपकरणांमधून ध्वनी प्रदूषण होते.या ध्वनी प्रदूषणामुळे माणसाची ऐकण्याची क्षमता कमी होते.

कित्येकदा या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा, हार्ट अटैक, तणाव, यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत असतात. याविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. तेंव्हाच या समस्येचे निराकरण होऊ शकते.

निष्कर्ष – Conclusion 

  • कोणत्याही प्रकारचे प्रदूषण असो, ते हानिकारकच असते. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्येवर चिंतन करण्याची आवश्यकता आहे आणि हे तेंव्हाच संभव होईल जेंव्हा संपूर्ण समाज एकजुटीने पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करेल आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपल्या पृथ्वीला हिरवीगार करेल.
  • वाहनांचा वापर शक्य तितक्या कमी प्रमाणात करणे देखील आवश्यक आहे.
  • मोठमोठे उद्योग कारखाने शहराच्या जवळ सुरु न करता शहरा बाहेर उभारले जावे जेणे करून नगर वासियांना प्रदूषणाच्या समस्येला कमी प्रमाणात तोंड द्यावे लागेल.
  • आपल्या परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून ते वृक्ष मोठे होईपर्यंत त्याची काळजी घ्या.
  • कचऱ्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावणे देखील फार गरजेचे आहे.
  • कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळण्यास शेतकरी बांधवाना प्रोत्साहीत करा.
  • पर्यावरणाला स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा.
  • मोठमोठ्या उद्योगांकरता कठोर नियम (पर्यावरणाला अनुसरून) बनवावे.

प्रदूषण ही आजच्या युगाची सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. पिण्याचे जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. प्रदूषणाच्या समस्येवर वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही तर येणाऱ्या काळात फार मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल.

त्यामुळे वेळ असता सजग सावध होऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करून लोकांना एकत्र करून जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रोत्साहीत करा. वातावरण स्वच्छ ठेवा, आपल्या पृथ्वीला निरामय करा!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Holi Essay in Marathi

“होळी” या सणावर निबंध

  Essay on Holi in Marathi होळीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या दिवशी होळीचे दहन केले जाते. होळीच्या...

Essay on Cricket in Marathi

माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध

Essay on Cricket in Marathi Essay on Cricket in Marathi माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध - Essay on Cricket in...

Majhi Shala Nibandh Marathi

“माझी शाळा” मराठी निबंध

Majhi Shala Nibandh in Marathi प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेच वेगळच महत्व असते. ती शाळा ज्यामध्ये लहानपणी न जाण्यासाठी रडायचं आणि मोठ...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

All In One Marathi Blog

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध-min

(Essay) प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | pradushan ek samasya essay in marathi | Pollution Essay in Marathi

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध   : आज इथे आम्ही प्रदूषण एक समस्या विषयावर मराठी निबंध लिहित आहोत .हा निबंध १००, २००, ३०० तसेच ४०० शब्दांत लिहिलेला आहे. हा निबंध इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक असू शकतो .

मी सादर करीत असलेला  निबंध  हा पुढील सर्व विषयांसाठी चालणारा असेल. म्हणजे जर तुम्हाला शाळेतून पुढीलपैकी कोणताही विषय दिल्यास तुम्ही खाली दिलेल्या निबंधाचा उपयोग करू शकतात.

प्रदूषण एक समस्या मराठी निबंधांचे सर्व शीर्षक ज्यांसाठी हा निबंध अनुकूल असेल

  • प्रदूषण निबंध मराठी
  • प्रदूषण एक गंभीर समस्या मराठी प्रकल्प
  • प्रदूषण एक समस्या मराठी निबंध in short
  • प्रदूषण एक गंभीर समस्या in Marathi
  • Pollution Essay in Marathi

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

मित्रांनो जसे जसे जग प्रगती करत आहे, त्यामुळे खूप फायदे सुद्धा होत आहे आणि काही नुकसान सुध्दा, आणि त्यातील सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे प्रदूषण..

वाढत्या औद्योयोगिक क्षेत्रातील प्रगती हि आणि लोकांचा हलगर्जी पण प्रदूषणाची प्रमुख करणे बनत आहे

विज्ञानाच्या या युगात, जेथे मानवांना काही वरदान मिळाले आहे, तेथे काही शापही मिळाले आहे. आणि त्यातला प्रदूषण हा शाप आहे जो विज्ञानाच्या गर्भातून जन्माला आला आहे आणि बहुतेक लोकांना याला सहन करने भाग पडत आहे .

जगातील सर्वात गंभीर समस्या म्हणजे “प्रदूषण”.हि झाली आहे, भारतातील प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज, भारत आणि बर्‍याच देशांमध्ये हवा, पाणी आणि माती यांचे प्रदूषण वाढत आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात रस्ते तयार झाल्यामुळे नियमितपणे झाडे तोडली जात आहेत, आणि त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे,

मोठं मोठं कंपन्या मधून दूषित पाणी समुद्रात सोडले जाते आणि नदी नाल्यांमधील दूषित पाणी या मुढे जल प्रदूषण वाढत आह.

तसेच गाड्या, लाऊड स्पिकर्स, वाहनांचे हॉर्न अश्या इतर कारणांमुळे ध्वनी प्रदर्शन देखील झपाट्याने वाढत आहे

2019 ची एक घटना आहे जेव्हा दीवाळी मध्ये के काही दिवस नंतर राजधानी दिल्ली मध्ये पॉल्यूशन हॉलीडे झाला, आणि या मुले शाळा विद्यालय बंद करण्यात आले,

delhi schools to remain closed -

किती दुःखाची गोष्ट आहे कि प्रदूषणामुळे आपल्या देशात अशी परिस्थिती सुद्धा होते

प्रदूषणामुळे मानवी अस्तित्व वाला मोठा धोका आहे.

दूषित हवेमध्ये श्वास घेतल्यामुळे, फुफ्फुसांचे आजार वाढतात, डोळे खराब होतात.

रहदारीच्या आणि यंत्रांच्या ध्वनी प्रदूषणामुळे ध्वनी प्रदूषण पसरतो आणि ध्वनी प्रदूषण होते . ज्यामुळे कान बहरे होतात. अशा प्रकारे माणूस बर्‍याच मानसिक आणि शारिरीक आजारांमुळे बळी पडत आहे.

यावर उपाय म्हणून विविध प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावावीत, रस्त्यांच्या कडेला दाट झाडे असावीत. लोकसंख्या असलेले क्षेत्र मोकळे, हवेशीर, हिरव्यागार भागासह संरक्षित असावे. कारखान्यांना लोकसंख्येपासून दूर ठेवले पाहिजे आणि त्यांच्यापासून प्रदूषित निघणाऱ्या पाणी किंवा इतर सामग्री ​​नष्ट करण्याच्या मार्गांचा विचार केला पाहिजे.

मित्रानो आता आपण पाहूया प्रदूषणाचे प्रकार आणि त्यावर उपाय

प्रदूषणाचे प्रकार मराठी :

प्रदूषणाचे मुखतः ३ प्रकार आहेत, जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण

जल प्रदूषण :

जेव्हा नदी, नाले, तलाव, समुद्र, कालवे, सरोवरे, विहिरी इ स्रोत्यांचे पाणी दूषित होणे म्हणजे जल प्रदूषण होय.

जल प्रदूषण ही एक मानवाने निर्माण केलीली समस्या आहे .

जर प्रदूषण मुले मानवाच्या जीवनावर खूप दुष्परिणाम घडून येतात, जसे पजल प्रदूषणामुळे पाण्याची गुणवत्ता कमी होते.

आणि हेच दूषित पाणी आपण पितो ज्यामुळे आपल्याला देखील बरीच समस्या उदभवत असते

जल प्रदूषणाची प्रमुख कारण :

कारखान्यातील दूषित पाणी : कारखान्यातील सांडपाणी हे जल प्रदूषनाच प्रमुख कारण आहे,

मोठं मोठ्या कारखान्यातील खराब पाणी म्हणजे सांडपाणी हे नदी नाले समुद्र यात सोडले जाते ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते, हे पण समुद्रात सोडल्यामुळे त्यातले जीव देखील मरतात

water pollution -

या दूषित पाण्यामुळे समुद्री जीव मोठ्या प्रमाणात धोक्यात असतात

जल प्रदूषणाच आणखी एक कारण म्हणजे सांडपाणी

लहान लहान गावात महिला धुणे भांडी करण्यासाठी नद्यांवर जातात, बरेच शेतकरी सुद्धा आपली जनावर नदीतच धुतात ज्यामुळे नद्या देखील प्रदूषित होतात आणि त्यामुळे देखील जल प्रदूषण वाढते

जर प्रदूषण रोखण्यासाठी उपाय :

  • औद्योगिक क्षेत्रातील पाणी नदी नाले समुद्रात सोडू नये त्याऐवजी त्याची योग्य प्रमाणे विल्हेवाट लावायची
  • दूषित पाणी किंवा दूषित कचरा नदी नाल्यात सोडू नये
  • नदी नाले किनारे साफ करणे

वायू प्रदूषण :

वायू प्रदूषण म्हणजे हवेतील प्रदूषण,

जेव्हा हवेत दूषित कण मिसळतात तेव्हा ते हवा दूषित होते यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात

वायू प्रदूषणाची प्रमुख कारण :

वाहनं हि वायू प्रदूषणाची प्रमुख कारण बनली आहेत..

Air Pollution in Marathi

वाहनांमधून निघणारा धूळ ज्यात काही अशुद्ध कण असतात ते हवेला दूषित करतात आणि याचाच परिणाम असा कि हवा प्रदूषित होते

air pollution due to industries in marathi

कारखानातून तो धूळ निघतो तो अतिशय प्रदूषित असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असत

लोकसंख्येचा विस्फोट :

वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलतोड होत आणि आणि त्यामुळे झाडांमधून मिळणारी शुद्ध हवा देखील विरळ होत चालली आहे

air pollution in marathi -

वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाय :

  • प्रक्रिया न करता हवेत विषारी वायू सोडणाऱ्या कारखान्यांनी निर्बंध
  • खाजगी वाहनांचा मर्यादित वापर करणे
  • सणांमध्ये फटाक्यांचा वापर टाळावा
  • टायर, रबर, प्लास्टिक अशे हानीकार वस्तू जाळणे थांबवावे
  • जास्तीत जास्त झाडे लावावीत

ध्वनि  प्रदूषण :

ध्वनि प्रदूषण म्हणजे मोठ्या आवाजामुळे होणारे प्रदूषण

सोप्या भाषेत सांगायला गेले तर गरजेपेक्षा जास्त आवाज जो माणसांच्या आरोग्याला ताण देतो किंवा परिणाम करतो

जसे बँड, डीजे मुळे कानाला त्रास होतो तर ते ध्वनि  प्रदूषण म्हटले जाते

ध्वनि प्रदूषणाची प्रमुख कारण :

कारखान्या मधील जोराचा आवाज, वाहनांचा आवाज, भांधकाम चा आवाज, बँड डीजे, तसेच नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप, वादळे, जोराचा वारा हि ध्वनी प्रदूषणाची प्रमुख कारण आहेत

ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी उपाय :

  • उद्योग किंवा कारखाने शहर किंवा लोकसंख्येपासून दूर स्थापित करावे,
  • वाहनमधील हॉर्न ची आवाज पातळी कमी करण्यात यावी, जास्त मोठे आवाजाचे हॉर्न लावू नये
  • झाडे लावावी कारण झाडांमध्ये ध्वनि शोषणारे गुणधर्म असतात

तर मित्रांनो हे होते प्रदूषण त्याची कारण आणि त्यावरील उपाय

आशा करतो कि तुम्हाला हा प्रदूषण एक समस्या निबंध आवडला असेल

जर आवडला तर मित्रांसोबत नक्की करा

आणि आमचे काही इतर निबंध सुद्धा पहा तुम्हाला नक्की आवडतील

हे पण वाचा :

  • { निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay In Marathi
  • मी झाड बोलतोय मराठी निबंध 
  • महात्मा गांधी निबंध Marathi
  • स्वच्छतेचे महत्व निबंध
  • Coronavirus essay in marathi
  • स्वच्छ भारत अभियान या विषयावर निबंध
  • माझी शाळा निबंध मराठी 
  • माझी आई या विषयावर निबंध
  • ऑनलाईन शिक्षण : फायदे व तोटे मराठी निबंध
  • मोबाइलचे मनोगत निबंध मराठी

Team 360Marathi.in

1 thought on “(Essay) प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | pradushan ek samasya essay in marathi | Pollution Essay in Marathi”

  • Pingback: माझी आई निबंध | Majhi Aai Nibandh In Marathi | Mazi Aai Marathi Nibandh - 360Marathi April 2021

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन | Pradushan Ek Samasya Nibandh Marathi

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन – pradushan ek samasya nibandh marathi.

मानवासहित सर्व सजीव प्राणी वनस्पतींना जगण्यासाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता असते. संतुलित वातावरणात सर्व घटक एका निश्चित प्रमाणात असतात. परंतु जेव्हा वातावरणात या घटकांची उणीव निर्माण होते किंवा त्यात हानिकारक घटक आपल्या मिसळतात तेव्हा वातावरण प्रदूषित होते व मानवासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नुकसानकारक ठरते. आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषणाने घर केले आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्या मुठीत गेलो आहोत.

प्राचीन काळात ही समस्या इतकी बिकट नव्हती. त्यावेळी प्रदूषणाचे नामोनिशाण नव्हते. निसर्गात एक प्रकारचे संतुलन होते. हवा , पाणी शुद्ध होते. पृथ्वीची उत्पादन शक्ती जास्त होती. हळूहळू लोकसंख्या वाढली. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नित्य नवे कारखाने उघडू लागले. औद्योगिकीरणाच्या स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र धावू लागले. ऐषआरामाच्या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भूगर्भातील बहुमूल्य संपत्ती खेचून बाहेर काढली जाऊ लागली. नैसर्गिक संपत्ती नष्ट होताच भूगर्भातील कोळसा, खनिजतेल, धातू यांचे वायुरूपात परिवर्तन होऊन संपूर्ण वातावरणाला व्यापून टाकेल आणि मग मानवाला जगणे मुश्किल होईल.

लोकसंख्येच्या वाढीमुळे निवासस्थानांचे संकट उत्पन्न झाले आहे. परिणामी लहान लहान भूखंडांवर लहान लहान घरे उभारली जात आहेत. दहा दहा मजली उंच इमारती तयार होत आहेत. या घरांमधे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा अभाव असतो. जंगल कटाई करून राहण्यासाठी जागा उपलब्ध केली जात आहे. मानव स्वतःच या प्रदूषणाला कारणीभूत आहे. समुद्राला अमर्याद शक्तीचा स्वामी समजून सर्व कचरा समुद्रात टाकला जात आहे. नद्यापण आपले प्रदूषित पाणी समुद्रात मिसळतात. शास्त्रज्ञांनी सावधगिरीचा इशारा देऊनही औद्योगिक घटकांद्वारे केरकचरा समुद्रात टाकणे बंद न झाले तर लवकरच त्यातील मासे मरतील. सध्या हजारो जहाजे व पेट्रोलियम टॅकर्सची समुद्रातून वाहतूक होते. एकीकडे हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जातात. तर दुसरीकडे लाखो टन पेट्रोलियमच्या गळतीमुळे किंवा अपघातामुळे समुद्राच्या पाण्यावर ते पसरते. समुद्राच्या पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. या तेलात अनेक किमती धातू उदा. शिसे, निकेल, मँगेनीज इत्यादी असते. जे जीवजंतू किंवा वनस्पतीद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करून त्याचे नुकसान करते. नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे बिकट संकट विक्राळ रूप धारण करीत आहे. . ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची श्रवणशक्ती क्षीण होते. त्यामुळे चिडचिडेपणा, थकवा, निद्रानाश, श्वासाचे रोग उत्पन्न होतात. शहरांची लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच जात आहे. ग्रामीण जनतेचे शहरांकडे होणारे पलायन. शहरी जीवन कष्टमय बनवीत आहे. जो जो लोकसंख्येची घनता वाढते तो तो वाहुकीच्या साधनांत वाढ होते. इंधनावर चालणाऱ्या या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वायुप्रदूषण होते. ज्यामुळे श्वासाचे अनेक रोग उद्भवतात उदा. फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, खोकला, सर्दी इत्यादी वायुप्रदूषण मंदगतीने विषाचेच कार्य करते. परंतु भोपाळ वायू दुर्घटनेत निघालेला “मिथाईल आइसो सायनाईड” मुळे हजारो लोक तात्काळ मृत्यू पावले. जे लोक मेले ते मुक्त झाले पण जे वाचले ते कणाकणाने मरण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रातील विज्ञानाचा शाप सहन करण्यास विवश झाले.

औद्योगिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तिमुळे कारखान्यांतून निघणारे विषारी वायू हवा विषमय करतात. कारखान्याजवळ लावलेल्या झाडांवर काजळीची पुटे चढ़तात. मग तेथेच वास्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल काय? अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनलाही छिद्र पडले आहे.

निसर्गाशी मानवाचा अयोग्य व्यवहार या समस्येला आणखीनच गंभीर करतो. जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे आणि वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या झाडांना नष्ट करणे हा मानवाचा स्वभावच बनला आहे. जर आता वृक्षारोपण मोहीम वेगाने चालविली नाही तर प्रदूषण हा एक असाध्य रोग बनेल. आज शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळेही पर्यावरणाचे प्रदूषण होते. अधिक उत्पादनासाठी शेतात लाखो टन रासायनिक खते टाकली जातात व कीटकनाशके फवारली जातात. वाढत्या शेतीउत्पादनासाठी मानवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागते. हीच रसायने हळूहळू अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात व अनेक रोगांचे कारण बनतात.

आजकाल ग्राहकांना आकषून घेण्यासाठी फळे, धान्ये इत्यादींना ला कृत्रिम रंग दिले जातात. हे रंग आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. संपूर्ण पृथ्वी प्रदूषित करून मानवाला चैन पडले नाही म्हणून त्याने खाद्य पदार्थही दूषित करण्यास सुखात केली. तापमानाचे प्रदूषण होणे पण मानवासाठी घातक आहे. वातावरणाचे तापमान वाढले की हिमखंड वितळू लागतात. जर बर्फाचे पर्वत वितळू लागले तर संपूर्ण पृथ्वी जलमय होईल.

ही समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. अनेक प्रत्यत्नानंतर थोडेसे यश मिळाले आहे. दाट लोकसंख्येपासून कारखाने दूर नेले जावेत. विषारी वायू जाण्यासाठी उंच चिमण्या बसविण्यात याव्यात. विषारी वायू बाहेर निघण्यापूर्वीच नष्ट करण्यात यावेत. केरकचऱ्याचा उपयोग जमिनीच्या भरावासाठी करण्यात यावा, पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारू नयेत, नैसर्गिक रूपात धान्य ग्राहकाला मिळावे, गावांतून शहरांकडे जाणाऱ्या बुद्धिजीवींचे पलायन थांबविण्यासाठी गावातच रोजगार उत्पन्न करुन द्यावा. वृक्षतोड बंद करून वृक्षारोपण मोहीम राबवावी. कारखान्यांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करावे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करावे. बायोडिग्रेडेबल गॅसचा वापर करावा.

जगात सर्वात जास्त चर्चा प्रदूषणाची होते. शास्त्रज्ञ प्रदूषण थांबविण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. प्रत्येकाने या कामात मदत केली पाहिजे. जर असे केले नाही तर स्वर्गापेक्षाही प्रिय असणाऱ्या पृथ्वीची स्थिती कशी होईल ते आपण जाणतोच.

  • पृथ्वीवर प्रदूषणाचे दुष्परिणाम
  • ध्वनि प्रदूषण मराठी माहिती
  • मृदा प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती
  • पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
  • हवा प्रदूषण मराठी माहिती
  • राष्ट्रध्वजाचे मनोगत निबंध
  • शाळेतील क्रीडांगणाचे मनोगत
  • वर्गातील फळ्याचे मनोगत
  • आंब्याचे झाडाचे मनोगत
  • भूकंपग्रस्ताचे मनोगत
  • परिश्रमाचे महत्त्व निबंध मराठी
  • निःशस्त्रीकरण निबंध मराठी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निबंध

Leave a Reply Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

जलप्रदूषण निबंध मराठीत , Jal pradushan essay in marathi , जलप्रदूषण माहिती मराठी , jal pradushan ek samasya nibandh , jal pradushan ek samasya marathi , jal pradushan ek samasya nibandh lekhan

जलप्रदूषण निबंध मराठीत | Jal pradushan essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये जलप्रदूषण निबंध बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही  जलप्रदूषण निबंध मराठीत , jal pradushan ek samasya marathi , जलप्रदूषण माहिती मराठी , jal pradushan ek samasya nibandh , जलप्रदूषण माहिती , jal pradushan ek samasya marathi nibandh , जलप्रदूषण एक समस्या निबंध  याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

Table of Contents

जलप्रदूषण म्हणजे काय

प्रदूषण म्हणजे नैसर्गिक वातावरणात दूषित घटकांचा प्रवेश ज्यामुळे प्रतिकूल बदल घडतात. वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जमीन प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आहेत. जलप्रदूषण म्हणजे तलाव, नद्या, समुद्र, महासागर तसेच भूजल यांसारख्या पाण्याच्या शरीराचे प्रदूषण.

पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्याच्या पृष्ठभागावर द्रव पाणी आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि महासागरांमध्ये पृथ्वीच्या एकूण पाण्यापैकी 96% पाणी आहे, फक्त 2.5% पाणी आपण आपल्या आवश्यक गोष्टींसाठी वापरू शकतो. मानवी शरीराला दररोज जवळचे ३ लिटर पाणी आवश्यक असते. पाणी हा आपल्या जीवनातील आणि पर्यावरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तथापि, हे देखील एक सत्य आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर निश्चित प्रमाणात पाणी आहे. पाऊस, बर्फ, धुके इत्यादी स्वरूपात पाण्याची स्थिती बदलण्याचा स्वभाव आहे. ही संपूर्ण प्रक्रिया एका चक्रात घडते ज्याला जलचक्र म्हणतात.

जलचक्र, ज्याला हायड्रोलॉजिकल सायकल म्हणतात, त्यात खालील पायऱ्यांचा समावेश होतो:

बाष्पीभवन – सूर्याच्या उष्णतेमुळे महासागर, तलाव, समुद्र इत्यादी जलस्रोत गरम होतात आणि पाण्याचे हवेत बाष्पीभवन होऊन पाण्याची वाफ तयार होते.

बाष्पीभवन – बाष्पीभवनाप्रमाणेच झाडे आणि झाडे देखील त्यांच्यातील पाणी गमावतात जे वातावरणात जाते. या प्रक्रियेला बाष्पोत्सर्जन म्हणतात.

संक्षेपण – हवेतील थंड वातावरणामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असताना ते थंड होऊ लागते आणि त्यामुळे पाणी थंड होऊन ढगांची निर्मिती होते.

पर्जन्य – पंखांच्या उच्च हालचालींमुळे ढग एकमेकांवर आदळू लागतात आणि नंतर पावसाच्या रूपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर परत येतात. काहीवेळा ते तापमानावर अवलंबून बर्फ, गारा, गारवा इत्यादी स्वरूपात देखील परत पडतात.

रनऑफ किंवा घुसखोरी – पर्जन्यवृष्टीनंतर, पाणी एकतर रनऑफ नावाच्या पाणवठ्यांकडे वाहते किंवा जमिनीत शोषले जाते, ज्याला घुसखोरी म्हणतात.

जलप्रदूषणाची कारणे

जलप्रदूषणाची अनेक कारणे आहेत. काही कारणे जलप्रदूषणावर थेट तर काही अप्रत्यक्षपणे प्रभावित होतात. अनेक कारखाने आणि उद्योग थेट जलप्रदूषणाचा परिणाम म्हणून दूषित पाणी, रसायने आणि जड धातू प्रमुख जलमार्गांमध्ये टाकत आहेत.

जलप्रदूषणाचे आणखी एक कारण म्हणजे शेतीत आधुनिक तंत्राचा वापर. शेतकरी फॉस्फरस, नायट्रोजन आणि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्त्वे रासायनिक खते, खत आणि गाळ या स्वरूपात वापरतात. यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात कृषी रसायने, सेंद्रिय पदार्थ आणि क्षारयुक्त निचरा पाण्याच्या स्रोतांमध्ये सोडला जातो. त्याचा अप्रत्यक्षपणे जलप्रदूषणावर परिणाम होतो.

प्रदूषक विविध प्रकारचे असू शकतात जसे की सेंद्रिय, अजैविक, किरणोत्सर्गी इ. जल प्रदूषक पाईप्स, चॅनेल इत्यादींमधून एका बिंदूतून सोडले जातात, ज्याला बिंदू स्त्रोत म्हणतात किंवा इतर विविध स्त्रोतांमधून सोडले जाते. ते कृषी क्षेत्र, उद्योग इत्यादी असू शकतात, ज्यांना विखुरलेले स्त्रोत म्हणतात.

जल प्रदूषकांचे काही प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

घरातील घरगुती सांडपाण्यात विविध प्रकारचे रोगजनक असतात ज्यामुळे मानवी शरीराला धोका असतो. सांडपाणी प्रक्रियेमुळे रोगजनकांचा धोका कमी होतो, परंतु हा धोका दूर होत नाही.

घरगुती सांडपाण्यात मुख्यत्वे नायट्रेट्स आणि फॉस्फेट्स असतात आणि या पदार्थांच्या जास्तीमुळे पाण्याच्या पृष्ठभागावर एकपेशीय वनस्पती वाढू शकते. यामुळे, स्वच्छ जलस्रोत पौष्टिकतेने समृद्ध जलसाठे बनतात आणि नंतर हळूहळू, पाण्यातील ऑक्सिजन पातळी कमी होते. याला युट्रोफिकेशन किंवा कल्चरल युट्रोफिकेशन म्हणतात (जर ही पायरी मानवाच्या क्रियाकलापांद्वारे वेगाने होत असेल). यामुळे जलकुंभ लवकर मरण पावतात.

ज्या औद्योगिक किंवा कारखान्यातील टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही आणि त्यात पारा आणि शिसे यांसारखी रसायने असतात अशा पाण्याची विल्हेवाट शरीराला विषारी, किरणोत्सर्गी, स्फोटक आणि कर्करोगजन्य बनवते.

गाळ हा मातीच्या धूपाचा परिणाम आहे जो जलस्रोतांमध्ये तयार होतो. या गाळांमुळे पाणवठ्यांचा पर्यावरणीयदृष्ट्या असंतुलन होतो. पाण्यात राहणाऱ्या विविध जलचरांच्या प्रजनन चक्रातही ते हस्तक्षेप करतात.

औष्णिक प्रदूषण-

उष्णतेमुळे जलस्रोत प्रदूषित होतात आणि अतिउष्णतेमुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. माशांच्या काही प्रजाती ऑक्सिजनची पातळी कमी असलेल्या अशा पाणवठ्यांमध्ये राहू शकत नाहीत. पॉवर प्लांटमधून थंड पाण्याची विल्हेवाट लावल्याने जलकुंभांमध्ये थर्मल प्रदूषण वाढते.

पेट्रोलियम तेलाचे प्रदूषण-

मेक्सिकोच्या आखातात 2010 मध्ये घडल्याप्रमाणे एकतर चुकून किंवा हेतुपुरस्सर जलप्रदूषणात वाढ होत असल्याने पाण्याच्या स्रोतांमध्ये तेल वाहून जाते.

पाणी हा मानवी आरोग्याचा महत्त्वाचा घटक असल्याने प्रदूषित पाण्याचा थेट परिणाम मानवी शरीरावर होतो. जलप्रदूषणामुळे टायफॉइड, कॉलरा, हिपॅटायटीस, कॅन्सर इत्यादी विविध आजार होतात. जलप्रदूषणामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन नदीतील वनस्पती आणि जलचरांचे नुकसान होते. प्रदूषित पाण्यामुळे झाडांना आवश्यक असलेली पोषक तत्वे मातीतून धुवून टाकली जातात आणि जमिनीत मोठ्या प्रमाणात अॅल्युमिनियम देखील सोडले जाते, जे झाडांना हानिकारक ठरू शकते.

सांडपाणी आणि सांडपाणी हे दैनंदिन जीवनातील उप-उत्पादन आहेत आणि अशा प्रकारे साबण, शौचालये आणि डिटर्जंट वापरणे यासारख्या विविध क्रियाकलापांद्वारे प्रत्येक कुटुंबाद्वारे उत्पादित केले जाते. अशा सांडपाण्यामध्ये रसायने आणि जीवाणू असतात जे मानवी जीवनासाठी आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. जलप्रदूषणामुळे आपल्या इकोसिस्टममध्येही असंतुलन होते. शेवटी, त्याचा अन्नसाखळीवरही परिणाम होतो कारण पाण्यातील विषारी द्रव्ये मासे, खेकडे इत्यादी जलचर प्राणी खातात आणि नंतर माणसे अशा प्राण्यांना उपद्रवी करतात.

कधी कधी आपली परंपराही जलप्रदूषणाचे कारण बनते. काही लोक देवतांच्या मूर्ती, फुले, भांडी, राख नदीत टाकतात.

पाणी हा मानवी आरोग्याचा महत्त्वाचा घटक असल्याने प्रदूषित पाण्याचा थेट परिणाम मानवी शरीरावर होतो. जलप्रदूषणामुळे टायफॉइड, कॉलरा, हिपॅटायटीस, कॅन्सर इत्यादी विविध आजार होतात. जलप्रदूषणामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन नदीतील वनस्पती आणि जलचरांचे नुकसान होते. प्रदूषित पाण्यामुळे झाडांना आवश्यक असलेली पोषक तत्वे मातीतून धुवून टाकली जातात आणि जमिनीत मोठ्या प्रमाणात अल्युमिनियम देखील सोडले जाते, जे झाडांना हानिकारक ठरू शकते.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला   जलप्रदूषण निबंध मराठीत , jal pradushan ek samasya marathi , जलप्रदूषण माहिती मराठी , jal pradushan ek samasya nibandh , जलप्रदूषण माहिती , jal pradushan ek samasya marathi nibandh , जलप्रदूषण एक समस्या निबंध  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “जलप्रदूषण निबंध मराठीत | Jal pradushan essay in marathi”

  • Pingback: विनोदाचे महत्व | मानवी जीवनातील विनोदाचे स्थान | importance of jokes essay in marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

essay in pradushan in marathi

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध Pollution Essay in Marathi

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध Pradushan Ek Samasya Marathi Nibandh : आज आपण प्रदूषणाच्या जगात जगत आहोत. पाणी, जमीन आणि आकाशात प्रदूषणाच्या राक्षसाने आपला अधिकार स्थापित केला आहे. सर्वत्र होणार्‍या प्रदूषणामुळे आपले आयुष्य भयानक चक्रात अडकले आहे.

नक्की वाचा – माझे आजोबा मराठी निबंध

Pollution Essay in Marathi

प्रदूषणाचे प्रकार – प्रदूषण हा एक बहुमुखी दैत्य आहे. तो वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या स्वरूपात आपले आपले वर्चस्व गाजवत आहे. आपण दूषित वातावरणात श्वास घेत आहोत. लोकांना पिण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पाणी मिळत नाही. दूषित पाणी आणि कीटकनाशकांमुळे पिकेदेखील दुषित होताना दिसून येत आहेत. आधुनिक यंत्रांचा आवाज आपल्या कानांना त्रास देत आहे. प्रदूषणाच्या या विविध प्रकारांमुळे या सुंदर सृष्टीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

प्रदूषणाची कारणे – प्रदूषणाच्या या विकट समस्येचे मूळ म्हणजे औद्योगिक क्रांती आणि वाढती लोकसंख्या. गिरणी, कारखाने आणि वाहनांमधून निघणारा धूर वातावरणाला दुषित बनवत आहे. गॅस प्लांटमधून होणार्‍या गॅस गळतीच्या दुर्घटनांमुळे वातावरण भयंकर दुषित बनत आहे. रासायनिक कचरा, औद्योगिक वसाहतींमधून निघणारा कचरा आणि गटारींचे पाणी नद्या, तलाव आणि समुद्रांच्या पाण्याला दुषित बनवत आहेत. ट्रेन, विमान, मोटर, रेडिओ, दूरदर्शन आणि लाऊड ​​स्पीकर्समधून निघणारे ध्वनी ध्वनीप्रदूषण वाढवित आहेत. फटाके आणि बॉम्ब हे ध्वनी प्रदूषण वाढविण्यास हातभार लावत आहेत. शहरांमधील घाण वस्ती, यांत्रिकीकरणाची वाढती प्रवृत्ती आणि, जंगले आणि झाडे यांचा नाश ही प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत.

प्रदूषणाचे परिणाम – प्रत्येक प्रकारचे प्रदूषण हे पृथ्वीवरील जीवनाचे शत्रू आहेत. वायू प्रदूषणामुळे वातावरणात कार्बन-डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. यामुळे, पृथ्वीच्या वातावरणावरील महत्वाचा घटक ओझोन वायुवरही तीव्र परिणाम होत आहे. पृथ्वीच्या अनियमित तापमानामुळे ऋतूंचा बदल देखील विचलित होत आहे. हवा आणि पाण्याच्या प्रदूषणामुळे विविध प्रकारचे प्राणघातक रोग पसरत आहेत. शेती नष्ट होत आहे. पृथ्वीची सुपीकता कमी होत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे माणूस बहिरापणा, निद्रानाश, रक्तदाब आणि मानसिक रोगांना बळी पडत आहे.

प्रदूषण कमी करण्याचे उपाय – प्रदूषणापासून पूर्णपणे मुक्त होणे शक्य नाही, परंतु ते कमी केले जाऊ शकते. यासाठी लोकांमध्ये जनजागृती करावी लागेल. वृक्षतोड थांबवावी लागेल आणि वृक्ष लागवडीला प्रोत्साहन द्यावे लागेल. जर आपण हुशारीने काम केले तर आम्ही लोकसंख्येचा वाढीचा दर कमी करू शकतो आणि उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवू शकतो, त्यामुळे आपण प्रदूषणाच्या समस्येवर बर्‍याच अंशी विजय प्राप्त करू शकू.

जर मानवजातीला सुखी आणि शांतीने जगण्याची इच्छा असेल तर त्याला या प्रदूषणरुपी राक्षसावर विजय प्राप्त करावा लागेल.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ध्वनी प्रदूषण मराठी निबंध । Dhwani Pradushan Marathi Nibandh

ध्वनी प्रदूषण मराठी निबंध । Dhwani Pradushan Marathi Nibandh

आपल्या आसपास पर्यावरणा मध्ये अनेक प्रकारचे प्रदूषण बघायला मिळते जसे की, जल प्रदूषण, भूमी प्रदूषण, वायु प्रदूषण आणि या प्रदुषणांचा आपल्या जीवनावर अत्यंत घातक परिणाम होतो.

Table of Contents

अलीकडच्या काळात तर प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढले आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा वाढत जात आहेत.

म्हणून आपण आजच्या निबंधा मध्ये ध्वनी प्रदूषण हा निबंध मराठी भाषेत बनणार आहोत.

Sound Pollution Essay in Marathi

ध्वनी प्रदूषण म्हणजे काय :.

गरजेपेक्षा जास्त व कर्कश अवास्तव प्रमाणापेक्षा जास्त मोठा आवाज, जो माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतो आणि दैनंदिन जीवनात अडथळा आणतो त्या आवाजाला ” ध्वनि प्रदूषण ” असे म्हणतात.

आपल्या अवती- भवती रोज किती तरी प्रकारचा आवाज होत असतो. भारत हा अफाट लोकसंख्याचा देश आहे. इथे अनेक उद्योगधंदे, औद्योगीकरण मोठ मोठ्या प्रमाणात चालत असते

त्या कामासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची पुरवठा करण्यासाठी मोठ्या वाहनांची आवश्यकता असते व याच वाहनांच्या हॉर्ना पासून त्या आवाजा पासून ध्वनि प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

जेव्हा दोन व्यक्ती संवाद साधत असतात तेव्हा त्यांच्या बोलण्याचा आवाज हा ३० ते ४० डेसिबल येवढा असतो आणि त्यापेक्षा जास्त आवाज झाल्यास त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

विविध संस्थांच्या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, सरासरी लोकसंख्येच्या एकूण अर्धा पेक्षा जास्त लोकसंख्या ही ध्वनी प्रदूषणाची बळी आहे.

आपले कान ३० ते ४० डेसिबल येवढा आवाज सहन करण्याची ताकद ठेवतो आणि याच मर्यादितील आवाज आपल्या मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो परंतु ८० डेसिबल येवढा आवाज आपण सतत आठ तासांसाठी ऐकला तर आपल्याला बहिरेपणा येण्याची शक्यता असते. यावरून आपल्याला कळते की हे ध्वनि प्रदूषण आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

ध्वनी प्रदूषणाची कारणे :

आपल्या दैनंदिन जीवनात आपण किती तरी विविध प्रकारचा आवाज ऐकतो काही आवाज आपल्याला ऐकाव असे वाटते परंतु काही आवाज एवढे कर्कश असतात की, ते आवाज ऐकु येताच आपण कानावर हात ठेवतो आणि हेच आवाज ध्वनी प्रदूषणासाठी कारणीभूत ठरतात.

आपल्या आसपासच्या जीवनात लाखो वाहने आपण बघत असतो वाहनातून निघणारा धूर पासून वायु प्रदूषण होतेच पण वाहनांच्या हॉर्न च्या आवाज यामुळे ध्वनी प्रदूषणाचे संकट वाढत आहे.

एक निदर्शना मधून असे लक्षात आले की कर्णकर्कश हॉर्न चे डेसिबल मध्ये मोजमापन केला असता त्याची पातळी १००- २०० डेसिबल एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे.

यामुळे वाहने ही ध्वनी प्रदूषणा साठी प्रमुख कारण बनत जात आहेत व या कर्कश ध्वनिचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत आहे.

ध्वनी प्रदूषणाचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे दिवाळी मध्ये फोडल्या जाणाऱ्या फटाकड्या. फटाक्यांमुळे ध्वनि- प्रदूषण व वायू प्रदूषण या दोन्ही प्रकारचे प्रदूषण होत असल्याचे दिसते. या फटाक्यांचा ध्वनि हा १४० ते १६० डेसिबल एवढ्या मोठ्या प्रमाणात ध्वनी निर्माण होतो आणि हा ध्वनी हानिकारक आहे.

मोठ्या आवाज करणारे रेडिओ, लग्नामध्ये व इतर कार्यक्रमांच्या वेळी लावले जाणारे D.J. व फोडले जाणाऱ्या फटाकड्या, बॉम्ब यांमुळे ध्वनी प्रदूषण मध्ये आणखी भर घातली आहे. वाढत जाणारे कारखाने आणि या कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मशिनरी व त्यामुळे होणारा ध्वनि खूप मोठ्या प्रमाणात होणारा आवाज यांमुळे ध्वनी प्रदूषण वाढत चालले आहे.

इतरांच्या शांतपणे जगण्याच्या व झोपण्याच्या अधिकारावर आक्रमण करणारी कर्णकर्कश संगीताच्या नावावर नवीन वर्ष साजरा करण्यासाठी स्पर्धात्मक मोठा आवाज करून गाणे वाजवणारी पिढी. ध्वनी प्रदूषणा साठी कारणीभूत ठरत आहे.

भारतीय संस्कृतीने अनेक सणे, जयंती साजऱ्या केल्या जातात त्यामुळे गणपती उत्सव, शिव जयंती, बसवा जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात त्यामध्ये D.J. डान्स मोठ्याने ओरडणे, भांडण या सर्व गोष्टींमुळे ध्वनी प्रदूषण वाढत आहे.

मोठ्या आवाजात वाजवलेली गाणे, T.V. यांच्या संपर्कात जास्त वेळ राहिले असते मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याचा धोका असतो व सोबतच ध्वनी प्रदूषण सुद्धा होते.

ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम :

अतिरिक्त ध्वनी प्रदूषणाचे परिणाम आज आपल्या संपूर्ण पर्यावरणावर होत असल्याचे दिसून येत आहे.

ध्वनी हा हवेच्या माध्यमाने प्रसारित होऊन प्रवास करत असतो म्हणून ध्वनीचे मापन हवेच्या गुणवत्ता पातळी मध्ये केले जाते. ९० डेसिबल पेक्षा अतिरिक्त जोराचा आवाज वारंवार आपल्या कानावर पडत असल्यास बधिरत्व ( बहिरेपणा ) येण्याची शक्यता आहे.

ध्वनी प्रदूषण निष्कर्ष मराठी माहिती

ध्वनी प्रदूषणा मुळे सर्वात जास्त परिणाम होतो तो म्हणजे मानवी आरोग्यावर होतो. जास्त जोराचा आवाजा मुळे शरीराच्या नाडी तंत्रात कायमस्वरूपी बदल होतो आणि ऍड्रेलिन प्रवाह वाढायला लागतो व त्यामुळे शरीरातील हृदयाच्या कार्याची गती वाढली जाते. सतत आवाज येत असल्याने जोराच्या आवाजा मुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल ची पातळी वाढते व त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या संकुचित होऊन कायमच्या कमजोर होतात. ज्यामुळे हृदयाघात आणि हार्ट स्ट्रोकचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढतो.

अतिरिक्त आवाजामुळे व प्रमाणापेक्षा जास्त ध्वनी मुळे न्यूरोसिस आणि नर्व्हस ब्रेक डाऊन देखील होतो असे काही संशोधकांनी सांगितले आहे.

प्रमाणापेक्षा जास्त ध्वनी कानावर पडल्यास रक्तदाब वाढतो. व डोकेदुखी सुरू होते. ध्वनी प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा सर्वात घातक परिणाम म्हणजे बहिरेपणा होय.

अतिरिक्त आवाजामुळे बहिरेपणा येण्याची शक्यता आहे. ऐकायला कमी येणे व कानात सतत बेल वाजत राहिल्या सारखा आवाज येणे, झोप बिघडून अचानक जाग येणे यामुळे व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होऊन स्वास्थ्य बिघडते व वेदना होणे,

थकवा होणे, अस्वस्थता वाटणे, कुठल्याही कामामध्ये मन न लागणे, बोलण्यात अडथळा येणे व हार्मोन्स मध्ये बदल होणे यांसारखे घातक परिणाम मानवी आरोग्यावर ध्वनी प्रदूषणामुळे होतात.

तसेच, गरोदर स्त्रियांनाही अतिरिक्त ध्वनी मुळे त्रास होतो, त्यांचे मानसिक ताण वाढून संप्रेरकांचे प्रमाण वाढत जाते त्यामुळे अकाली प्रसूती होण्याचे प्रकार अलीकडे बघायला मिळत आहेत.

ध्वनी प्रदूषणामुळे आजारी व्यक्तींना खूप मानसिक त्रास होतो. ज्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा होऊन त्यांना जगणे नकोसे वाटते. शहरी भागामध्ये अतिरिक्त आवाज जास्त असल्याने तेथील लोकांचे पाचेंद्रिये निकामी होत आहेत. अशाप्रकारे ध्वनि प्रदूषणाचे घातक परिणाम आपल्या दैनंदिन जीवना मध्ये होत आहेत.

अशा प्रकारे ध्वनी प्रदूषणाचे अत्यंत वाईट परिणाम होताना दिसत आहेत.

ध्वनी प्रदूषण चे उपाय :

१) ध्वनी प्रदूषणाचा पहिला घात हा कानावर होतो म्हणून कानाच्या क्षमतेवर होणाऱ्या परिणामा पासून बचाव करण्यासाठी रोजच्या रोज व्यायाम केला पाहिजे. सोबतच पोषक आहार असणे गरजेचे आहे आणि योग्य प्रमाणात झोप असणे गरजेचे आहे.

२) शाळा, महाविद्यालये व दवाखाने हे ” ध्वनि- प्रदूषण” निषिद्ध भाग आहेत. या ठिकाणी अतिरिक्त ध्वनि निर्माण होऊ नये याचे सर्वांनी पालन केले पाहिजे.

३) मोबाइलचा कमीत कमी वापर करावा. मोबाईल वर गाणे, चित्रपट बघताना व ऐकताना आवाज हा आपल्या पुरताच मर्यादित असावा याचे भान ठेवावे.

४) वाहनांच्या हॉर्नचा आवाज अनावश्यक ठिकाणी न वाजवावा. गरज आहे त्या पुरताच हॉर्न वाजवला पाहिजे.

५) डीजे सारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांचा आवाज योग्य डेसिबल पातळी मध्ये ठेवून वापर करावा जेणेकरून त्यांच्या आवाजामुळे कोणाला त्रास होणार नाही.

६) कर्णकर्कश आवाज असलेल्या ठिकाणी इअर प्लगचा वापर करावा जेणेकरून त्या आवाजाचा परिणाम आपल्या स्वास्थ्य वर होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.

७) दिवाळी मध्ये उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांचा वापर कमी करावा कारण ह्या फटाकड्या ध्वनी प्रदूषण साठी कारणीभूत ठरत आहेत.

८) रात्रीच्या वेळी ध्वनिक्षेपक वापरावर उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आलेली आहे तरी या नियमांचे सर्वांनी पालन केले पाहिजे.

९) रात्रीच्या वेळी सर्व वातावरण शांत असते त्यामुळे रात्री कोणीही कुठल्याही प्रकारचा आवाज आपल्या आसपासच्या परिसरा मध्ये करू नये.

१०) आपल्या टीव्ही, संगीत प्रणाली इत्यादी साधनांचा आवाज कमी ठेवावा, लाऊड स्पीकर वापरापासून इतरांना परावृत्त करावे.

११) लग्न समारंभामध्ये बँड, ताशा यांचा वापर करणे टाळावे. वरील काही उपाय व नियमांचे पालन आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्यास चालू केल्यास ध्वनी प्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून वंचित राहण्यास मदत होईल.

त्यामुळे आपले मानवी आरोग्य निरोगी राहील व सोबतच पर्यावरण सुद्धा स्वच्छ व निर्मळ राहील. म्हणून ध्वनी प्रदूषण थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.

* ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • वेळेचे महत्व निबंध मराठी 
  • जर मी शिक्षक झालो तर
  • कचऱ्याचे व्यवस्थापन निबंध
  • माझे बाबा या विषयावर मराठी निबंध
  • संगणक ची माहिती मराठी मध्ये

Marathi Grammar

Marathi Grammar

संपुर्ण मराठी व्याकरण अभ्यास

Pradushan Ek Samasya Marathi Nibandh

Pradushan Ek Samasya Marathi Nibandh। प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

Pradushan Ek Samasya Marathi Nibandh

मित्रानो , या पोस्ट मध्ये प्रदूषण एक समस्या निबंध मराठी  लेखन / Pradushan Ek Samasya Marathi Nibandh  100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध  7 वी ते 12 वी  च्या विद्यार्थ्याना परीक्षेत  वैचारिक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण Pradushan Ek Samasya Marathi Nibandh या विषयावर निबंध बघणार आहोत.

वाहत्या रहदारीच्या रस्त्यातून जाताना अचानक वाहतूक ठप्प झाली. कचकन ब्रेक दाबत, पुढे मागे… मोटारी थांबल्या. विचारपूस केल्यावर कळले की पाच- सहा मोटार चालकांकडे (PUC) पी. यू.सी. चा परवाना नसल्याने त्यांना पोलिसांनी रोखले होते. जिथे आधीच धोक्याची पातळी वायू प्रदूषणाने ओलांडली होती, तिथे या मोटारी वातावरणात प्रचंड धूर सोडत वायू प्रदूषण वाढवित होत्या.

सध्या २१ व्या शतकाकडे वाटचाल करताना मानवाच्या प्रगतीचा वार बेलगाम चौखूर उधळलाय, असं नाही वाटत. वैज्ञानिक प्रगती, आण्विक संशोधन, अंतराळात भरारी, ग्रहगोलांवर स्वारी, नित्य नवे शोध…. नवी नवी क्षितिजे पादाक्रांत करण्याची धडपड ! निसर्गावर मात करण्याचा बालीश अट्टाहास, खोट्या अहंभावाची जोपासना करता करता मानवाला अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. भ्रष्टाचाराचा कॅन्सर, लोकसंख्येचा भस्मासूर नि प्रदूषणाचा महाभयंकर राक्षस! …. यानं ह्याचं दैनंदिन जीवन पार झाकोळून टाकलंय.

माणसाच्या आजच्या हव्यासापायी हवा, पाणी, अन्न, जमीन, धान्य सारं सारं प्रदूषित झालंय. औद्योगिक क्रांतीपूर्वीच प्रदूषणाचा जन्म झाला, परंतु निसर्गाच्या कुंपणानं माणसाच्या जीवनात धुमाकूळ घालणाऱ्या या उन्मत्त दैत्याला थोपवून धरला होता. पण तो तरी कुठवर साहेल हा स्वैराचार ? सूर्य, वायू, पाणी या समर्थ घटकांवर नैसर्गिक चक्रांवरच तर या पृथ्वीतलावरचं पर्यावरण अबाधित राहतं. पण प्रगतीच्या नावाखाली ‘किती घेशील दो कराने’ ह्या भूमिकेतून आपण हा निसर्ग लुबाडला, ओरबाडला नी पर्यायाने प्रदूषणाने पाऊल पुढे टाकले. निर्भेळ जीवनासाठी निसर्गाची साथ हवी त्यासाठी काय करावे सांगताना ज्ञानोबा म्हणतात ह्र

नगरेचि रचावी । जलाशये निर्मावी ।

महावने लावावी । नानाविधे ।। 

वृक्षांना त्यांनी कर्मयोगी म्हटलं आहे. पर्यावरण रक्षणात वृक्षांचा सिंहाचा वाटा! पण लोकसंख्येच्या भस्मासुराने प्रचंड वृक्षतोड केली. सिमेंटची जंगले उभी राहिली. वातावरणातील थंडपणा नष्ट झाला, तापमान वाढू लागले. कारण प्रदूषणाने पृथ्वीभोवतालच्या ओझोन थराला छिद्र पडले. वातावरणीय थरांमधील वॉर्मिंग मुख्य कार्बनडायऑक्साइड अधिकाधिक तापून राहू लागला. ग्लोबल राहिले. दोन्ही ध्रुव वितळू लागले, पाऊस कमी झाला, कृत्रिम पावसाच्या ढगांसाठी वारेमाप खर्च सुरू झाला. जमीन पुरेनाशी झाल्यावर मानवाने नद्या, तळी समुद्रात भरी घातल्या त्यात इमारती, इमले उभारले. नद्यांचे प्रवाह बदलले …. मग समुद्राने निषेध नोंदविला – केरळला त्सुनामी लाटांनी शहरे गिळंकृत केली. न्यूयॉर्कला कॅतरिना व रीटा ही वादळे येऊन ठेपली.

या लोकसंख्या वाढीमुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खते, संकरित बी बियाणे शोधली. ‘हरितक्रांती’ झाली. पण त्यात धान्याचा कस गेला नि जमिनीचा पोत गेला. जमीन दूषित झाली, खारवली. धान्य, भाज्या सर्वांवर कीटकनाशके फवारून अन्न अंतर्बाह्य विषारी झाले.

तुकोबाराय म्हणतात, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.’ जंतुनाशके मिश्रित अन्नसेवनाने माणसे पोखरली, नाना व्याधींनी जखडली. औषधांमुळे आयुर्मान वाढले, पण आयुष्याची प्रत खालावली. वाहनांच्या धुराने, छातीचे पिंजरे धुरकटले. फुफ्फुसे निकामी होऊ लागली. कॅन्सरसारखे रोग बळावले. पक्षाघात, हार्ट अॅटॅक २०व्या वर्षीच मुलांना येऊ लागला.

जीवघेणी स्पर्धा, मानसिक ताणतणाव, दुरावलेले नातेसंबंध, विभक्त कुटुंबसंस्था हेही सामाजिक मानसिकतेतील प्रदूषणच नव्हे काय ? वाढणारी गुन्हेगारी, -हास पावलेले मूल्यसंस्कार, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, अंधश्रद्धा, भोंदूगिरी बुवाबाजी ही तर युवा पिढीला लागलेली कीडच आहे. याला उपाय आहे. निर्मळ मन. चांगल्या विचारांचं मन ! मनाचे प्रदूषण सर्वात घातक, सुसंगती, सुवाचन, सत्संग ह्यांची कांस धरून मनाचं प्रदूषण प्रथम घालवायला हवं.

मग गणेशोत्सव असला तरी आपण लाऊडस्पीकरवर कर्णकर्कश्य गाणी, सिनेमा गीते, डिस्को लावणार नाही. ज्याने कानाचे विकार निर्माण होतात. भोपाळसारखी वायुगळती, अणुभट्टीतील स्फोट काळजीपूर्वक थांबवू शकू. Clean air act तंतोतंत पाळू. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा नुसत्याच घोषणा देणार नाही तर मोहिमा राबवू.

निसर्गसंगती सदा घडो

मंजूळ पक्षीगान कानी पडो

कलंक प्रदूषणाचा झडो

वृक्षतोड सर्वथा नावडो.

टाकाऊपासून टिकाऊकडे वाटचाल करू. मळीपासून स्पिरीट, बगॅसपासून खत, कागद, पालापाचोळ्यातून कंपोस्ट खत, मलमूत्रातून बायोगॅस इत्यादी इत्यादी.

शासनही जागरूक झालंय, पण शासकीय योजना ‘प्रदूषित’ न होता प्रत्येकापर्यंत पोचल्या पाहिजेत अशी काळजी घेऊ.

आशा आहे …. आजच्या बालकांकडून! उद्याच्या नागरिकांकडून म्हणूनच

ध्यास घेऊया सारे मिळूनी

प्रदूषणावर मात करू।

वने जगवू, सृष्टी फुलवू

वृक्षांचा सन्मान करू ।।

५ जून…! जागतिक पर्यावरण दिन! आगळा वेगळा साजरा करू! वसुंधरेला नटवूनच!

Pradushan Ek Samasya Marathi Nibandh। प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

प्रदूषण एक समस्या १० ओळी निबंध

प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे आपल्या प्राकृतिक वातावरणाला धीरे-धीरे नष्ट होत आहे. प्रदूषणाचं मुख्य कारण मानवी गतिविधींमुळे आहे, जसं की वा हतुकींचं प्रवास, कारखान्यांचं उत्पादन, ध्वनीकेंद्रांचं वापर व विद्युत उत्पादन . हे विकासाच्या नियमांचं व तंत्रज्ञानाचं असंगत वापर होण्याने झालं आहे.

प्रदूषणाच्या विविध प्रकारं आहेत, जसं की वायुप्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जमिनीचं प्रदूषण आणि वन्यजीवनाचं प्रदूषण. वायुप्रदूषणाचं कारण वाहतुकींचं इमिशन आणि उष्मांचं पारखालण असतं, ज्यामुळे वातावरणात वायुविषाणू, धूळ, धुवा व उष्मांचं प्रमाण वाढतं.

पाण्याचं प्रदूषण प्रमुखतः औद्योगिक अपशिष्ट, नगरीचं अपशिष्ट आणि शेतीचं वापर होतं, ज्यामुळे पाण्याच्या नियमित वापरात वाष्टव्य व विषाक्त पदार्थ येतात. ध्वनिप्रदूषणामुळे उच्च शब्दस्तराचं कारण लोकांचं शारीरिक व मानसिक आरोग्य प्रभावित होतं.

जमिनीचं प्रदूषण म्हणजे भूमीची उपजाऊता कमी होणे, ज्यामुळे शेती आणि फळांमध्ये कमी येते. वन्यजीवनाचं प्रदूषण म्हणजे जंगलांचं कापून टाकणं, ज्यामुळे प्राकृतिक जीवनधर्मांचं विलीन होतं.

प्रदूषणाच्या परिणामस्वरुप वन्यजीवनात कमी, वायुमण्डळीय तापमानात वाढ, पाण्याच्या स्तरात वाढ, भूकंप, चक्रवात आणि इतर प्राकृतिक आपदा येऊन आहेत. तसेच, लोकांच्या स्वास्थ्यावरही खराब परिणाम दिसतो, ज्यात श्वासन संबंधी आजारे, वृद्धावस्थेचे आजारे आणि स्वास घेण्याच्या समस्या शामिल आहेत.

प्रदूषणाच्या समस्येचं संधीच समाधान संबंधित सरकारी नियमांमुळे होईल. आपल्याला नवीन आणि स्वच्छ ऊर्जा स्रोतांचं वापर करावं लागेल, जसं की सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा.

वाहतूकींच्या प्रकारांमध्ये सुधारणा करावा लागेल, जसं की जलद्रव्याचं वापर कमी करणं, पर्यावरणसाठी साठी नके वापर करणं आणि वाहनांमध्ये विद्युत चालक वापरणं. प्रदूषणाचं विरोध करण्यात सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे, कारण एकटे होण्याने ह्या समस्येचं नियंत्रण केलं जाऊ शकतं.

तसेच, विविध शैक्षणिक अभ्यासांतून लोकांना प्रदूषणाच्या परिणामांची जागरूकता व त्याचा नियंत्रण कसा करावा याबद्दलचं जाणे आवश्यक आहे.

सर्वांना सामाजिक जिम्मेवारी म्हणजे प्रदूषणाचं संघर्ष करावं आणि स्वच्छ आणि स्वस्थ वातावरण जगण्याचं प्रयत्न करावं, ज्यामुळे आपल्या भविष्यासाठी एक अचूक अधिकारी वाचता येईल.

प्रदूषण एक समस्या निबंध विडियो माध्यमातून 

Video credit : Adhiradeck Youtube channel

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :

प्रदूषण एक समस्या

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध, प्रदूषण एक समस्या व उपाय,  प्रदूषण : एक गंभीर समस्या, प्रदूषण की समस्या पर निबंध, pradushan ki samasya par nibandh..

आमच्या इतर निबंध पोस्ट :

Mobile Che Manogat Marathi Nibandh। मोबाईलचे मनोगत मराठी निबंध

Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh। मला पंख असते तर मराठी निबंध

माझी शाळा निबंध मराठी। Majhi Shala Nibandh Marathi

माझा आवडता कवी निबंध मराठी । Majha Avadata Kavi Nibandh Marathi

संगणक काळाची गरज निबंध मराठी । Sanganak Kalachi Garaj Nibandh In Marathi

गुरु शिष्य परंपरा निबंध । Guru Shishya Paranpara Essay 

1 ) प्रदूषण एक समस्या निबंध मराठी   हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची  कॉमेंट   महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to email a link to a friend (Opens in new window)

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

pradushan ek samasya in marathi essay | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

प्रदूषणाची समस्या मराठी निबंध, प्रदूषणाची समस्या मराठी निबंध.

' src=

MarathiPro

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

  • Chetan Jasud
  • January 30, 2023
  • मराठी निबंध , Trending

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

Essay on Pollution in Marathi आपण ह्या पोस्टमध्ये, प्रदूषण वर आधारित निबंध – प्रदूषण एक जागतिक समस्या हा निबंध पहाणार आहोत. प्रदूषण हि एक जगाला भेडसावणारी महत्वाची समस्या आहे, ह्या गोष्टीचा मानवजातीवर खूप परिणाम होत आहेत. Essay on Pollution in Marathi मध्ये आपण बहुतांश समस्या आणि निवारण यावर बोलणार आहोत.

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

सध्या जगासमोर थैमान घालणारी एक समस्या आहे ती म्हणजे प्रदूषण, याला पर्यावरणीय प्रदूषण असेही म्हणतात. प्रदूषण म्हणजे कोणताही पदार्थ (घन, द्रव किंवा वायू) किंवा ऊर्जा कोणत्याही स्वरूपात (जसे की उष्णता, ध्वनी किंवा किरणोत्सारी) वातावरणात पुनर्वापर, निरुपद्रवी स्वरूपात साठवून किंवा विघटित करण्यापेक्षा वेगाने सोडणे होय. .

खरंतर प्रदूषण ही आपल्या जीवनातील एक प्रमुख समस्या आहे, ज्याचा आपल्या पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. हा एक मुद्दा आहे ज्यावर दीर्घकाळ चर्चा होत आहे आणि त्याचे घातक परिणाम 21 व्या शतकात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. आणि याचे परिणाम रोखण्यासाठी विविध देशांच्या सरकारांनी अनेक मोठी पावले उचलली असली तरी अजून मात्र ही समस्या मोठया प्रमाणात भेडसावत आहे.यामुळे अनेक नैसर्गिक जीवांना त्रास होतो. एवढेच नाही तर आज अनेक वनस्पती आणि प्राणी एकतर नामशेष झाले आहेत किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

प्रदूषणाच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाल्यामुळे, प्राणी केवळ त्यांचे घरच नाही तर राहण्यासाठी निसर्ग देखील गमावत आहेत. जगभरातील अनेक प्रमुख शहरांवर प्रदूषणाचा परिणाम झाला आहे. यातील बहुतांश प्रदूषित शहरे भारतातच आहेत. जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली, कानपूर, बामेंडा, मॉस्को, हेझ, चेरनोबिल, बीजिंग यांचा समावेश आहे. या शहरांनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अनेक पावले उचलली असली तरी त्यांना अजून बराच .पल्ला गाठायचा आहे. या ठिकाणची हवेची गुणवत्ता खराब असून जमीन आणि जलप्रदूषणाची प्रकरणेही वाढत आहेत. या शहरांतील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आताच्या प्रशासनाने ठोस धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.

एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) हा एक निर्देशांक आहे जो सरकारी एजन्सीद्वारे वायू प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी वापरला जातो जेणेकरुन सामान्य लोकांना हवेच्या गुणवत्तेची जाणीव होऊ शकेल. जसजसा AQI वाढतो, त्याचा अर्थ असा होतो की मोठ्या लोकसंख्येला आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होणार आहेत.

एअर क्वालिटी इंडेक्स ( AQI ) लोकांना स्थानिक हवेच्या गुणवत्तेचा त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यात मदत होते. पर्यावरण संरक्षण एजन्सी (EPA) पाच प्रमुख वायू प्रदूषकांसाठी AQI ची गणना करते ज्यासाठी सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय वायु गुणवत्ता मानके स्थापित केली गेली आहेत.

प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी विविध शहरांचे अधिकारी प्रयत्नशील असले तरी अशा परिस्थितीत या प्रक्रियेत हातभार लावणे हे नागरिकांचे आणि सर्वसामान्यांचे कर्तव्य आहे. सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी खालील काही महत्वाचे उपाय आहेत.

फटाके वापरणे थांबवा: जेव्हा तुम्ही दसरा, दिवाळी किंवा इतर कोणतेही सण साजरे करता तेव्हा फटाक्यांना नाही म्हणा. त्यामुळे ध्वनी, माती तसेच प्रकाश प्रदूषण होते. तसेच त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

वाहनांच्या वापरावर मर्यादा घाला : वाहने हे प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. वाहनांचा वापर कमीत कमी करा. शक्य असल्यास, वैयक्तिक वापरासाठी त्यांना इलेक्ट्रिक वाहनांसह बदलण्याचा प्रयत्न करा. प्रवासासाठी शक्य तितक्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.

आपला परिसर स्वच्छ ठेवा : एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कचरा इकडे-तिकडे टाकण्यापेक्षा तो डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे.

रीसायकल आणि पुनर्वापर – अनेक नॉन-बायोडिग्रेडेबल उत्पादने जसे की प्लास्टिकपासून बनवलेल्या दैनंदिन वापरातील वस्तू आपल्या पर्यावरणाला हानी पोहोचवतात. आम्हाला त्यांचे योग्य प्रकारे विघटन करावे लागेल किंवा पुनर्वापरासाठी पाठवावे लागेल. आजकाल, सरकार प्लॅस्टिकच्या पुनर्वापरासाठी अनेक योजना राबवत आहे, जेथे नागरिक केवळ त्यांच्या प्लास्टिकचा कचरा दान करू शकत नाहीत, तर इतर वस्तूंसाठी त्याची देवाणघेवाण देखील करू शकतात.

झाडे लावा: रस्त्यांचे रुंदीकरण, घरे बांधणे आदी विविध कारणांमुळे झाडे तोडल्याने विविध प्रकारचे प्रदूषण वाढले आहे. वातावरणातील कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड इत्यादी हानिकारक वायू वनस्पती शोषून घेतात. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेदरम्यान ते ऑक्सिजन सोडत असल्याने, आपल्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे आणि त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

प्रदूषण ही अशीच एक समस्या आहे जी आपण लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहे जेणेकरून मानव या ग्रहावर सुरक्षितपणे जगू शकतील. ही समस्या टाळण्यासाठी आम्ही सुचवलेल्या उपायांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. आपले घर राहण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवणे ही आपली जबाबदारी आहे. पृथ्वी जिवंत ठेवायची असेल तर तिचे प्रदूषण थांबवले पाहिजे.

मराठी निबंध- प्रदूषण (कमी शब्दात)

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

प्रदूषण म्हणजे पर्यावरणातील हानिकारक पदार्थ किंवा कचऱ्याची उपस्थिती, ज्यामुळे सजीवांना आणि नैसर्गिक जगाला हानी पोहोचते. हे पदार्थ रसायने, वायू किंवा अगदी आवाज असू शकतात. कारखाने, कार आणि घरातील कचरा यासारख्या अनेक स्रोतांमधून प्रदूषण होऊ शकते.

प्रदूषणाचे परिणाम गंभीर आणि व्यापक आहेत. यामुळे लोक आणि प्राणी दोघांच्याही आरोग्याच्या समस्या, नैसर्गिक अधिवासांचे नुकसान आणि जैवविविधतेचे नुकसान होऊ शकते. याव्यतिरिक्त, प्रदूषणामुळे पिके आणि अन्न पुरवठ्यालाही हानी पोहोचू शकते, ज्यामुळे अन्न सुरक्षा आणि संसाधनांच्या प्रवेशामध्ये आणखी समस्या निर्माण होतात.

प्रदूषणाचा सामना करण्यासाठी, व्यक्ती आणि सरकार कारवाई करू शकतात. उदाहरणार्थ, लोक कचरा कमी करून आणि संसाधनांचे संरक्षण करून स्वतःचा प्रभाव कमी करू शकतात, तर सरकार उद्योगांचे नियम तयार करू शकतात आणि प्रदूषण कमी करण्यासाठी कायदे लागू करू शकतात. स्वच्छ तंत्रज्ञान आणि पुनर्निर्मिती करता येणारे म्हणजेच रिनेव्हेबल ऊर्जा स्रोत देखील प्रदूषण पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.

प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, कारण ते पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सध्याच्या पिढीला पुरेल इतके संसाधनांचा वापराची चालना देण्यासाठी पावले उचलून, आम्ही स्वतःसाठी आणि ग्रहासाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करू शकतो.

Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या – मित्रानो आशा आहे कि तुम्हाला वरील निबंध नक्की आवडले असतील. जर तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवे असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की सुचवा.

फटाके वापरणे थांबवा: जेव्हा तुम्ही दसरा, दिवाळी किंवा इतर कोणतेही सण साजरे करता तेव्हा फटाक्यांना नाही म्हणा. त्यामुळे ध्वनी, माती तसेच प्रकाश प्रदूषण होते. तसेच त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वाहनांच्या वापरावर मर्यादा घाला : वाहने हे प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. वाहनांचा वापर कमीत कमी करा. शक्य असल्यास, वैयक्तिक वापरासाठी त्यांना इलेक्ट्रिक वाहनांसह बदलण्याचा प्रयत्न करा. प्रवासासाठी शक्य तितक्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आपला परिसर स्वच्छ ठेवा : एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कचरा इकडे-तिकडे टाकण्यापेक्षा तो डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे. रीसायकल आणि पुनर्वापर : अनेक नॉन-बायोडिग्रेडेबल उत्पादने जसे की प्लास्टिकपासून बनवलेल्या दैनंदिन वापरातील वस्तू आपल्या पर्यावरणाला हानी पोहोचवतात. आम्हाला त्यांचे योग्य प्रकारे विघटन करावे लागेल किंवा पुनर्वापरासाठी पाठवावे लागेल. आजकाल, सरकार प्लॅस्टिकच्या पुनर्वापरासाठी अनेक योजना राबवत आहे, जेथे नागरिक केवळ त्यांच्या प्लास्टिकचा कचरा दान करू शकत नाहीत, तर इतर वस्तूंसाठी त्याची देवाणघेवाण देखील करू शकतात.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१.  शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

२.  माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे

३.  झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

४.  छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

Chetan Jasud

मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.

' src=

Related articles

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

  • मराठी निबंध

New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध

  • May 7, 2023

Baby Girl Names in Marathi Starting A to Z | 700+ Unique Marathi

  • मराठी स्पेशल

Baby Girl Names in Marathi Starting A to Z | 700+ Unique Marathi

  • April 1, 2023

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध

  • February 5, 2023

वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध

वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer

  • January 28, 2023

Quarter Meaning in Marathi | Quarterly meaning in Marathi

  • इंग्रजी प्रो

Quarter Meaning in Marathi | Quarterly meaning in Marathi

  • January 27, 2023

MarathiBlog

[2023] प्रदूषण एक समस्या निबंध मराठी | Pradushan Nibandh In Marathi

प्रदूषण एक समस्या निबंध मराठी:  मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला  प्रदूषण एक समस्या निबंध मराठी (Pradushan Nibandh In Marathi) , प्रदूषण एक समस्या निबंध मराठी 20 ओळी, प्रदूषण एक समस्या निबंध मराठी 10 ओळी ,  प्रदूषण एक समस्या निबंध मराठी 300 शब्द , या विषयावर माहिती देणार आहे.

तसेच मी तुम्हाला  प्रदूषण एक समस्या निबंध मराठी  सांगणार आहे. तर मित्रांनो सुरु करूया आजचा आर्टिकल म्हणजेच, Pradushan Nibandh In Marathi.

Pradushan Nibandh In Marathi

प्रदूषण ही एक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय समस्या आहे जी अनेक दशकांपासून मानव आणि नैसर्गिक जगाच्या आरोग्यावर आणि कल्याणावर परिणाम करत आहे.

वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि जमीन प्रदूषण यासह प्रदूषण अनेक रूपे घेऊ शकते. प्रदूषणाचे नकारात्मक परिणाम प्रत्येकाला आणि ग्रहावरील प्रत्येकाला जाणवतात आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण पावले उचलणे महत्त्वाचे आहे.

प्रदूषणाच्या सर्वात लक्षणीय प्रकारांपैकी एक म्हणजे वायू प्रदूषण, जे मानवी क्रियाकलापांद्वारे हवेत हानिकारक पदार्थ सोडल्यामुळे होते. हे प्रदूषक कारखाने, कार आणि पॉवर प्लांट यांसारख्या स्रोतांमधून येऊ शकतात.

वायू प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या, हृदयविकार आणि मानवांमध्ये इतर आरोग्य समस्या तसेच पिकांचे आणि इतर वनस्पतींच्या जीवनाचे नुकसान होऊ शकते.

औद्योगिक कचरा, शेतीतील वाहून जाणारे पाणी आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी यासारख्या मानवी क्रियाकलापांमुळे होणारी जलप्रदूषण ही आणखी एक मोठी समस्या आहे. या प्रदूषणामुळे जलजन्य रोग होतात, जलचरांना हानी पोहोचते आणि आपले पिण्याचे पाणी दूषित होते.

प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

अयोग्य कचरा विल्हेवाट, औद्योगिक क्रियाकलाप आणि इतर मानवी कृतींमुळे जमीन प्रदूषण ही देखील एक महत्त्वपूर्ण समस्या आहे. यामुळे मातीची गुणवत्ता खराब होऊ शकते, जैवविविधता नष्ट होते आणि जमिनीचा ऱ्हास देखील होतो.

प्रदूषणाचा सामना करण्यासाठी, आपण एक सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे ज्यामध्ये वैयक्तिक कृती आणि सरकारी धोरणे यांचा समावेश असेल.

यामध्ये जीवाश्म इंधनावरील आपली अवलंबित्व कमी करणे आणि अक्षय ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि शेती आणि उद्योगातील शाश्वत पद्धतींना समर्थन देणे समाविष्ट असू शकते.

प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे ज्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. पर्यावरणावरील आपला प्रभाव कमी करण्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या भूमिका केल्या पाहिजेत.

आणि आपल्या पुढाऱ्यांना भावी पिढ्यांसाठी आपल्या ग्रहाचे संरक्षण करण्यासाठी धाडसी कृती करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. एकत्र काम करून, आपण सर्वांसाठी स्वच्छ आणि निरोगी जग निर्माण करू शकतो.

प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

वैयक्तिक आणि सरकारी कृती व्यतिरिक्त, व्यवसाय आणि उद्योग देखील प्रदूषण कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कंपन्या पर्यावरणास अनुकूल सामग्री वापरणे आणि त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत कचरा कमी करणे यासारख्या टिकाऊ पद्धती लागू करू शकतात. सरकार या कृतींना कर सूट आणि इतर लाभांद्वारे प्रोत्साहन देऊ शकते.

प्रदूषण कमी करण्यासाठी शिक्षण आणि जनजागृती मोहिमाही प्रभावी ठरू शकतात. प्रदूषणाचा पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल लोकांना माहिती देऊन, व्यक्ती कृती करण्याची आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात बदल करण्याची अधिक शक्यता असते.

शिवाय, जागतिक प्रदूषणाला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. वायू प्रदूषण, उदाहरणार्थ, एका देशापुरते मर्यादित नाही आणि ते कमी करण्यासाठी अनेक राष्ट्रांमध्ये समन्वयित प्रयत्नांची आवश्यकता आहे.

प्रदूषण ही एक जटिल समस्या आहे ज्यासाठी समाजाच्या सर्व क्षेत्रांकडून कृती आवश्यक आहे. एकत्र काम करून, आपण प्रदूषण कमी करू शकतो आणि स्वतःसाठी आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण तयार करू शकतो.

प्रदूषण एक समस्या निबंध मराठी 10 ओळी

प्रदूषणाचा सामना करण्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. तंत्रज्ञानातील प्रगतीमध्ये प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी करण्याची आणि त्याचे नकारात्मक परिणाम कमी करण्याची क्षमता आहे.

उदाहरणार्थ, इलेक्ट्रिक कार आणि अक्षय ऊर्जा स्त्रोत जसे की सौर आणि पवन उर्जा वाहतूक आणि वीज निर्मितीमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करू शकतात.

याव्यतिरिक्त, तांत्रिक उपाय जसे की कार्बन कॅप्चर आणि स्टोरेज, सांडपाणी प्रक्रिया आणि कचऱ्यापासून ऊर्जा रूपांतरण उद्योग आणि कचरा विल्हेवाट लावणारे प्रदूषण कमी करण्यात मदत करू शकतात.

तथापि, हे ओळखणे महत्त्वाचे आहे की प्रदूषणाचा सामना करण्यासाठी केवळ तांत्रिक उपाय पुरेसे नाहीत. प्रदूषक पद्धती आणि सामग्रीवरील आमची अवलंबित्व कमी करण्यासाठी वर्तनात्मक आणि पद्धतशीर बदलांसह ते असणे आवश्यक आहे.

शेवटी, हे ओळखणे अत्यावश्यक आहे की प्रदूषण कमी उत्पन्न असलेल्या शेजारच्या आणि रंगीबेरंगी समुदायांसह उपेक्षित समुदायांना विषमतेने प्रभावित करते.

त्यामुळे प्रदूषणावर उपाय म्हणून प्रत्येकाला स्वच्छ हवा, पाणी आणि जमीन उपलब्ध आहे याची खात्री करण्यासाठी सामाजिक आणि पर्यावरणीय न्यायाला सामोरे जावे लागेल.

प्रदूषणाला संबोधित करणे ही एक बहुआयामी समस्या आहे ज्यासाठी वैयक्तिक, सरकार, व्यवसाय आणि तांत्रिक कृती यांचे संयोजन आवश्यक आहे. सर्वांसाठी एक शाश्वत आणि न्याय्य जग निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक आणि न्याय्य पद्धतीने संपर्क साधला पाहिजे.

प्रदूषण एक समस्या निबंध मराठी 20 ओळी

प्रदूषणाला संबोधित करण्याच्या मुख्य दृष्टिकोनांपैकी एक म्हणजे नियम आणि धोरणांची अंमलबजावणी करणे जे प्रदूषण मर्यादित करतात आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देतात.

कंपन्या पर्यावरणात सोडू शकतील अशा प्रदूषकांचे प्रमाण मर्यादित करण्यासाठी सरकार कायदे आणि नियम स्थापित करू शकतात, तसेच अक्षय ऊर्जेचा वापर आणि कचरा कमी करणे यासारख्या शाश्वत पद्धतींसाठी प्रोत्साहन देऊ शकतात.

तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की केवळ नियमनच प्रदूषणाला तोंड देण्यासाठी पुरेसे असू शकत नाहीत. कंपन्यांना त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरले जाईल याची खात्री करण्यासाठी पुरेशी अंमलबजावणी यंत्रणा आणि पालन न केल्याबद्दल दंड देखील असणे आवश्यक आहे.

प्रदूषणाचा सामना करण्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे विविध भागधारकांमधील सहकार्य. यामध्ये सरकारी संस्था, व्यवसाय, ना-नफा संस्था आणि समुदाय गट यांचा समावेश होतो.

एकत्र काम करून, हे भागधारक प्रदूषणाची मूळ कारणे आणि त्याचे परिणाम यावर उपाय शोधू शकतात आणि प्रभावी उपाय विकसित करू शकतात.

प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अधिक शाश्वत आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेकडे वळणे आवश्यक आहे. याचा अर्थ कचरा कमी करणे, सामग्रीचा पुनर्वापर करणे आणि पुनर्वापर करणे आणि उत्पादनांचे जीवन-अखेर लक्षात घेऊन डिझाइन करणे.

वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन अवलंबून, आपण आर्थिक संधी निर्माण करताना प्रदूषण कमी करू शकतो आणि संसाधनांचे संरक्षण करू शकतो.

प्रदूषणाचा सामना करणे ही एक जटिल आणि बहुआयामी समस्या आहे ज्यासाठी समाजाच्या सर्व क्षेत्रांकडून समन्वित प्रयत्न आवश्यक आहेत.

धोरणे आणि नियमांची अंमलबजावणी करून, शाश्वत पद्धतींचा अवलंब करून, भागधारकांमध्ये सहयोग करून आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेकडे संक्रमण करून, आपण स्वतःसाठी आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण तयार करू शकतो.

प्रदूषण एक समस्या निबंध मराठी 300 शब्द

प्रदूषणाचा सामना करण्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे व्यक्ती आणि समुदाय यांचा सहभाग. सरकारी धोरणे आणि नियम महत्त्वपूर्ण असताना, वैयक्तिक कृती देखील महत्त्वपूर्ण प्रभाव पाडू शकतात.

एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकचा वापर कमी करणे, ऊर्जा वाचवणे आणि सार्वजनिक वाहतूक किंवा कारपूलिंग वापरणे यासारख्या जाणीवपूर्वक निवडी करून, व्यक्ती प्रदूषण कमी करण्यात योगदान देऊ शकतात.

प्रदूषणाला संबोधित करण्यासाठी समुदायाचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे, विशेषत: प्रदूषणाने विषमतेने प्रभावित झालेल्या उपेक्षित समुदायांमध्ये.

समुदायाचे सदस्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात आणि त्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी फायदेशीर धोरणे आणि उपायांसाठी समर्थन करू शकतात.

शिवाय, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी शिक्षण आणि जनजागृती मोहिमा महत्त्वाच्या आहेत. माहिती प्रदान करून आणि वर्तनातील बदलांना प्रोत्साहन देऊन, व्यक्तींना कारवाई करण्यासाठी आणि फरक करण्यासाठी सक्षम केले जाऊ शकते.

हे ओळखणे महत्त्वाचे आहे की प्रदूषणाचे निराकरण करणे ही केवळ पर्यावरणीय समस्या नाही तर सार्वजनिक आरोग्याची समस्या देखील आहे.

प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाच्या आजारांपासून कर्करोगापर्यंत अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात आणि त्यावर उपाय केल्यास सार्वजनिक आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकतात.

शेवटी, प्रदूषणाला संबोधित करण्यासाठी बहु-आयामी दृष्टीकोन आवश्यक आहे ज्यामध्ये सरकारी धोरणे, तांत्रिक उपाय, व्यवसाय पद्धती, समुदायाचा सहभाग, वैयक्तिक कृती आणि शिक्षण आणि जागरूकता मोहिमा यांचा समावेश आहे.

एकत्र काम करून आणि कृती करून, आपण प्रदूषण कमी करू शकतो आणि स्वतःसाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण तयार करू शकतो.

आज काय शिकलो:

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला  प्रदूषण एक समस्या निबंध मराठी (Pradushan Nibandh In Marathi) , प्रदूषण एक समस्या निबंध मराठी 20 ओळी, प्रदूषण एक समस्या निबंध मराठी 10 ओळी ,  प्रदूषण एक समस्या निबंध मराठी 300 शब्द , याच्या बद्दल माहिती दिली आहे. तसेच मी तुम्हाला  Pradushan Nibandh In Marathi  या विषयावर सुद्धा माहिती दिली आहे. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या आर्टिकल मध्ये एका नवीन विषयावर नविन माहिती सोबत.

हे पण वाचा:

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

essay in pradushan in marathi

  • Tips & Guides

Sound Pollution Information in Marathi Essay | Dhwani Pradushan in Marathi

  • by Pratiksha More
  • Mar 19, 2024 Mar 19, 2024

noise pollution information in marathi

Sound Pollution in Marathi

Dhwani pradushan marathi nibandh : जल प्रदूषण निबंध.

Noise Pollution in Marathi Project / ध्वनी प्रदूषण :

• ध्वनी प्रदूषण मोठ्या व अनुपयोगी आवाजाला म्हणतात, व याचा त्रास माणूस व जनावरे दोघांनाही होतो. • ध्वनी प्रदूषण हि जास्त करून मानवनिर्मित समस्या आहे. • ध्वनी प्रदूषण हे शहरी भागात जास्त असते. • निरंतर वाढणाऱ्या ध्वनी प्रदुषणामुळे आपण वर्तमान आणि भविष्य पिढीचे जीवन धोख्यात घालत आहोत.

ध्वनी प्रदूषणाची कारणे -:

• वाहतुकीदरम्यान होणारा आवाज हे ध्वनी प्रदुषणाचे मुख्य कारण आहे. • दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे वाहने व त्यामुळे होणारी वाहतूकही वाढत आहे. व त्याचाच परिणाम ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे • जगभरात सगळ्यात जास्त ध्वनी मोटार वाहन यात विमानाचा आवाज आणि रेल्वेचाआवाज यांचा समावेश आहे. • खराब शहरी नियोजनामुळे ध्वनी प्रदूषणास हातभार लागतो. • मोठमोठे कारखाने, मिलमधूनही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असते. • दैनिक जीवनात घरेलू उपकरणांचा उपयोगातही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. • भारतात शहरीकरण आणि औद्योगीकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण वाढले आहे. • सामान्य जीवनातील उत्सवात उदा. लग्न, पार्टी, पब, क्लब तसेच पूजा स्थान, मस्जिद तथा आदिवासी भागात ध्वनी प्रदूषण होत असते.

ध्वनी प्रदुषणाचे परिणाम -:

• आवाजामुळे माणसाची ऐकण्याची शक्ती कमी होण्याचा धोका असतो. • नको असलेले मोठे आवाज शारीरिक आणि मानसिक नुकसान पोहोचऊ शकतात. • ध्वनी प्रदुषणामुळे उच्च रक्तदाब, चिडचिड आणि आक्रमकता, ताण पातळी, टस, सुनावणी तोटा, झोप न लागणे, इत्यादी आजार मोठ्या होऊ शकतात. • तसेच ध्वनी प्रदुषणामुळे हृदय रोगालाही निमंत्रण असते. • वृद्ध माणसांना आणि लहान मुलांना ध्वनी प्रदुषणाचा जास्त परिणाम होतो. • प्रतिदिन वाढणाऱ्या ध्वनी प्रदुषणामुळे माणसाच्या काम करण्याच्या क्षमतेवर आणि गुणवत्तेवर परिणाम करते. • ध्वनी प्रदुषणामुळे एकाग्रता नष्ट होते. • गर्भवती महिलांवर याचा जास्त परिणाम होतो, त्या चिडचिड्या बनतात व यामुळे गर्भपातही उद्भवू शकतो. • आवाजाची तीव्रता ८० डेसिबल ते १०० डेसिबल असल्यास माणसाला किंवा प्राण्यांना बहिरेपण येऊ शकते. • मोठ्या आवाजाने जुन्या पुराण्या इमारती, जुने पूल कोसळण्याची भीती संभवते. • मोठ्या ध्वनी प्रदुषणामुळे पशु-पक्षी आपल्या मेंदूवरील नियंत्रण गमावतात आणि ते खतरनाक बनू शकतात. • मोठा आवाज सजीवांच्या नर्व्हस सिस्टिमला हानी पोहोचवू शकते.

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी उपाय -:

• ध्वनी प्रदूषणाविरोधात लोकांमध्ये जनजागृती करणे. • ध्वनी प्रदूषणाचा प्रत्येक नियम गंभीरतेने पाळणे. • कमी आवाज करणाऱ्या वाहनांचा वापर करणे. • रुग्णालये, शाळा-विद्यालये इत्यादी ठिकाणी वाहनांचा आवाज करू नये. • घरात किंवा बाहेर बाहेर मोठा आवाज करणारी उपकरणांचा कमी प्रमाणात उपयोग करावा. • आवाजाच्या योग्य नियोजनाने ध्वनी प्रदूषणापासून मुक्ती मिळू शकते.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Sound Pollution Information in Marathi Language Wikipedia / Mahiti Essay Nibandh

Related posts, 3 thoughts on “sound pollution information in marathi essay | dhwani pradushan in marathi”.

Sound prdushan in Marathi

Tell me mahatwa

WALGAON ROAD

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

essay in pradushan in marathi

  • CBSE Class 10th

CBSE Class 12th

  • UP Board 10th
  • UP Board 12th
  • Bihar Board 10th
  • Bihar Board 12th
  • Top Schools in India
  • Top Schools in Delhi
  • Top Schools in Mumbai
  • Top Schools in Chennai
  • Top Schools in Hyderabad
  • Top Schools in Kolkata
  • Top Schools in Pune
  • Top Schools in Bangalore

Products & Resources

  • JEE Main Knockout April
  • Free Sample Papers
  • Free Ebooks
  • NCERT Notes

NCERT Syllabus

  • NCERT Books
  • RD Sharma Solutions
  • Navodaya Vidyalaya Admission 2024-25

NCERT Solutions

  • NCERT Solutions for Class 12
  • NCERT Solutions for Class 11
  • NCERT solutions for Class 10
  • NCERT solutions for Class 9
  • NCERT solutions for Class 8
  • NCERT Solutions for Class 7
  • JEE Main 2024
  • MHT CET 2024
  • JEE Advanced 2024
  • BITSAT 2024
  • View All Engineering Exams
  • Colleges Accepting B.Tech Applications
  • Top Engineering Colleges in India
  • Engineering Colleges in India
  • Engineering Colleges in Tamil Nadu
  • Engineering Colleges Accepting JEE Main
  • Top IITs in India
  • Top NITs in India
  • Top IIITs in India
  • JEE Main College Predictor
  • JEE Main Rank Predictor
  • MHT CET College Predictor
  • AP EAMCET College Predictor
  • GATE College Predictor
  • KCET College Predictor
  • JEE Advanced College Predictor
  • View All College Predictors
  • JEE Main Question Paper
  • JEE Main Cutoff
  • JEE Main Advanced Admit Card
  • JEE Advanced Admit Card 2024
  • Download E-Books and Sample Papers
  • Compare Colleges
  • B.Tech College Applications
  • KCET Result
  • MAH MBA CET Exam
  • View All Management Exams

Colleges & Courses

  • MBA College Admissions
  • MBA Colleges in India
  • Top IIMs Colleges in India
  • Top Online MBA Colleges in India
  • MBA Colleges Accepting XAT Score
  • BBA Colleges in India
  • XAT College Predictor 2024
  • SNAP College Predictor
  • NMAT College Predictor
  • MAT College Predictor 2024
  • CMAT College Predictor 2024
  • CAT Percentile Predictor 2023
  • CAT 2023 College Predictor
  • CMAT 2024 Admit Card
  • TS ICET 2024 Hall Ticket
  • CMAT Result 2024
  • MAH MBA CET Cutoff 2024
  • Download Helpful Ebooks
  • List of Popular Branches
  • QnA - Get answers to your doubts
  • IIM Fees Structure
  • AIIMS Nursing
  • Top Medical Colleges in India
  • Top Medical Colleges in India accepting NEET Score
  • Medical Colleges accepting NEET
  • List of Medical Colleges in India
  • List of AIIMS Colleges In India
  • Medical Colleges in Maharashtra
  • Medical Colleges in India Accepting NEET PG
  • NEET College Predictor
  • NEET PG College Predictor
  • NEET MDS College Predictor
  • NEET Rank Predictor
  • DNB PDCET College Predictor
  • NEET Admit Card 2024
  • NEET PG Application Form 2024
  • NEET Cut off
  • NEET Online Preparation
  • Download Helpful E-books
  • Colleges Accepting Admissions
  • Top Law Colleges in India
  • Law College Accepting CLAT Score
  • List of Law Colleges in India
  • Top Law Colleges in Delhi
  • Top NLUs Colleges in India
  • Top Law Colleges in Chandigarh
  • Top Law Collages in Lucknow

Predictors & E-Books

  • CLAT College Predictor
  • MHCET Law ( 5 Year L.L.B) College Predictor
  • AILET College Predictor
  • Sample Papers
  • Compare Law Collages
  • Careers360 Youtube Channel
  • CLAT Syllabus 2025
  • CLAT Previous Year Question Paper
  • NID DAT Exam
  • Pearl Academy Exam

Predictors & Articles

  • NIFT College Predictor
  • UCEED College Predictor
  • NID DAT College Predictor
  • NID DAT Syllabus 2025
  • NID DAT 2025
  • Design Colleges in India
  • Top NIFT Colleges in India
  • Fashion Design Colleges in India
  • Top Interior Design Colleges in India
  • Top Graphic Designing Colleges in India
  • Fashion Design Colleges in Delhi
  • Fashion Design Colleges in Mumbai
  • Top Interior Design Colleges in Bangalore
  • NIFT Result 2024
  • NIFT Fees Structure
  • NIFT Syllabus 2025
  • Free Design E-books
  • List of Branches
  • Careers360 Youtube channel
  • IPU CET BJMC
  • JMI Mass Communication Entrance Exam
  • IIMC Entrance Exam
  • Media & Journalism colleges in Delhi
  • Media & Journalism colleges in Bangalore
  • Media & Journalism colleges in Mumbai
  • List of Media & Journalism Colleges in India
  • CA Intermediate
  • CA Foundation
  • CS Executive
  • CS Professional
  • Difference between CA and CS
  • Difference between CA and CMA
  • CA Full form
  • CMA Full form
  • CS Full form
  • CA Salary In India

Top Courses & Careers

  • Bachelor of Commerce (B.Com)
  • Master of Commerce (M.Com)
  • Company Secretary
  • Cost Accountant
  • Charted Accountant
  • Credit Manager
  • Financial Advisor
  • Top Commerce Colleges in India
  • Top Government Commerce Colleges in India
  • Top Private Commerce Colleges in India
  • Top M.Com Colleges in Mumbai
  • Top B.Com Colleges in India
  • IT Colleges in Tamil Nadu
  • IT Colleges in Uttar Pradesh
  • MCA Colleges in India
  • BCA Colleges in India

Quick Links

  • Information Technology Courses
  • Programming Courses
  • Web Development Courses
  • Data Analytics Courses
  • Big Data Analytics Courses
  • RUHS Pharmacy Admission Test
  • Top Pharmacy Colleges in India
  • Pharmacy Colleges in Pune
  • Pharmacy Colleges in Mumbai
  • Colleges Accepting GPAT Score
  • Pharmacy Colleges in Lucknow
  • List of Pharmacy Colleges in Nagpur
  • GPAT Result
  • GPAT 2024 Admit Card
  • GPAT Question Papers
  • NCHMCT JEE 2024
  • Mah BHMCT CET
  • Top Hotel Management Colleges in Delhi
  • Top Hotel Management Colleges in Hyderabad
  • Top Hotel Management Colleges in Mumbai
  • Top Hotel Management Colleges in Tamil Nadu
  • Top Hotel Management Colleges in Maharashtra
  • B.Sc Hotel Management
  • Hotel Management
  • Diploma in Hotel Management and Catering Technology

Diploma Colleges

  • Top Diploma Colleges in Maharashtra
  • UPSC IAS 2024
  • SSC CGL 2024
  • IBPS RRB 2024
  • Previous Year Sample Papers
  • Free Competition E-books
  • Sarkari Result
  • QnA- Get your doubts answered
  • UPSC Previous Year Sample Papers
  • CTET Previous Year Sample Papers
  • SBI Clerk Previous Year Sample Papers
  • NDA Previous Year Sample Papers

Upcoming Events

  • NDA Application Form 2024
  • UPSC IAS Application Form 2024
  • CDS Application Form 2024
  • CTET Admit card 2024
  • HP TET Result 2023
  • SSC GD Constable Admit Card 2024
  • UPTET Notification 2024
  • SBI Clerk Result 2024

Other Exams

  • SSC CHSL 2024
  • UP PCS 2024
  • UGC NET 2024
  • RRB NTPC 2024
  • IBPS PO 2024
  • IBPS Clerk 2024
  • IBPS SO 2024
  • Top University in USA
  • Top University in Canada
  • Top University in Ireland
  • Top Universities in UK
  • Top Universities in Australia
  • Best MBA Colleges in Abroad
  • Business Management Studies Colleges

Top Countries

  • Study in USA
  • Study in UK
  • Study in Canada
  • Study in Australia
  • Study in Ireland
  • Study in Germany
  • Study in China
  • Study in Europe

Student Visas

  • Student Visa Canada
  • Student Visa UK
  • Student Visa USA
  • Student Visa Australia
  • Student Visa Germany
  • Student Visa New Zealand
  • Student Visa Ireland
  • CUET PG 2024
  • IGNOU B.Ed Admission 2024
  • DU Admission 2024
  • UP B.Ed JEE 2024
  • LPU NEST 2024
  • IIT JAM 2024
  • IGNOU Online Admission 2024
  • Universities in India
  • Top Universities in India 2024
  • Top Colleges in India
  • Top Universities in Uttar Pradesh 2024
  • Top Universities in Bihar
  • Top Universities in Madhya Pradesh 2024
  • Top Universities in Tamil Nadu 2024
  • Central Universities in India
  • CUET Exam City Intimation Slip 2024
  • IGNOU Date Sheet
  • CUET Mock Test 2024
  • CUET Admit card 2024
  • CUET Result 2024
  • CUET Participating Universities 2024
  • CUET Previous Year Question Paper
  • CUET Syllabus 2024 for Science Students
  • E-Books and Sample Papers
  • CUET Exam Pattern 2024
  • CUET Exam Date 2024
  • CUET Cut Off 2024
  • CUET Exam Analysis 2024
  • IGNOU Exam Form 2024
  • CUET 2024 Exam Live
  • CUET Answer Key 2024

Engineering Preparation

  • Knockout JEE Main 2024
  • Test Series JEE Main 2024
  • JEE Main 2024 Rank Booster

Medical Preparation

  • Knockout NEET 2024
  • Test Series NEET 2024
  • Rank Booster NEET 2024

Online Courses

  • JEE Main One Month Course
  • NEET One Month Course
  • IBSAT Free Mock Tests
  • IIT JEE Foundation Course
  • Knockout BITSAT 2024
  • Career Guidance Tool

Top Streams

  • IT & Software Certification Courses
  • Engineering and Architecture Certification Courses
  • Programming And Development Certification Courses
  • Business and Management Certification Courses
  • Marketing Certification Courses
  • Health and Fitness Certification Courses
  • Design Certification Courses

Specializations

  • Digital Marketing Certification Courses
  • Cyber Security Certification Courses
  • Artificial Intelligence Certification Courses
  • Business Analytics Certification Courses
  • Data Science Certification Courses
  • Cloud Computing Certification Courses
  • Machine Learning Certification Courses
  • View All Certification Courses
  • UG Degree Courses
  • PG Degree Courses
  • Short Term Courses
  • Free Courses
  • Online Degrees and Diplomas
  • Compare Courses

Top Providers

  • Coursera Courses
  • Udemy Courses
  • Edx Courses
  • Swayam Courses
  • upGrad Courses
  • Simplilearn Courses
  • Great Learning Courses

प्रदूषण पर निबंध (Essay on Pollution in Hindi) - प्रदूषण पर निबंध हिंदी में 100 - 500 शब्दों में यहाँ देखें

English Icon

प्रदूषण की समस्या लगातार बढ़ती ही जा रही हैं। आज विश्व की अधिकतर आबादी प्रदूषण की समस्या से ग्रसित है। ऐसे में प्रदूषण पर निबंध (eassay on pollution in hindi) लिखने के लिए अक्सर स्कूलों में कहा जाता है। छात्र इस प्रदूषण पर निबंध (eassay on pollution in hindi) के माध्यम से प्रदूषण जैसी विशाल समस्या के बारे में जानने के साथ-साथ इसकी विषय की संवेदनशीलता का भी पता लगा सकते हैं तथा कैसे ये भयंकर रूप में अब हमारे समक्ष प्रकट हुई है, इसके स्तर का भी अनुमान प्राप्त कर सकते हैं। हिंदी में पत्र लेखन सीखें ।

प्रदूषण पर निबंध (Essay on Pollution in Hindi) - प्रदूषण पर निबंध हिंदी में 100 - 500 शब्दों में यहाँ देखें

प्रदूषण देश ही नहीं बल्कि पूरे विश्व के लिए एक ज्वलंत समस्या का रूप धारण कर चुकी है। प्रदूषण की समस्या से निपटने के लिए सभी के योगदान की आवश्यकता होगी। प्रदूषण पर निबंध (Essay on pollution in Hindi) से देश के भविष्य छात्रों में जागरूकता आएगी तथा प्रदूषण पर निबंध (Essay on pollution in Hindi) से उनको प्रदूषण की समस्या को दूर करने में अपना योगदान देने में आसानी होगी। इस लेख से प्रदूषण क्या है और प्रदूषण के कितने प्रकार का होता है - वायु, जल, ध्वनि, पर्यावरण, ग्लोबल वार्मिंग और जलवायु परिवर्तन के बारे में विस्तृत जानकारी दी गई है, जिससे प्रदूषण पर निबंध हिंदी में (Essay on Pollution in Hindi) ऑनलाइन सर्च कर रहे विद्यार्थियों को प्रदूषण पर निबंध (essay on pollution) लिखने में सहायता मिलेगी।

विश्व पर्यावरण दिवस पर निबंध (essay on world environment day) लिखने में भी इस लेख की सहायता ली जा सकती है। इसके अलावा कई ऐसे छात्र भी होते हैं जिनकी हिंदी विषय/भाषा पर पकड़ कमजोर होती है, ऐसे में प्रदूषण पर निबंध (pradushan par nibandh) विशेष इस लेख से उन्हें निबंध लिखने के तरीके को समझने व लिखने में सहायता प्राप्त होगी।

ये भी पढ़ें :

होली पर निबंध पढ़ें । हिंदी में निबंध लिखने का तरीका जानें ।

प्रदूषण पर निबंध (pradushan par nibandh) - प्रदूषण क्या है? (What is Pollution)

प्रदूषण, जिसे पर्यावरण प्रदूषण भी कहा जाता है। पर्यावरण में किसी भी पदार्थ (ठोस, तरल, या गैस) या ऊर्जा का किसी भी रूप (जैसे गर्मी, ध्वनि, या रेडियोधर्मिता) में उसके पुनर्नवीनीकरण, किसी हानिरहित रूप में संग्रहण या विघटित करने के स्तर से ज्यादा तेजी से फैलना ही प्रदूषण (eassay on pollution in hindi) कहलाता है।

अन्य लेख पढ़ें-

  • हिंदी दिवस पर कविता
  • गणतंत्र दिवस पर भाषण
  • दिवाली पर निबंध

प्रदूषण पर निबंध (Essay on Pollution in Hindi) - प्रदूषण का वर्तमान परिदृश्य

प्रदूषण हमारे जीवन के उन प्रमुख विषयों में से एक है, जो इस समय हमारी पृथ्वी को व्यापक स्तर पर नकारात्मक रूप से प्रभावित कर रहा है। यह एक ऐसा मुद्दा है जो लंबे समय से चर्चा व चिंता का विषय रहा है तथा 21वीं सदी में इसका हानिकारक प्रभाव बड़े पैमाने पर महसूस किया जा रहा है। हालांकि विभिन्न देशों की सरकारों ने इसके प्रभाव को रोकने के लिए कई महत्वपूर्ण कदम उठाए हैं, लेकिन अभी भी इस समस्या के समाधान हेतु एक लंबा रास्ता तय करना बाकी है।

इससे कई प्राकृतिक प्रक्रियाओं में गड़बड़ी आती है। इतना ही नहीं, आज कई वनस्पतियां और जीव-जंतु या तो विलुप्त हो चुके हैं या विलुप्त होने की कगार पर हैं। प्रदूषण की मात्रा में तेजी से वृद्धि के कारण पशु तेजी से न सिर्फ अपना घर खो रहे हैं, बल्कि जीवित रहने लायक प्रकृति को भी खो रहे हैं। प्रदूषण ने दुनिया भर के कई प्रमुख शहरों को प्रभावित किया है। इन प्रदूषित शहरों में से अधिकांश भारत में ही स्थित हैं। दुनिया के कुछ सबसे प्रदूषित शहरों में दिल्ली, कानपुर, बामेंडा, मॉस्को, हेज़, चेरनोबिल, बीजिंग आदि शामिल हैं। हालांकि इन शहरों ने प्रदूषण पर अंकुश लगाने के लिए कई कदम उठाए हैं, मगर फिर भी उन्हें अभी एक लंबा रास्ता तय करना है। इन स्थानों की वायु गुणवत्ता खराब है और भूमि तथा जल प्रदूषण में भी बढ़ोतरी देखी जा रही है। अब समय आ गया है कि इन शहरों से प्रदूषण के स्तर को कम करने के लिए, यहाँ मौजूद प्रशासन एक ठोस रणनीति तैयार करके उसपर अमल करे।

  • हिंदी दिवस पर भाषण
  • बाल दिवस पर हिंदी में भाषण
  • इंजीनियर कैसे बन सकते हैं?

प्रदूषण पर निबंध (Essay on Pollution in Hindi) - वायु गुणवत्ता सूचकांक (एक्यूआई) क्या है? (What is Air Quality Index (AQI)?)

वायु गुणवत्ता सूचकांक (एक्यूआई) (Air Quality Index (AQI)) एक सूचकांक है जिसका उपयोग सरकारी एजेंसियों द्वारा वायु प्रदूषण के स्तर को मापने के लिए किया जाता है ताकि आम लोग वायु गुणवत्ता को लेकर जागरूक हो सकें। जैसे-जैसे एक्यूआई (AQI) बढ़ता है, इसका मतलब है कि एक बड़ी जनसंख्या गंभीर प्रतिकूल स्वास्थ्य प्रभावों का अनुभव करने वाली है। वायु गुणवत्ता सूचकांक यानी AQI लोगों को यह जानने में मदद करता है कि स्थानीय वायु गुणवत्ता उनके स्वास्थ्य को कैसे प्रभावित करती है। पर्यावरण संरक्षण एजेंसी (ईपीए) पांच प्रमुख वायु प्रदूषकों के लिए एक्यूआई (AQI) की गणना करती है, जिसके लिए सार्वजनिक स्वास्थ्य की सुरक्षा के लिए राष्ट्रीय वायु गुणवत्ता मानक स्थापित किए गए हैं।

  • जमीनी स्तर की ओजोन (ग्राउंड लेवल ओज़ोन)
  • कण प्रदूषण/पार्टिकुलेट मैटर (PM2.5/pm 10)
  • कार्बन मोनोऑक्साइड
  • सल्फर डाइऑक्साइड
  • नाइट्रोजन डाइऑक्साइड

प्रदूषण पर निबंध (Essay on Pollution in Hindi) - प्रदूषण के प्रकार

मूल रूप से प्रदूषण चार प्रकार का होता है, जो नीचे उल्लिखित है -

  • वायु प्रदूषण (Air Pollution)
  • जल प्रदूषण (Water Pollution)
  • ध्वनि प्रदूषण (Pollution Essay)
  • मृदा प्रदूषण (Soil Pollution)

यह भी पढ़ें -

  • डॉक्टर कसे बनें
  • एग्रीकल्चर इंजीनियरिंग में कैसे संवारें अपना भविष्य

प्रदूषण पर निबंध (Essay on Pollution in Hindi) - आइए एक करके प्रदूषण के विभिन्न प्रकारों के बारे में जानें:

वायु प्रदूषण : वायु प्रदूषण मुख्य रूप से वाहनों से गैस के उत्सर्जन के कारण होता है। बेहद ही हानिकारक गैस कारखानों तथा उद्योगों में उप-उत्पाद के रूप में उत्पादित होती हैं, प्लास्टिक और पत्तियों जैसे जहरीले पदार्थों को खुले में जलाने से, वाहनों के एग्जॉस्ट से, रेफ्रीजरशन उद्योग में उपयोग किए जाने वाले सीएफ़सी से वायु प्रदूषण में बढ़ोतरी होती है।

हाल के दशक में बेहतर आय की वजह से भारत में सड़कों पर वाहनों की संख्या में बेतहाशा बढ़ोतरी देखी गई है। ये सल्फर डाइऑक्साइड तथा कार्बन मोनोऑक्साइड जैसी हानिकारक गैसों को फैलाने के लिए भी जिम्मेदार हैं। ये गैसें पृथ्वी के वायुमंडल में ऑक्सीजन की मात्रा को कम करने के लिए जिम्मेदार हैं। इनकी वजह से सांस लेने की कई समस्याएं, श्वसन रोग, कई प्रकार के कैंसर आदि जैसी बीमारियाँ तेजी से पनप रही हैं।

जल प्रदूषण : जल प्रदूषण आजकल मनुष्यों के सामने मौजूद सबसे बड़ी समस्याओं में से एक है। सीवेज अपशिष्ट, उद्योगों या कारखानों आदि के कचरे को सीधे नहरों, नदियों और समुद्रों जैसे जल निकायों में डाला जा रहा है। इसके परिणामस्वरूप समुद्री जीव जंतुओं के आवास का नुकसान हो रहा है और जल निकायों में घुली ऑक्सीजन का स्तर भी घट रहा है। पीने योग्य पानी की कमी जल प्रदूषण का एक बड़ा दुष्प्रभाव है। लोग प्रदूषित पानी पीने को मजबूर हैं जिससे हैजा, डायरिया, पेचिश आदि रोग होने का खतरा रहता है।

मृदा प्रदूषण : भारतीय आबादी का एक बहुत बड़ा हिस्सा कृषि पर निर्भर है। इस काम के लिए, किसान बहुत सारे शाकनाशी, उर्वरक, कवकनाशी और अन्य समान प्रकार के रासायनिक यौगिकों का उपयोग करते हैं। इनके इस्तेमाल से मिट्टी दूषित होती है और इससे मिट्टी आगे फसल उगाने लायक नहीं रह जाती। इसके अलावा, अगर अधिकारी जमीन पर पड़े औद्योगिक या घरेलू कचरे को डंप नहीं करते हैं, तो यह भी मिट्टी के प्रदूषण में बड़ा योगदान देता है। इसकी वजह से मच्छरों के प्रजनन में वृद्धि होती है, जो डेंगू जैसी कई जानलेवा बीमारियों का कारण बनता है। ये सभी कारक मिट्टी को विषाक्त बनाने के लिए जिम्मेदार हैं।

ध्वनि प्रदूषण : वायु प्रदूषण में योगदान देने के अलावा, भारतीय सड़कों पर बड़ी संख्या में मौजूद वाहन, ध्वनि प्रदूषण में भी भरपूर योगदान देते हैं। यह उन लोगों के लिए खतरनाक है जो शहरी क्षेत्रों में या राजमार्गों के पास रहते हैं। यह लोगों में चिंता और तनाव जैसे संबंधित मुद्दों का कारण बनता है।

इसके अलावा, पटाखे, कारखानों के कामकाज, लाउडस्पीकर की आवाज (विशेष रूप से समारोहों के मौसम में) आदि भी ध्वनि प्रदूषण में अपनी भूमिका निभाते हैं। अगर इसे नियंत्रित नहीं किया गया, तो यह हमारे मस्तिष्क को भी प्रभावित कर सकता है।

अक्सर, दिवाली के त्योहार के अगले दिन मीडिया में यह बताया जाता है कि कैसे पटाखों की वजह से भारत के प्रमुख शहरों में ध्वनि प्रदूषण में वृद्धि होती है।

हालाँकि ये चार प्रमुख प्रकार के प्रदूषण हैं, जीवनशैली में बदलाव के कारण कई अन्य प्रकार के प्रदूषण भी देखे गए हैं जैसे कि रेडियोधर्मी प्रदूषण, प्रकाश प्रदूषण अन्य। यदि किसी स्थान पर अधिक या अवांछित मात्रा में मानवनिर्मित प्रकाश पैदा किया जाता है, तो यह प्रकाश प्रदूषण में योगदान देता है। आजकल, कई शहरी क्षेत्र अधिक मात्रा में अवांछित प्रकाश का सामना कर रहे हैं।

हम परमाणु युग में जी रहे हैं। चूंकि बहुत से देश अपने स्वयं के परमाणु उपकरण विकसित कर रहे हैं, इससे पृथ्वी के वातावरण में रेडियोधर्मी पदार्थों की उपस्थिति में वृद्धि हुई है। इसे रेडियोधर्मी प्रदूषण के रूप में जाना जाता है। रेडियोधर्मी पदार्थों का संचालन और खनन, परीक्षण, रेडियोधर्मी बिजली संयंत्रों में होने वाली छोटी दुर्घटनाएँ रेडियोधर्मी प्रदूषण में योगदान देने वाले अन्य प्रमुख कारण हैं।

उपयोगी लिंक्स -

  • जलवायु परिवर्तन पर निबंध
  • टॉप इंजीनियरिंग कॉलेज
  • नीट के बिना मेडिकल कोर्स
  • भारत की टॉप यूनिवर्सिटी

प्रदूषण पर निबंध (Essay on Pollution in Hindi) - ग्लोबल वार्मिंग (Global Warming)

ग्लोबल वार्मिंग (Global Warming) जलवायु परिवर्तन का प्रमुख कारक है। धरती के चारों ओर गर्मी को फंसाने वाले प्रदूषण की परत ही मुख्य कारण है, जो आजकल ग्लोबल वार्मिंग (Global Warming) को बढ़ा रही है। जैसे मनुष्य जब जीवाश्म ईंधन जलाते हैं, प्लास्टिक जलाते हैं, वाहन से हानिकारक गैसों का उत्सर्जन होता है, जंगल अधिक स्तर पर जलाए जाते हैं, तो इनसे खतरनाक गैस का उत्सर्जन होता है।

एक बार जब यह गैस पृथ्वी के वायुमंडल में प्रवेश कर जाती है, तो अंततः यह पूरे विश्व में फैल जाती है। नतीजतन, गर्मी फिर से उत्सर्जित होने के बाद अगले 50 या 100 सालों तक पृथ्वी के चारों ओर फंस जाती है। सबसे गंभीर बात यह है कि कार्बन डाइऑक्साइड जैसी हानिकारक गैस का स्तर खतरनाक दर से बढ़ा है। इससे आने वाली पीढ़ी सैकड़ों वर्षों तक ग्लोबल वार्मिंग (Global Warming) के प्रभावों को महसूस करेगी।

प्रदूषण पर निबंध (pradushan par nibandh) - प्रदूषण पर अंकुश लगाने के लिए उठाए गए प्रमुख कदम

पर्यावरण प्रदूषण पर अंकुश लगाने के लिए राष्ट्रीय और अंतरराष्ट्रीय स्तर पर अधिकारियों ने कई कदम उठाए हैं। इनमें से कुछ इस प्रकार हैं:

नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल : भारत सरकार ने भारत में पर्यावरण से संबंधित मुद्दों पर अंकुश लगाने के लिए NGT की स्थापना की थी। 2010 से जब कई उद्योग एनजीटी के आदेश का पालन करने में विफल रहे हैं, तो इसने ऐसे उद्योगों पर भारी जुर्माना लगाया। इसने कई प्रदूषित झीलों को साफ करने में भी मदद की है। इसने गुजरात में कई कोयला आधारित उद्योगों को बंद करने का भी आदेश दिया, जिससे वायु प्रदूषण में इजाफा हो रहा था।

ऊर्जा के वैकल्पिक स्रोत : पिछले कुछ वर्षों से, भारत सरकार लोगों को ऊर्जा के वैकल्पिक स्रोतों की ओर जाने के लिए प्रोत्साहित कर रही है। तमिलनाडु राज्य के निवासियों के लिए अपनी छतों पर सौर पैनल और वर्षा जल संचयन प्रणाली रखना अनिवार्य है। वैकल्पिक ऊर्जा के अन्य स्रोत जैव ईंधन, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा आदि हैं।

BS-VI ईंधन : भारत सरकार द्वारा घोषणा के बाद देश अब BS-VI (भारत चरण VI) ईंधन का उपयोग करने में सक्षम है। इस नियम अस्तित्व में आने के बाद, वाहनों से सल्फर के होने वाले उत्सर्जन में 50% से अधिक की कमी आने की संभावना है। यह डीजल कारों से नाइट्रोजन ऑक्साइड के उत्सर्जन को 70% और पेट्रोल कारों में 25% तक कम करता है। इसी तरह, कारों में पार्टिकुलेट मैटर के उत्सर्जन में 80% की कमी आएगी।

वायु शोधक: वायु प्रदूषण पर अंकुश लगाने के लिए लोग अब वायु शोधक विशेष रूप से इनडोर में इस्तेमाल किए जाने वाले का उपयोग कर रहे हैं। एयर प्यूरीफायर हवा में मौजूद पार्टिकुलेट मैटर को साफ करते हैं, हानिकारक बैक्टीरिया को हटाते हैं और हवा की गुणवत्ता में काफी हद तक सुधार करते हैं।

प्रदूषण पर निबंध (pradushan par nibandh) - प्रदूषण पर अंकुश लगाने में यूएनओ की भूमिका

अपने बैनर के तहत, संयुक्त राष्ट्र संघ ने 1972 में प्रदूषण के मुद्दे को संबोधित करने के लिए संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) की शुरुआत की गई थी। इसने जलवायु परिवर्तन, पारिस्थितिकी तंत्र प्रबंधन, पर्यावरण प्रशासन, संसाधन दक्षता आदि जैसे कई मुद्दों की तरफ आम लोगों का ध्यान आकर्षित किया है। इसने कई सफल संधियों को मंजूरी दी है, जैसे कि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल (1987) जो गैसों के उत्सर्जन को सीमित करने के लिए सुरक्षात्मक ओजोन परत को पतला कर रहे थे, जहरीले पारा आदि के उपयोग को सीमित करने के लिए मिनामाता कन्वेंशन (2012) यूएनईपी प्रायोजित 'सौर ऋण कार्यक्रम' जहां विभिन्न देशों के लाखों लोगों को सौर ऊर्जा पैनल प्रदान किए गए थे।

प्रदूषण पर निबंध (pradushan par nibandh) - प्रदूषण पर अंकुश लगाने के विभिन्न तरीके

हालांकि विभिन्न शहरों के अधिकारी प्रदूषण के मुद्दे पर अंकुश लगाने के लिए कड़ी मेहनत कर रहे हैं। ऐसे में नागरिकों और आम लोगों का भी यह कर्तव्य है कि वे इस प्रक्रिया में अपना योगदान दें। सभी प्रकार के प्रदूषण को रोकने के कुछ महत्वपूर्ण उपाय निम्नलिखित हैं -

पटाखों का इस्तेमाल बंद करें : जब आप दशहरा, दिवाली या किसी अन्य अवसर पर त्योहार मनाते हैं, तो पटाखों का इस्तेमाल ना करें। यह ध्वनि, मिट्टी के साथ-साथ प्रकाश प्रदूषण का कारण बनता है। साथ ही इसका हमारे स्वास्थ्य पर विपरीत प्रभाव पड़ता है।

वाहनों का प्रयोग सीमित करें : वाहन प्रदूषण का एक प्रमुख कारण है। वाहनों का प्रयोग कम से कम करें। यदि संभव हो, तो उन्हें व्यक्तिगत उपयोग के लिए इलेक्ट्रिक वाहनों से बदलने का प्रयास करें। आने-जाने के लिए ज्यादा से ज्यादा सार्वजनिक परिवहन का प्रयोग करें।

अपने आस-पास साफ-सफाई रखें : एक जिम्मेदार नागरिक होने के नाते यह हमारा कर्तव्य होना चाहिए कि हम अपने घर के आस-पास के क्षेत्र को साफ-सुथरा रखें। हमें कचड़ा इधर-उधर फेंकने की बजाय कूड़ेदान में फेकना चाहिए।

रिसाइकल और पुन: उपयोग - कई गैर-बायोडिग्रेडेबल उत्पाद जैसे कि प्लास्टिक से बने दैनिक उपयोग की वस्तुएं हमारे पर्यावरण को नुकसान पहुंचाती हैं। हमें या तो इन्हें ठीक से डिकम्पोज करना होगा या इसे रिसाइक्लिंग के लिए भेजना होगा। आजकल सरकार प्लास्टिक को रिसायकल करने के लिए बहुत सारी योजनाएं चला रही है, जहां नागरिक न केवल अपने प्लास्टिक के कचरे को दान कर सकते हैं, बल्कि अन्य वस्तुओं के बदले में इसका आदान-प्रदान भी कर सकते हैं।

पेड़ लगाएं : कई कारणों से पेड़ों की कटाई जैसे सड़कों का चौड़ीकरण, घर बनाना आदि के कारण विभिन्न प्रकार के प्रदूषण में वृद्धि हुई है। पौधे वातावरण में मौजूद कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डाइऑक्साइड आदि जैसे हानिकारक गैसों को अवशोषित करते हैं। चूंकि वे प्रकाश संश्लेषण की प्रक्रिया के दौरान ऑक्सीजन छोड़ते हैं, इसलिए हमारे लिए यह महत्वपूर्ण है कि हम अधिक से अधिक मात्रा में पेड़ लगाएं और उनकी देखभाल करें।

प्रदूषण एक ऐसी समस्या है, जिसका हमें जल्द से जल्द समाधान करने की जरूरत है, ताकि मनुष्य व अन्य जीव जन्तु, इस ग्रह पर सुरक्षित रूप से रह सकें। यह महत्वपूर्ण है कि हम इस मुद्दे के समाधान के लिए सुझाए गए उपायों का पालन करें। यह हमारी नैतिक जिम्मेदारी है कि हम अपने घर को रहने के लिए एक बेहतर जगह बनाएं। पृथ्वी को जीवित रखने के लिए हमें इसे प्रदूषित करना बंद करना होगा।

Frequently Asked Question (FAQs)

वायु गुणवत्ता सूचकांक (एक्यूआई) (Air Quality Index) दैनिक आधार पर वायु गुणवत्ता की रिपोर्ट करने के लिए एक सूचकांक है।

प्रदूषण पर हिंदी में निबंध लिखने के लिए आप इस लेख को संदर्भित कर सकते हैं। इस लेख में प्रदूषण पर निबंध से संबंधित जानकारी प्राप्त कर सकते हैं।

प्रदूषण मुख्य रूप से 4 प्रकार के होते हैं, जिन्हे वायु प्रदूषण (Air Pollution), जल प्रदूषण (Water Pollution), ध्वनि प्रदूषण (Pollution Essay), मृदा प्रदूषण (Soil Pollution) के रूप में जाना जाता है। 

पटाखों के इस्तेमाल पर कमी, अधिक से अधिक पेड़ लगाकर, वाहनों के उपयोग पर कमी और अपने आस-पास स्वच्छता रखकर प्रदूषण में कमी की जा सकती है। 

सांविधिक संगठन, केन्द्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड को वर्ष 1974 में गठित किया गया था।

पर्यावरण में किसी भी पदार्थ (ठोस, तरल, या गैस) या ऊर्जा का किसी भी रूप (जैसे गर्मी, ध्वनि, या रेडियोधर्मिता) में उसके पुनर्नवीनीकरण, किसी हानिरहित रूप में संग्रहण या विघटित करने के स्तर से ज्यादा तेजी से फैलना ही प्रदूषण है। प्रदूषण उन प्रमुख मुद्दों में से एक है, जो हमारी पृथ्वी को व्यापक स्तर पर प्रभावित कर रहा है। यह एक ऐसा मुद्दा है जो लंबे समय से चर्चा में है, 21वीं सदी में इसका हानिकारक प्रभाव बड़े पैमाने पर महसूस किया गया है। हालांकि विभिन्न देशों की सरकारों ने इन प्रभावों को रोकने के लिए कई बड़े कदम उठाए हैं, लेकिन अभी भी एक लंबा रास्ता तय करना बाकी है।

  • Latest Articles
  • Popular Articles

Upcoming School Exams

Uttar pradesh board 12th examination.

Application Date : 07 May,2024 - 31 May,2024

Uttar Pradesh Board 10th examination

Exam Date : 07 May,2024 - 31 May,2024

Goa Board Higher Secondary School Certificate Examination

Admit Card Date : 13 May,2024 - 07 June,2024

Haryana Board of Secondary Education 12th Examination

Application Date : 16 May,2024 - 26 May,2024

Haryana Board of Secondary Education 10th Examination

Applications for admissions are open..

Aakash iACST Scholarship Test 2024

Aakash iACST Scholarship Test 2024

Get up to 90% scholarship on NEET, JEE & Foundation courses

ALLEN Digital Scholarship Admission Test (ADSAT)

ALLEN Digital Scholarship Admission Test (ADSAT)

Register FREE for ALLEN Digital Scholarship Admission Test (ADSAT)

JEE Main Important Physics formulas

JEE Main Important Physics formulas

As per latest 2024 syllabus. Physics formulas, equations, & laws of class 11 & 12th chapters

PW JEE Coaching

PW JEE Coaching

Enrol in PW Vidyapeeth center for JEE coaching

PW NEET Coaching

PW NEET Coaching

Enrol in PW Vidyapeeth center for NEET coaching

JEE Main Important Chemistry formulas

JEE Main Important Chemistry formulas

As per latest 2024 syllabus. Chemistry formulas, equations, & laws of class 11 & 12th chapters

Explore on Careers360

  • Board Exams
  • Top Schools
  • Navodaya Vidyalaya
  • NCERT Solutions for Class 10
  • NCERT Solutions for Class 9
  • NCERT Solutions for Class 8
  • NCERT Solutions for Class 6

NCERT Exemplars

  • NCERT Exemplar
  • NCERT Exemplar Class 9 solutions
  • NCERT Exemplar Class 10 solutions
  • NCERT Exemplar Class 11 Solutions
  • NCERT Exemplar Class 12 Solutions
  • NCERT Books for class 6
  • NCERT Books for class 7
  • NCERT Books for class 8
  • NCERT Books for class 9
  • NCERT Books for Class 10
  • NCERT Books for Class 11
  • NCERT Books for Class 12
  • NCERT Notes for Class 9
  • NCERT Notes for Class 10
  • NCERT Notes for Class 11
  • NCERT Notes for Class 12
  • NCERT Syllabus for Class 6
  • NCERT Syllabus for Class 7
  • NCERT Syllabus for class 8
  • NCERT Syllabus for class 9
  • NCERT Syllabus for Class 10
  • NCERT Syllabus for Class 11
  • NCERT Syllabus for Class 12
  • CBSE Date Sheet
  • CBSE Syllabus
  • CBSE Admit Card
  • CBSE Result
  • CBSE Result Name and State Wise
  • CBSE Passing Marks

CBSE Class 10

  • CBSE Board Class 10th
  • CBSE Class 10 Date Sheet
  • CBSE Class 10 Syllabus
  • CBSE 10th Exam Pattern
  • CBSE Class 10 Answer Key
  • CBSE 10th Admit Card
  • CBSE 10th Result
  • CBSE 10th Toppers
  • CBSE Board Class 12th
  • CBSE Class 12 Date Sheet
  • CBSE Class 12 Admit Card
  • CBSE Class 12 Syllabus
  • CBSE Class 12 Exam Pattern
  • CBSE Class 12 Answer Key
  • CBSE 12th Result
  • CBSE Class 12 Toppers

CISCE Board 10th

  • ICSE 10th time table
  • ICSE 10th Syllabus
  • ICSE 10th exam pattern
  • ICSE 10th Question Papers
  • ICSE 10th Result
  • ICSE 10th Toppers
  • ISC 12th Board
  • ISC 12th Time Table
  • ISC Syllabus
  • ISC 12th Question Papers
  • ISC 12th Result
  • IMO Syllabus
  • IMO Sample Papers
  • IMO Answer Key
  • IEO Syllabus
  • IEO Answer Key
  • NSO Syllabus
  • NSO Sample Papers
  • NSO Answer Key
  • NMMS Application form
  • NMMS Scholarship
  • NMMS Eligibility
  • NMMS Exam Pattern
  • NMMS Admit Card
  • NMMS Question Paper
  • NMMS Answer Key
  • NMMS Syllabus
  • NMMS Result
  • NTSE Application Form
  • NTSE Eligibility Criteria
  • NTSE Exam Pattern
  • NTSE Admit Card
  • NTSE Syllabus
  • NTSE Question Papers
  • NTSE Answer Key
  • NTSE Cutoff
  • NTSE Result

Schools By Medium

  • Malayalam Medium Schools in India
  • Urdu Medium Schools in India
  • Telugu Medium Schools in India
  • Karnataka Board PUE Schools in India
  • Bengali Medium Schools in India
  • Marathi Medium Schools in India

By Ownership

  • Central Government Schools in India
  • Private Schools in India
  • Schools in Delhi
  • Schools in Lucknow
  • Schools in Kolkata
  • Schools in Pune
  • Schools in Bangalore
  • Schools in Chennai
  • Schools in Mumbai
  • Schools in Hyderabad
  • Schools in Gurgaon
  • Schools in Ahmedabad
  • Schools in Uttar Pradesh
  • Schools in Maharashtra
  • Schools in Karnataka
  • Schools in Haryana
  • Schools in Punjab
  • Schools in Andhra Pradesh
  • Schools in Madhya Pradesh
  • Schools in Rajasthan
  • Schools in Tamil Nadu
  • NVS Admit Card
  • Navodaya Result
  • Navodaya Exam Date
  • Navodaya Vidyalaya Admission Class 6
  • JNVST admit card for class 6
  • JNVST class 6 answer key
  • JNVST class 6 Result
  • JNVST Class 6 Exam Pattern
  • Navodaya Vidyalaya Admission
  • JNVST class 9 exam pattern
  • JNVST class 9 answer key
  • JNVST class 9 Result

Download Careers360 App's

Regular exam updates, QnA, Predictors, College Applications & E-books now on your Mobile

student

Certifications

student

We Appeared in

Economic Times

IMAGES

  1. Jal Pradushan Nibhndh Marathi

    essay in pradushan in marathi

  2. Pradushan Marathi nibandh, Marathi essay on pollution for High school students by Smile Please World

    essay in pradushan in marathi

  3. marathi essay pradushan

    essay in pradushan in marathi

  4. Mruda Pradushan

    essay in pradushan in marathi

  5. मराठी निबंध : प्रदूषण marathi nibandh pradushan

    essay in pradushan in marathi

  6. प्रदूषण व पर्यावरण मराठी निबंध pradushan v paryavaran Marathi essay

    essay in pradushan in marathi

VIDEO

  1. प्रदूषण एक समस्या मराठी निबंध। Pradushan ek samasya in Marathi

  2. प्लास्टिक प्रदूषण दहा ओळी मराठी निबंध

  3. प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

  4. Mruda Pradushan

  5. Pradushan Marathi nibandh, Marathi essay on pollution for High school students by Smile Please World

  6. प्रदूषण व पर्यावरण मराठी निबंध pradushan v paryavaran Marathi essay

COMMENTS

  1. प्रदूषण एक समस्या मराठी निबंध। Pradushan ek samasya in Marathi

    1. Pradushan ek samasya essay in Marathi : आजकाल वाढत असलेल्या महानगरातील समस्या पैकी प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. हवा अर्थात वायु प्रदूषणा नंतर ध्वनी ...

  2. प्रदूषण निबंध

    Pradushan Essay in Marathi Language आज आपण प्रदूषण या विषयावरती निबंध पाहणार आहोत ...

  3. प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Pollution In Marathi

    प्रदूषण वर मराठी निबंध Essay On Pollution In Marathi ( ३०० शब्दांत ) प्रदूषण ही एक संज्ञा आहे जी आजकाल मुलांनाही ठाऊक आहे. हे इतके सामान्य झाले आहे की ...

  4. प्रदूषण

    ओळख. वाढ़त्या प्रदूषणामुळे जगात दरवर्षी एक कोटीहून अधिक ...

  5. प्रदूषण या विषिया वर निबंध । Pollution Essay In Marathi

    जग हे " डिजिटल" मानले जाते. बघावे तिकडे नव- नवीन वस्तू पहायला मिळतात. प्रदूषण या विषिया वर निबंध । Pradushan Essay In Marathi

  6. प्रदुषण एक समस्या मराठी निबंध

    प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi:- प्रदुषण ही आज मनुष्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे.या समस्येमुळे माणूस खूप अडचणीत आला आहे.

  7. जल प्रदूषण वर निबंध मराठी । Marathi Essay on Water Pollution

    जल प्रदूषण निबंधा विषयी बद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी पोस्ट पूर्ण वाचा आपल्या jal pradushan in Marathi nibandh, jal pradushan in marathi essay, jal pradushan par nibandh Marathi,

  8. प्रदूषण एक समस्या मराठी निबंध । Pradushan Ek Samasya Essay in Marathi

    Pradushan Ek Samasya Essay in Marathi : मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक समस्या पाहायला मिळतात. जागतिक तापमानवाढ, लोकसंख्या वाढ आणि प्रदूषण.

  9. पर्यावरण प्रदूषणावर निबंध

    मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us! Essay on Pollution in Marathi, Pradushan Nibandh in Marathi And More Essay Collection in Marathi Language - पर्यावरण ...

  10. (Essay) प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

    1 thought on "(Essay) प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | pradushan ek samasya essay in marathi | Pollution Essay in Marathi" Pingback: माझी आई निबंध | Majhi Aai Nibandh In Marathi | Mazi Aai Marathi Nibandh - 360Marathi April 2021

  11. प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन

    प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन - Pradushan Ek Samasya Nibandh Marathi. मानवासहित सर्व सजीव प्राणी वनस्पतींना जगण्यासाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता असते.

  12. जलप्रदूषण निबंध मराठीत

    जलप्रदूषण निबंध मराठीत | Jal pradushan essay in marathi जलप्रदूषण म्हणजे काय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक वातावरणात दूषित घटकांचा प्रवेश ज्यामुळे ...

  13. प्रदूषण एक समस्या मराठी निबंध Pollution Essay in Marathi

    प्रदूषण एक समस्या मराठी निबंध Pollution Essay in Marathi. प्रदूषणाचे प्रकार - प्रदूषण हा एक बहुमुखी दैत्य आहे. तो वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी ...

  14. ध्वनी प्रदूषण मराठी निबंध । Dhwani Pradushan Marathi Nibandh

    ध्वनी प्रदूषण मराठी निबंध । Dhwani Pradushan Marathi Nibandh. आपल्या आसपास पर्यावरणा मध्ये अनेक प्रकारचे प्रदूषण बघायला मिळते जसे की, जल प्रदूषण, भूमी प्रदूषण, वायु ...

  15. Water Pollution Information in Marathi Essay

    Jal Pradushan Marathi Essay Project : जल प्रदूषण निबंध. जल प्रदूषण म्हणजे जलाशयांचे साठे उदा. तलाव, नद्या, समुद्र, विहीर, कालवे, सरोवरे इत्यादींचे पाणी ...

  16. Pradushan Ek Samasya Marathi Nibandh। प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

    1.2.6 Pradushan ki samasya par nibandh. मित्रानो , या पोस्ट मध्ये प्रदूषण एक समस्या निबंध मराठी लेखन / Pradushan Ek Samasya Marathi Nibandh 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा ...

  17. प्रदूषण एक समस्या मराठी निबंध। Pradushan ek samasya in Marathi

    प्रदूषण एक समस्या मराठी निबंध। Pradushan ek samasya in Marathi | Pollution Essay in Marathi#प्रदूषण_एक_समस्या ...

  18. वायू प्रदूषण

    वायू प्रदूषण | Vayu Pradushan Marathi Nibandh. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत मानवी गरजा आहेत. अन्न ही संज्ञा फार व्यापक अर्थाने वापरली जाते, कारण यात ...

  19. pradushan ek samasya in marathi essay

    pradushan ek samasya in marathi essay | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध नमस्कार मित्र ...

  20. Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या

    Essay on Pollution in Marathi आपण ह्या पोस्टमध्ये प्रदूषण वर आधारित निबंध - प्रदूषण एक जागतिक समस्या हा निबंध पहाणार आहोत. प्रदूषण हि एक जगाला

  21. [2023] प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

    तसेच मी तुम्हाला Pradushan Nibandh In Marathi या विषयावर सुद्धा माहिती दिली आहे. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या आर्टिकल मध्ये ...

  22. Noise Pollution Information in Marathi Essay

    Dhwani Pradushan Marathi Nibandh : जल प्रदूषण निबंध. Noise Pollution in Marathi Project / ध्वनी प्रदूषण : • ध्वनी प्रदूषण मोठ्या व अनुपयोगी आवाजाला म्हणतात, व याचा त्रास माणूस व ...

  23. प्रदूषण पर निबंध (Essay on Pollution in Hindi)

    प्रदूषण पर निबंध (Essay on Pollution in Hindi)- छात्रों की सहायता और जानकारी के लिए हम प्रदूषण पर निबंध लेकर आए हैं। छात्र इस लेख की सहायता से प्रदूषण पर निबंध (pradushan par nibandh ...