• Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay in Marathi

मित्रांनो, आज आपण माझा मित्र निबंध मराठी मध्ये लिहिला आहे. माझा आवडता मित्र निबंध इयत्ता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या निबंधाच्या मदतीने शाळेतील सर्व विद्यार्थी माझ्या जिवलग मित्रावर चांगला निबंध लिहू शकतात जेणेकरून ते परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतील. हा माझा जिवलग मित्र मराठी निबंध आम्ही सोप्या भाषेत लिहिला आहे.

माझा मित्र-my best friend

माझा मित्र निबंध मराठी – My Best Friend Essay in Marathi

Table of Contents

माझा मित्र निबंध मराठी Set 1 – My Best Friend Essay in Marathi Set 1

माझ्या वर्गमित्राचे नाव सुनील आहे. आम्ही दोघे एकाच वर्गात आहोत व एकाच बाकावर बसतो. आमची घरेसुद्धा जवळ जवळ आहेत. आम्ही पहिलीच्या वर्गापासून मित्र आहोत.

सुनील स्वभावाने फार मनमिळाऊ आहे. तो अभ्यासात फार हुशार आहे. तो खेळातही खूप मन लावतो. तो आमच्या वर्गाचा मॉनिटर आहे. सगळी मुले त्याला खूप मानतात. सगळ्या शिक्षकांना तो खूप आवडतो. सुनील मला अभ्यासात मदत करतो. मी आजारी पडलो तर तो माझ्या घरी खूप वेळ माझ्याकडे थांबतो व विचारपूस करतो.

सुनील फारच चांगला मुलगा आहे. तो आपल्या आई-वडिलांचा मान ठेवतो. आपल्या भाऊ-बहिणीवर खूप प्रेम करतो. तो कधीही कोणाशीही भांडत नाही. ह्या सर्व कारणांमुळे मी सुनीलवर फार प्रेम करतो. सुनीलसारखा मित्र मिळाला म्हणून मी स्वतःला फार भाग्यवान समजतो.

[printfriendly current=’yes’]

माझा आवडता मित्र निबंध मराठी–My Friend Essay in Marathi

माझा मित्र निबंध मराठी Set 2 – My Best Friend Essay in Marathi Set 2

माझ्या मित्राचे नाव राजस आहे. तो माझ्या वर्गात आहे आणि माझ्याच इमारतीत राहातो. त्यामुळे आम्ही दोघे कायम एकत्रच असतो. शाळेत एकत्र जातो आणि एकत्रच परत येतो त्यामुळे आम्हाला ‘एकमेकांचे शेपूट’ असे चिडवतात.

शाळेत त्याचा नंबर नेहमी पहिला असतो आणि माझा मात्र दहावा असतो पण तरी तो भाव खात नाही आणि माझ्याशी बोलताना गर्विष्ठपणा करीत नाही.

माझी आई कधीकधी मला म्हणते की तो बघ किती हुशार आहे, नाही तर तू! तेव्हा मात्र मला आईचा राग येतो. बाबाही तिला म्हणतात की दोन मुलांची तुलना कधीही करू नये.

राजसचे आईबाबा दुबईत असतात. तो इथे आजीसोबत राहातो त्यामुळे त्याला आमच्या घरी यायला खूप आवडते.

आम्ही दोघे मिळून गच्चीवर पतंग उडवतो, सोसायटीत क्रिकेट खेळतो, बॅडमिंटन सुद्धा खेळतो.

त्याचे आईबाबा दुबईहून दर मे महिन्यात येतात तर तो दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्याकडे जातो. तो नसला की मला करमत नाही. पण ह्या वर्षी दिवाळीत मी राजसबरोबर दुबईला जाणार आहे, त्यासाठी माझ्या बाबांनी मला पासपोर्ट काढून दिला आहे.

एवढा चांगला मित्र मला मिळाला हे माझे केवढे भाग्य आहे.

माझा मित्र निबंध मराठी–My Best Friend Essay in Marathi

माझा आवडता मित्र Set 3 – My Friend Essay in Marathi Set 3

[मुद्दे : नाव – शेजारी राहतो- एका वर्गात – खेळणे, अभ्यास करणे एकत्र – गायनस्पर्धेत सहभाग – हुशार, चांगला स्वभाव – सुंदर हस्ताक्षरवया नीटनेटक्या – सर्वांना आवडणारा – मला अभिमान वाटतो.]

माझ्या मित्राचे नाव विनय आहे. तो माझा सर्वांत आवडता मित्र आहे. तो लहानपणापासून माझा मित्र आहे. त्याचे घर आमच्या शेजारीच आहे.

विनय आणि मी एकाच वर्गात आहोत. आम्ही एकाच बाकावर बसतो. संध्याकाळी घरी आल्यावर एकत्र खेळतो आणि अभ्यासही एकत्र करतो. विनयचा आवाज चांगला आहे. तो नेहमी गायनस्पर्धेत भाग घेतो.

विनय हुशार मुलगा आहे. तो स्वभावानेही खूप चांगला आहे. “नेहमी विनयच्या संगतीत राहा,” असे माझी आई मला सांगते. त्याच्या वया, नीटनेटक्या व सुंदर असतात. सगळेजण अभ्यास करण्यासाठी त्याच्या वयांचाच उपयोग करतात. विनय वर्गातील सर्वांना खूप आवडतो. मला या माझ्या मित्राचा अभिमान वाटतो.

माझा आवडता मित्र Set 4 – My Friend Essay in Marathi Set 4

[मुद्दे : अनमोल मित्र – लहानपणापासून मैत्री – सुंदर हस्ताक्षर अप्रतिम चित्रकला – मित्राच्या यशाने आनंदी होणारा – अबोल पण मनाने मोठा – आवडता मित्र.]

अमोल हा माझा एक अनमोल मित्र आहे. अगदी बालपणापासून आमची दोस्ती. प्रथम आम्ही एकमेकांच्या शेजारी राहत होतो, त्यामुळे दिवसातले बरेचसे तास आम्ही एकत्रच असायचो. आता आम्ही नवीन घर घेतले ते बरेच दूर आहे. पण शाळा, वर्ग, बाक हा माझा व अमोलचा एकच.

अमोलचे हस्ताक्षर व चित्रकला अप्रतिम आहे. त्यामुळे अमोलच्या वया फार सुंदर असतात. अमोल हुशार आहे. त्याला सर्व विषयांत चांगले गुण मिळतात. वक्तृत्वस्पर्धा, नाट्यस्पर्धा यांत मात्र अमोल कधीच भाग घेत नाही; पण माझ्या प्रत्येक स्पर्धेला तो माझ्याबरोबर हजर असतो. माझ्या यशाचा त्याला खूप आनंद होतो.

अमोल अबोल आहे. म्हणून त्याला खूप कमी मित्र आहेत. मात्र तो मनाने फार मोठा आहे. म्हणून मला तो खूप आवडतो.

माझा जिवलग मित्र मराठी निबंध Set 5 – Essay On My Best Friend in Marathi Set 5

माझा मित्र माझ्याच वर्गात शिकतो. त्याचे नाव गोविंद आहे.

त्याचे घर आमच्या घराशेजारीच आहे. आम्ही दोघे शाळेत बरोबरच जातो. वर्गात शेजारीच बसतो. तो खूप हुशार आहे. आमच्या बाई नेहमी सर्वांना ‘गोविंद सारखे वागा’ असे सांगतात. कारण गोविंद अभ्यासात हुशार आहे. खेळण्यातही तो पटाईत व चपळ आहे.

तो सर्वांना मदत करायला नेहमी तयार असतो. त्याला चित्रकला व हस्तकलाही आवडते. आम्ही दोघे एकत्रच चित्रकला शिकायला जातो. तो माझ्या वाढदिवसाला स्वतः वस्तू बनवून भेट देतो. आम्ही दोघे एकमेकांना सतत मदत करीत असतो.

तो शांत स्वभावाचा आहे. मी काही म्हटले तरी तो कधीच विरोध करीत नाही. पटले नाही तर फक्त हसतो. खरेच, आमची मैत्री सुदामा व कृष्णाप्रमाणेच आहे.

माझा प्रिय मित्र मराठी निबंध Set 6 – Majha Mitra Nibandh in Marathi Set 6

चांगला मित्र मिळणे ही कठीण गोष्ट आहे. आजच्या काळात जिथे सर्वत्र स्वार्थी लोकांची गर्दी ओह. त्या गर्दीत एकदा निःस्वार्थी मित्र भेटणे म्हणजे वरदान असल्यासारखेच आहे. याबाबतीत मी फार सुदैवी आहे. मला तीन चार मित्र आहे. परंतु त्यापैकी एक आहे माझा प्रिय मित्र रमण. तो तसा आहे चैन्नईचा राहाणारा. पण तो मागच्या काही दिवसापासून दिल्लीतच रहातोय. त्याचे वडील एक वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. आई घराकाम पहाते.

रमण आणि मी एकाच वर्गात आहोत आणि वर्गात एकाच डेस्कवर बसतो. तो नवरोजी नगरात रहातो. मी आर.के. पुरम येथे. . एकमेकापासून जास्त दूर नाही हे अंतर एकमेकांच्या घरी जाणे-येणे तर असतेच. त्याचे आई-वडील आम्हा दोघात कसलाही भेदभाव करीत नाहीत. माझे आई-वडील देखील आमच्यात कसलाही फरक करीत नाही.

रमण एक हुशार विद्यार्थी आहे. वर्गात नेहमी प्रथम येतो. त्यांचे पाठांतर तर कमालीचे आहे, परंतु त्याला त्याचा थोडाही अभिमान नाही. वाचायला-लिहायला तो मला नेहमीच मदत करतो. त्याला आणि मला दोघांनाही बागकाम करण्याचा छंद आहे. आम्ही दोघे या विषयावर सदान्कदा गापा मारतो आणि रोपाचे प्रदर्शन पहायला जातो. माझ्या घराच्या मागे एक आमचे स्वतःचे गार्डन आहे. त्याला पाणि घालणे, देखभाल करण्यात आम्ही आमचा वेळ घालवतो.

माझा मित्र/मैत्रीण मराठी निबंध Set 7 – Majha Mitra Essay in Marathi Set 7

‘दिये जलते हैं, फूल खिलतें हैं, बडी मुश्किलसे मगर दुनिया में दोस्त मिलतें है.” असे एक गाणे आहे. किती खरं लिहिलं आहे त्यात ! ह्या जगात जीवाला जीव देणारे मित्र मिळणे खूप कठीण आहे. नातेवाईक आपल्याला आपोआपच मिळतात. त्यात आपल्याला निवडीची संधीच नसते. परंतु मित्रांचे तसे नाही. आपल्या स्वभावाशी जुळणा-या मुलांशी आणि मुलींशी आपली मैत्री होते.

खरा भित्र कसा असावा? ख-या मित्राने नेहमी आपल्याशी विश्वासाने वागावे. आपल्या मनातले त्याला सांगता यावे आणि त्यानेही ते ऐकून घ्यावे. त्याच्याबरोबर आपल्याला खेळता बागडता यावे. आपल्याला त्रास झाला तर त्याच्या डोळ्यात पाणी यावे. पण मला वाटते की त्यासाठी आपण स्वतःच एक चांगला मित्र बनले पाहिजे. आपण आपल्या मित्राच्या अडीअडचणीला धावून गेलो तर त्यालाही आपल्याबद्दल तसेच वाटणार ना? म्हणून दुस-याकडून आपण मैत्रीची जी अपेक्षा करतो तसे अगोदर आपल्याला वागता यायला हवे.

माझा मित्र सुबोध मला खूप आवडतो. तो आणि मी जवळजवळ राहात असल्यामुळे शाळेत आम्ही एकत्रच येतो. बाकावरही एकाच बसतो. स्वभाव जुळले की सहवासाने मैत्री नक्कीच वाढते. तसे आमचे झाले आहे. आम्ही दोघे वर्गात खूप बडबड करतो म्हणून कधीकधी आमचे शिक्षक आम्हाला दूर बसण्याची शिक्षा देतात. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की आम्ही ह्यापुढे बडबड करणार नाही पण आम्हाला एकत्र बसवा. तसे आम्ही चारपाच दिवस वागतो. नंतर पुन्हा विसरतो आणि ओरडा खातो ती गोष्ट वेगळी.

मध्यंतरी सुबोधला डेंग्यू झाला होता तेव्हा मी रोज त्याच्या घरी जाऊन काय काय अभ्यास झाला ते त्याला सांगत होतो आणि त्याला गोष्टीसुद्धा वाचून दाखवत होतो. त्यामुळे त्याला आणि मला दोघांनाही बरे वाटत होते.

ह्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत आम्ही दोघे पोहण्याच्या शिबिराला जाणार आहोत. असा आहे माझा मित्र.

माझा आवडता निबंध Set 8 – My Best Friend Essay in Marathi Language Set 8

‘अमित्रस्य कुतः सुखम् ।’ असे एक सुभाषितकार म्हणतो. मैत्रिशिवाय या जगात सुख मिळणार नाही. आपल्या भावना मोकळेपणी व्यक्त करण्याचे एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे आपल्या मित्राजवळ.

मला अनेक मित्र आहेत. शाळेतले मित्र, मैदानावरचे मित्र, माझ्या भावाचे मित्रहीं माझे मित्रच आहेत. पण या सगळ्यांमध्ये माझ्या जिवाभावाचा जो मित्र आहे, त्याचे नाव आहे मकरंद. तो माझ्याच वर्गात आहे. तो माझ्याच शेजारी बसतो. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही अभ्यासातही एकमेकांना खूप मदत करतो. खूप खेळतो, मस्ती करतो, एकत्र डबा खातो आणि शाळा सुटली, की जड मनाने एकमेकांचा निरोप घेतो. मकरंद एक दिवस जरी शाळेत आला नाही, तरी मला करमत नाही. राहून राहून त्याची आठवण येते. तो मधल्या सुट्टीत तरी यावा, असे वाटत राहते.

मकरंद खूप हुशार आहे. अभ्यासू आहे. त्याच्यामुळे मलाही अभ्यासाची खूप गोडी लागली आहे. त्याचा अभ्यास नेहमी वेळेवर पूर्ण असतो. परीक्षेपूर्वी त्याची प्रत्येक विषयाची व्यवस्थित उजळणी झालेली असते. तीच शिस्त आता मला लागली आहे.

अभ्यासाबरोबर मकरंद खेळातही खूप तरबेज आहे. तो फुटबॉल खूप छान खेळतो. आमच्या शालेय संघाचा तो ‘गोलकीपर’ आहे. त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे आमचा संघ अनेकवेळा आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा जिंकलेला आहे. मला त्याच्या ह्या सर्व गुणांचे खूप कौतुक वाटते. तो परिश्रमपूर्वक एखादी गोष्ट शिकून घेतो. सर्वांशी मनमोकळा राहून मदत करतो, शिक्षकांचा आदर करतो. वर्गातील कच्च्या मुलांचा कधीकधी मधल्या सुट्टीत अभ्यास करून घेतो.

मकरंदचे वडील सैन्यात मोठे अधिकारी आहेत. त्यांची नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असते. त्यांनी सुट्टीत मकरंदसाठी आणलेला खाऊ तो नेहमी शाळेत आणून आम्हा सर्व मुलांना वाटतो.

असा हा सर्वगुणसंपन्न असलेला माझा मित्र मकरंद मलाच काय, सगळ्यांनाच आवडतो. सगळ्यांना मकरंदसारखा आधार देणारा मित्र मिळावा, असे मला वाटते.

माझा जिवलग मित्र मराठी निबंध Set 9 – Essay On My Best Friend in Marathi Set 9

इंग्रजीत एक म्हण आहे – “A friend in need is a friend indeed.” गरजेच्या, संकटाच्या वेळी जो कामी येतो तोच खरा मित्र. मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात तो एकटा राहू शकत नाही. त्याला समाजात सर्वांच्या बरोबर चालण्यासाठी, सुख दु:खात सहभागी होण्यासाठी, मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी एका विश्वसनीय मित्राची गरज असते. मैत्रीबाबत असे म्हटले जाते की, मैत्री केली जात नाही, मैत्री आपोआप होते. मने जुळल्यावर एकमेकांचे वागणे आवडल्यावर परिचयाचे रूपांतर गाढ मैत्रीत होते. भारतात कृष्ण-सुदामा, राम-सुग्रीव, कर्ण-दुर्योधन ही मैत्रीची उत्तम उदाहरणे दाखविता येतात.

माझा पण असाच एक खरा मित्र आहे. त्याचे नाव अशोक आहे व तो माझा वर्गमित्र आहे. आम्ही दोघे नेहमी बरोबर असतो. आमचे कुटुंबीय दहा वर्षांपूर्वी महिनाभराच्या अंतराने या गावी आले. तेव्हापासूनच आमची मैत्री जमली. अशोकचे वडील शिक्षक आहेत आणि माझे वडील बँकेत काम करतात. अशोकचे वडीलच शाळेत प्रवेश घेताना आमच्याबरोबर आले होते. तेव्हापासून आमची ओळख व मग मैत्री झाली.

अशोकची उंची ४.५” आहे. आम्ही ७ व्या वर्गात आहोत. अशोक खूप अभ्यास करतो. वर्गात शिकविणे चालू असताना तो एकाग्र होऊन शिक्षकांकडे लक्ष देतो. महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घेतो. त्याचे अक्षर सुंदर आहे. त्याला नेहमीच चांगले गुण मिळतात. तो जसा चांगला विद्यार्थी आहे तितकाच चांगला खेळाडू आहे. तो फुटबॉल संघाचा कप्तान आहे. त्याचे वागणे नम्र आहे. शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तो सारखाच लोकप्रिय आहे.

तो नेहमी वेळेवर शाळेत येतो. त्याचे कपडे स्वच्छ असतात, बुटांना पॉलिश केलेले असते. त्यांचे दांत मोत्यांप्रमाणे चमकदार आहेत. नखे कापलेली असतात. आम्ही वर्गात एकाच बाकावर वसतो. गणित, विज्ञानाचे, प्रश्न आम्ही मिळून सोडवितो. मला इंग्रजी चांगले येते. अशा प्रकारे एकमेकांच्या सहकार्याने आम्ही चांगले गुण मिळविण्यात यशस्वी हातो. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतही तो माझ्याबरोबर असतो. संध्याकाळी आम्ही एकत्रच खेळतो. कधी कधी एकमेकांच्या घरी जातो. एकदा माझे वडील आजारी असताना तो संध्याकाळी रोज-दवाखान्यात येत असे. त्याचे वडील पण तब्येतीची चौकशी करीत.

मला माझ्या मित्राचा अभिमान आहे. आमची मैत्री सदैव अशीच राहावी असे मला वाटते. मला खात्री व विश्वास आहे की आमची मैत्री कधीच तुटणार नाही.

माझा मित्र मराठी निबंध Set 10 – My Best Friend Essay Marathi Set 10

परवाच माझे रोहनशी जोरदार भांडण झाले. रोहन हा माझा अगदी बालवर्गापासूनचा मित्र. तो माझ्याच इमारतीत तळमजल्यावर राहातो. त्यामुळे आम्ही अगदी सकाळ संध्याकाळ एकत्र असतो असे म्हणायला हरकत नाही. भांडण करायला कारण तसे किरकोळच होते. कुठला खेळ खेळायचा ह्यावरून आम्ही भांडलो आणि शेवटी न खेळताच घरी परत गेलो. दुस-या दिवशी मला चुकल्याचुकल्यासारखे होत होते कारण रोहनशी बोलता येत नव्हते. भांडण झाले होते ना? शेवटी माझी घालमेल चाललेली आजीला कळली. तिने रोहनला बोलावून घेतले तोही जणू काही आजीच्या बोलावण्याची वाटच बघत असल्यासारखा आला. मग काय? आम्ही गेलो ना आमचे भांडण विसरून! मैत्री ही अशी असते. मित्र हा असा असतो.

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. ज्याच्याशी तो आपल्या मनातल्या गोष्टी बोलू शकेल असा कुणी ना कुणी सोबती त्याला ह्या जगात हवा असतोच. जो मित्र आपल्या जीवाला जीव देतो, सुखदुःखात साथ देतो, आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतो, अडचणीच्या वेळेस धावून येतो तोच आपला खरा मित्र असतो. आपले चुकत असले तर वेळप्रसंगी तो आपली कानउघाडणीही करतो. अशा वेळी त्याचा हेतू चांगलाच असतो, ते आपण समजून घेतले पाहिजे. शिवाय आपल्याला जर चांगला मित्र हवा असेल तर आपण स्वतः तसे अगोदर बनले पाहिजे.

संस्कृतमध्ये सूर्याला मित्र असेही नाव आहे. खरोखरच सूर्य हा ह्या सृष्टीचा मित्रच आहे. सूर्य नसेल तर ही सृष्टीच उरणार नाही. त्यामुळे सूर्याचे हे नाव अगदी समर्पक वाटते.

चांगल्या मित्रांच्या जोड्या ह्या जगात पुष्कळ होऊन गेल्या. कृष्णसुदाम्याची कहाणी आपल्याला माहिती आहेच. कृष्ण राजा झाला, मोठा माणूस झाला परंतु तो लहानपणीच्या आपल्या मित्राला विसरला नाही. त्याची गरीब परिस्थिती त्याने जाणून घेतली आणि आपल्या मित्राचा स्वाभिमान न दुखवता त्याने त्याला मदत केली. कर्ण आणि दुर्योधनाची मैत्रीही आपल्याला माहिती आहे. कर्णाच्या वाईट काळात दुर्योधनाने त्याला मदत केली. त्याला राजेपद दिले. ते कर्ण कधीही विसरू शकला नाही. ‘तू कुंतीचा मोठा मुलगा आहेस, तेव्हा तू पांडवांच्या बाजूने ये’ असे खुद्द कृष्णाने सांगूनही कर्णाने आपल्या मित्राला धोका दिला नाही.

खरा मित्र मिळणे ही मोठी भाग्याची गोष्ट असते. सर्वांना खरा मित्र मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला जर तसा मित्र मिळाला असेल तर तुम्ही देवाचे आभार माना आणि तुम्हीही त्याचे खरे मित्र बना.

माझा मित्र निबंध मराठी Set 11 – My Best Friend Essay in Marathi Set 11

माझा मित्र निबंध प्रस्तावना.

आपल्या सर्वांचे अनेक मित्र असतात, पण खऱ्या आणि चांगल्या मित्राची आयुष्यात प्रत्येकाला गरज असते. आपला खरा मित्र कोणता हे ओळखणे थोडे अवघड आहे. पण काळाच्या ओघात आपला सर्वात चांगला मित्र कोण आहे हे आपल्यालाच कळते.

बर्‍याच वेळा अनेकजण मवाळ बोलून आपली दिशाभूल करतात आणि हा आपला प्रिय मित्र आहे असे आपल्याला वाटू लागते. पण असे लोक कधीच चांगले मित्र बनत नाहीत आणि काम झाल्यावर ते आपल्यापासून अंतर ठेवतात.

एक चांगला मित्र कधीच असे करत नाही, परंतु जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा तो आपल्याला मदत करतो आणि वास्तविकतेची ओळख करून देतो.

माझा आवडता मित्र

माझ्या प्रिय मित्राचे नाव रवी आहे. तो माझ्या शाळेत माझ्यासोबत शिकतो. माझ्यासोबत लहानपणापासून शाळेत शिकणारे माझे अनेक मित्र आहेत, पण त्या सर्वांशी माझी मैत्री 3 वर्षात रवीशी झाली तेवढी घट्ट होऊ शकली नाही. या तीन वर्षांत अशा अनेक घटना घडल्या की रवी माझा खरा मित्र असल्याची जाणीव झाली.

असा चांगला मित्र मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. चांगल्या मित्रामध्ये असायला हवेत असे सर्व गुण त्याच्यात आहेत. आम्ही दोघेही प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत एकमेकांना साथ देतो. आमची मैत्री आयुष्यभर अशीच राहील याची मला खात्री आहे.

माझ्या आवडत्या मित्राची वैशिष्ट्ये

रवी हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असला तरी त्याचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे. तो मृदू बोलतो आणि मोठ्यांचा आदर करतो. तो अभ्यासात माझ्यापेक्षा खूप चांगला आहे आणि खेळातही रस घेतो.

तो सर्वांशी आत्मविश्वासाने बोलतो आणि सर्वांशी चांगले वागतो. आम्ही दोघे एकत्र बसून गप्पा मारतो तेव्हा आम्हाला वेळही कळत नाही. त्याला कथा आणि कविता लिहिण्याची आवड आहे आणि मला वाचनाची आवड आहे, त्यामुळे आमची चांगलीच गट्टी जमते.

जेंव्हा तो नवीन कथा किंवा कविता लिहितो तेंव्हा तो मला सर्वात आधी सांगतो. आमच्या मैत्रीवर त्यांनी अनेक कविताही लिहिल्या आहेत, ज्या मला खूप आवडतात. तो खूप छान माणूस आहे आणि सर्वांना मदत करतो.

आमच्या शाळेत जेव्हा जेव्हा स्काउटिंगची कामे दिली जातात, किंवा समाजसेवेचे काम करण्यास सांगितले जाते तेव्हा तो सर्वात पुढे असतो. तो खरा आहे आणि माझ्या माहितीनुसार मी त्याला कधीही खोटे बोललेले पाहिले नाही.

एखाद्याला कडू वाटले तरी तो स्वतः चांगला होण्यासाठी खोट्याचा अवलंब करत नाही. खऱ्या मित्राचे वैशिष्ट्य म्हणजे तो तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवतो.

जेव्हा जेव्हा मी एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळतो तेव्हा मी त्याला फक्त सांगतो आणि तो मला योग्य सल्ला देतो. त्याच्यात अनेक गुण आहेत जे मला कालांतराने कळत गेले आणि आमची मैत्रीही घट्ट होत गेली.

माझा मित्राबद्दल काही घटना

माझे अनेक मित्र आहेत पण त्यांच्यात रवी कसा खास झाला याचा विचार केल्यावर मला अनेक गोष्टी आठवतात. त्यातील एक म्हणजे जेव्हा त्याने मला साथ दिली आणि खऱ्या मित्राचे कर्तव्य पार पाडले.

मी दहावीत असताना रवीने आमच्या शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळेस मी माझ्या किशोरवयात अभ्यासाबाबत थोडा बेफिकीर झालो होतो आणि मला सर्व काही माहित आहे असे वाटायचे.

शिक्षक वर्गात शिकवायचे तेव्हा मी लक्ष देत नसे. परिणामी सहामाही परीक्षेत मी दोन विषयांत नापास झालो. त्यावेळी रवीने मला समजावून सांगितले आणि मन लावून अभ्यास करण्यास प्रवृत्त केले.

मला जेव्हा जेव्हा अभ्यासात काही अडचण येत असे तेव्हा तो माझ्या घरी यायचा आणि मला अभ्यासात मदत करायचे, त्यामुळे मी दहावीच्या वार्षिक परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. एकदा आमच्या शाळेत स्पोर्ट्स फंक्शन आयोजित करण्यात आले होते आणि आम्ही दोघेही त्यात सहभागी झालो होतो.

आम्हाला कबड्डीची आवड होती म्हणून आम्ही त्या खेळात भाग घेतला. आमच्या शाळेत वेगवेगळ्या शाळांचे संघ आले. त्यांच्यापैकी काही विद्यार्थ्यांचा स्वभाव खूप मत्सरी होता, त्यामुळे कबड्डीच्या खेळादरम्यान त्यांनी मला पकडले आणि धक्काबुक्की केली.

त्यामुळे माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रवीने माझी काळजी घेतली आणि शिक्षकांच्या मदतीने मला रुग्णालयात नेले. तसेच अशा वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली.

मग रवी अनेकदा माझ्या घरी यायचा आणि जोपर्यंत मला डॉक्टरांनी शाळेत जायला मनाई केली होती तोपर्यंत तो मला शाळेत शिकवले जाणारे सर्व महत्त्वाचे विषय समजावून सांगत असे. अशा प्रकारे या तीन वर्षांत अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्यामुळे आमचे नाते अधिक घट्ट होत गेले.

आमची मैत्री श्रीमंत गरिबीच्या पलीकडे आहे

माझा मित्र रवी हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे त्याला पैशाचे महत्त्व चांगले समजते आणि तो उधळपट्टी करत नाही. याउलट मी श्रीमंत कुटुंबातून आलो आहे आणि त्याला भेटेपर्यंत खूप उधळपट्टी करायचो.

अनेक वेळा मी माझ्या वर्गमित्रांसह पार्ट्या करायचो आणि महागड्या वस्तू खरेदी करायचो. पण जेव्हा मी रवीशी मैत्री केली तेव्हा त्याने मला समजावून सांगितले की पैसे मिळवणे खूप कठीण आहे आणि आमचे पालक खूप कष्ट करून पैसे कमवतात, त्यामुळे आपण ते वाया घालवू नये.

इतर सर्व मित्रांप्रमाणे, त्याने मला महागड्या भेटवस्तू देण्यास नकार दिला आणि सांगितले की जर तुमच्याकडे पैसे शिल्लक असतील तर तुम्ही ते जमा करा किंवा त्यांच्याकडून कोणत्याही गरीब असहायांना मदत करा.

त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला आणि मला समजले की श्रीमंती आणि गरिबीचा मैत्रीच्या नात्यावर परिणाम होत नाही. त्याच्यासाठी एकमेकांबद्दल फक्त अस्सल भावना असणे पुरेसे आहे.

अशी होती कृष्ण आणि सुदामाची मैत्री, संपत्तीची भिंत त्यांच्या वाटेला कधीच आली नाही. आता आम्ही दोघेही आमच्या वाढदिवशी आमच्या श्रद्धेनुसार गरजूंना मदत करतो, ज्यामुळे आम्हाला अपार शांती आणि आनंद मिळतो.

माझा विश्वासू मित्र

माझा प्रिय मित्र रवीवर माझा खूप विश्वास आहे आणि मी त्याला काहीही संकोच न करता सर्व काही सांगू शकतो. खर्‍या मित्राचे वैशिष्ट्य म्हणजे तो तुमची गुपिते सर्वांसमोर उघड करत नाही आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता.

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या मित्राबद्दल काही गोष्टी सांगू शकत नाही, तर तो नक्कीच तुमचा खरा मित्र नाही. त्यामुळे ज्याच्यावर श्रद्धा आहे त्यालाच सर्व गोष्टी सांगाव्यात.

मी रवीला अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्या मला इतर लोकांसोबत शेअर करायच्या नव्हत्या आणि त्याने माझे सर्व बोलणे ऐकून घेतले आणि कोणालाही सांगून माझी चेष्टा केली नाही, जे बहुतेक लोक करतात.

माझा मित्र योग्य सल्लागार

चांगला मित्र तोच असतो जो तुम्हाला योग्य सल्ला देतो आणि तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखतो. आयुष्यात अशी अनेक माणसे भेटतात जी आपल्याला आपापल्या परीने समजावून सांगतात.काही लोक चांगले सल्ले देतात तर काही दुसऱ्याच्या त्रासातही आपला स्वार्थ सिद्ध करण्यात व्यस्त असतात आणि त्यामुळे सर्वांची दिशाभूल करतात.

त्यामुळे जेव्हा-जेव्हा मला असे वाटले की या परिस्थितीत काय करावे हे समजत नाही, तेव्हा मी माझे पालक आणि माझा मित्र रवी यांचा सल्ला घेतला आहे. कारण त्याने मला नेहमीच योग्य मार्ग दाखवला आहे.

माझ्या चांगल्या कृत्यांबद्दल त्यांनी मला प्रोत्साहन दिले, माझी प्रशंसा केली आणि मला कोणतीही चूक न करण्याची ताकीद दिली. त्यांनी मला माझी चूक मान्य करायला शिकवले आणि सांगितले की आपण सर्व मानव आहोत आणि आपण चुका करू शकतो, परंतु आपण आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे आणि भविष्यात असे न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जेव्हा जेव्हा माझे मन उदास असते किंवा मनःस्थिती खराब असते तेव्हा ते चुटकीतील जादूप्रमाणे माझा मूड ठीक करते. तो माझ्या प्रत्येक सुख-दु:खाचा सोबती आहे आणि माझ्या स्वाभिमानाचा आदर करतो.

मी त्याच्या सत्यता आणि प्रामाणिकपणाने खूप प्रेरित झालो आहे. आपण जे काही काम करतो किंवा करण्याचा विचार करतो, त्याची योजना आपण मिळून बनवतो. आम्हाला आमची सुट्टी एकत्र घालवायला आणि एकत्र फिरायला जायला आवडते. उपसंहार

असा खरा मित्र प्रत्येकाला मिळावा अशी माझी इच्छा आहे. आपण एखाद्या मित्राची परीक्षा घेण्यासाठी यावे आणि आपल्याला कधीही चांगला मित्र मिळाला तर आपण त्याची बाजू सोडून त्याचा आदर करू नये, कारण जीवनात चांगला मित्र असणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून आपल्याला भावनिक आधार मिळेल आणि आपण योग्य मार्गावर चालता.

निष्कर्ष – माझा मित्र निबंध मराठी

असा खरा मित्र प्रत्येकाला मिळावा अशी माझी इच्छा आहे. आपण एखाद्या मित्राची परीक्षा घेण्यासाठी यावे आणि आपल्याला कधीही चांगला मित्र मिळाला तर आपण त्याचा आदर करावा, कारण जीवनात चांगला मित्र असणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला भावनिक आधार मिळेल आणि आपण योग्य मार्गावर चालता.

  • माझी बहिण निबंध
  • माझी बहीण निबंध 10 ओळी
  • माझी शाळा मराठी निबंध
  • माझी शाळा निबंध मराठी लेखन
  • माझी आई निबंध मरा ठी
  • दिवाळी सणाची माहिती मराठीत
  • दिवाळी निबंध मराठी
  • दिवाळी निबंध मराठी 10 ओळी
  • माझे आजोबा निबंध मराठी
  • माझी आजी निबंध मराठी 
  • माझे बाबा निबंध मराठी
  • मी पाहिलेला अपघात निबंध
  • माझा आवडता खेळ निबंध
  • माझा जिवलग मित्र मराठी निबंध 
  • माझे कुटुंब निबंध मराठी
  • शिक्षक दिन निबंध मराठी 
  • माझी शाळा निबंध 10 ओळी  

प्रश्न १. मी माझ्या मित्राबद्दल निबंध कसा लिहू शकतो?

उत्तर- प्रास्ताविक परिच्छेदामध्ये वाचकांना आकर्षित करण्यासाठी एक आकर्षक सुरुवातीचे वाक्य समाविष्ट करा, विषयाची लगेच ओळख करून द्या आणि प्रबंध विधान करा. तुमचा प्रबंध या प्रकरणात, तुमचा मित्र चांगला मित्र आहे. मुख्य परिच्छेद लिहा. तुमचा मित्र चांगला मित्र का आहे याचे वर्णन करा आणि स्पष्ट करा.

प्रश्न २. खरा मित्र निबंध म्हणजे काय?

उत्तर- मित्रांशिवाय कोणीही करू शकत नाही, जीवन सोपे करण्यासाठी आपल्याकडे काही मित्र असले पाहिजेत. मात्र, भाग्यवान तेच असतात ज्यांना आयुष्यात खरी मैत्री मिळते. खरी मैत्री ती असते, जेव्हा एखादी व्यक्ती वाईट आणि चांगल्या प्रसंगात तुमच्यासोबत असते.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मैत्री वर निबंध मराठी Essay on Friendship in Marathi

Essay on Friendship in Marathi – My Best Friend Essay in Marathi मैत्री वर निबंध मराठी विश्वासाचं प्रेमाचं एक निखळ नातं म्हणजे मैत्री. मैत्री हे एक असं नातं आहे ज्यामध्ये कोणतीही वयोमर्यादा, रंगरूप, जातिभेद, उच्च-नीच‌ पाळलं जात नाही. मैत्रीच वर्तुळ फार मोठं आहे आणि त्याला कोणतीही रेषा नाही आहे. मैत्री एक असं नात आहे जे आपल्या सर्वांचे आयुष्य अधिक सुंदर बनवत. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात अशी एक तरी मैत्रिण किंवा मित्र असतो ज्याच्या सोबत आपली फार घट्ट अशी मैत्री असते. म्हणजे जिथे आपल्याला आपल्या मैत्रिणी बद्दल किंवा मित्राबद्दल फार प्रेम आपुलकी वाटते आणि सहज आपली मैत्री अशा व्यक्तीशी होते.

ज्यांच्या आवडीनिवडी आपल्या आवडीनिवडीशी मिळत्याजुळत्या असतात. मैत्री एक अस नात आहे जे आपल्या सर्वांनाच हवंहवंसं वाटत असतं. ते लोकं फारच भाग्यवान आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये जीवाला जीव देणारे व विश्वासू मित्र मैत्रिणी आहेत.‌ मैत्री आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे.

मैत्रीमुळे आपले आयुष्य अधिक सुखी आणि आनंददायी बनतं. अगदी लहानपणापासूनच आपले वेगवेगळे मित्र-मैत्रिणी बनत जातात काहीं सोबत आपल अगदी घट्ट असं नातं तयार होतं परंतु तेच आपले खरे मित्र असतात जे अगदी शेवट पर्यंत आपल्या आयुष्यात टिकून राहतात. मैत्री हे एक असं नातं आहे जे आपल्या सुखा मध्ये सहभागी होतं आणि आपल्या दुःखामध्ये आपला आधार बनतं.

essay on friendship in marathi

मैत्री वर निबंध मराठी – Essay on Friendship in Marathi

My best friend essay in marathi.

एक घट्ट मैत्री म्हणजे सोबत हसणं, खेळणं, आपल्या मनातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सांगणं, एकमेकांच्या सुखा दुःखामध्ये सहभागी होणे, याला खरी मैत्री बोलतात. मैत्रीमध्ये आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगायला मिळतात मैत्री आपल्याला जगायला शिकवते मैत्रीमुळे आपली स्वतःशीच एक वेगळी ओळख होते.

मैत्री आपल्यातील कलागुण कौशल्याची आपल्याला जाणीव करून देते. मैत्रीमुळे आपण मानसिक दृष्ट्या  तंदुरुस्त आणि सकारात्मक राहतो.‌ आपल्या आयुष्यामध्ये अशी अधिक लोक आहेत ज्यांना आपण आपले मित्र म्हणून बोलावतो परंतु आपण आपल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशीच शेअर करतो जे आपल्या खूप जवळचे असतात आणि त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो.

आपलं मैत्रीचं वर्तुळ कितीही मोठं असलं तरीही आपल्याला माहित असतं की आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला आपल्या हाकेला कोण धावून येईल ते, कारण आपला त्या व्यक्तीवरती विश्वास असतो आपली त्याच्या सोबत असलेली मैत्री हा विश्वास घडवते. शाळेमध्ये, महाविद्यालयांमध्ये आपले अनेक मित्र मैत्रिणी बनतात परंतु आपला खरा मित्र तोच असतो जो अगदी शेवटपर्यंत त्या प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देतो.

मैत्री ही दोन प्रकारची असते आपल्या आयुष्यामध्ये दोन प्रकारचे मित्र असतात एक चांगले मित्र आणि दुसरे म्हणजे खरे मित्र. खरे मित्र हेच असतात ज्यांचा आपल्याशी आपुलकीचं, प्रेमाच एक विशेष असं नातं जोडलेलं असतं. त्यांच्यावरती आपण दीर्घकाळ विश्वास ठेवू शकतो आणि आपल्याला माहीत असते की पुढे जाऊन हे मित्र आपल्याला नेहमी साथ देतील.

खरा मित्र आपला आयुष्य अधिक सोप्प आणि आनंददायी बनवतो खरा मित्र आपल्याला अडचणीच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र आपल्याला योग्य ते उपदेश देऊन योग्य ती मदत करतो. खरी मैत्री आपल्याला परिपूर्ण बनवते. खऱ्या मैत्रीमध्ये आपण एकमेकांना योग्य ते मार्गदर्शन करतो. मैत्रीच नात हे कुठल्याही मर्यादा पलीकडे जाऊन जपलं जातं.

  • नक्की वाचा: मैत्रीदिनावर शुभेच्छा संदेश 

मैत्री हे एक असं नात आहे जे आपण हृदयापासून जगतो, निभावतो. प्रेम, त्याग, काळजी, आपुलकी हे सगळं मैत्री या गोड नात्या मध्ये पहायला मिळतं. मैत्रीमध्ये एक एकमेकांवर वर हक्काने रागवायचं, रुसायचं, एकमेकाच्या खोड्या काढायच्या, अगदी हक्काने आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगायची आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करत अगदी घट्ट विश्वास ठेवणं म्हणजे मैत्री होय. मैत्री कुणाशीही असू शकते.

मैत्री हा असा विषय आहे ज्यावर बोलण्यासाठी लिहिण्यासाठी शब्द कमी पडतील मैत्री एक भावना आहे जी शब्दांमध्ये उतरवणं अशक्य आहे. जर आयुष्यामध्ये मैत्री नसेल तर आपल आयुष्य व्यर्थ आहे. कारण आपल्या आयुष्याला अधिक सुंदर बनवण्याचे काम मैत्री करते मैत्रीमुळे आपण जगायला शिकतो.

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जे नात आपण अगदी हृदयाने जपतो ते म्हणजे मैत्रीचं नातं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी येतच असतात तरीही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मैत्री बदलत जाते. परंतु अगदी लहानपणापासुन ते अगदी आपल्या मरणा पर्यंत जर एखादी व्यक्ती आपल्यासोबत असेल तर ती खरी मैत्री असते.

संपूर्ण जगभरात मैत्रीचे नात सुंदर मानलं जातं. मैत्रीचं नातं सुंदर विशेष आणि खास मानलं जात म्हणूनच संपूर्ण जगभरात मैत्रीचा एक स्वतंत्र खास दिवस देखील साजरा केला जातो. त्याला फ्रेंडशिप डे असं म्हणतात भारतामध्ये फ्रेंडशिप डे हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या हफ्त्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपण आपल्या आवडत्या मित्र मैत्रिणीला वेगवेगळ्या भेटवस्तू भेट म्हणून देतो ग्रीटिंग कार्ड देतो. इतकच नव्हे तर या दिवशी मैत्री अगदी शेवटपर्यंत टिकवण्याचा वचन देखील दिलं जातं. फ्रेंडशिप डे हा दिवस इतर सणां सारखा साजरा केला जातो. मैत्रीच नात हे खूप वेगळ असत जरी आपले बरेच मित्रमैत्रिणी आपल्यासोबत नसले तरी जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपण त्यांची आठवण नेहमीच काढतो आपण त्यांच्यापासून कितीही दूर असलो तरी मैत्रीचं नातं हे कायम तसच राहत.

मैत्रीचं नातं हे वर्तुळा सारख असतं ज्याला शेवट कधीच नसतो. मैत्री ही दिव्यातल्या पणती सारखी असते जी अंधारामध्ये पण प्रकाश देते. आपल्या मनात असणारे प्रश्न अडचणी, मनात असणार ओझ हलका करण्याची जागा म्हणजे मैत्री. मैत्री हे एक असं नातं आहे जिथे आपण आपल्या मनापेक्षा समोरच्या व्यक्तीचा खूप जास्त विचार करतो समोरच्याचं मनं जपण्याचा प्रयत्न करतो.

मैत्री ही पाण्यासारखी अगदी शुभ्र आणि निर्मळ असते. मैत्री ही ओळखीच्या व्यक्तींशी होते असं नाही आपल्या नकळत आपण अनोळख्या व्यक्तीशी मैत्री करतो. आपण जन्माला येतो तेव्हा सगळी नाती आधीच आपल्या पदरात पडतात परंतु मैत्रीचं नातं हे एक असं नात असतं जे आपण स्वतः निवडतो.

शेवटी ती ईश्वराची लीला अगाध आहे न जाणे कुठून देव आपल्याला अनोळख्या व्यक्तीशी नात जुळवून देतो अनोळख्या व्यक्तींना आपल्या मनात हृदयात स्थान देतो ज्यांना कधी आपण ओळखतही नसतो अशा व्यक्तीशी आपली अगदी घट्ट मैत्री होऊन बसते. आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी मित्र-मैत्रिणी बनवतो ती अगदी साधारण गोष्ट आहे.

परंतु एकाच व्यक्ती सोबत आपण आयुष्यभर मैत्री निभावतो एकाच व्यक्ती बरोबर मैत्री टिकवून ठेवणे ही असामान्य गोष्ट आहे. आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे लोक येत राहतात त्यातील काहींशी आपली चांगली मैत्री होते काही आपल्याला सोडून जातात काही सोडून गेलेली पुन्हा येतात पण काही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोबत राहतात यालाच खरी मैत्री म्हणतात.

रक्ताची नाती आपल्याला जन्मता मिळतात परंतु मनाने जोडलेलं नातं म्हणजे मैत्रीचं नातं असतं. मैत्रीचं नातं हे सर्वाँचं आवडीच नातं असतं कारण त्यामध्ये कोणतेही बंधन नसतं, कोणत्याही अटी नसतात. मैत्रीची अनेक रूपे असतात. काही वाईट असतात काही चांगले असतात काहींना आपल्या मनामध्ये जपून ठेवतो.

मैत्री या दोन अक्षरांमध्ये फार ताकद आहे मैत्री हा शब्दाच आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल आणण्यास पुरेसा आहे. मैत्रीचं नातं इतकं अतूट असते की आयुष्यातील कोणतीही नाते शेवटपर्यंत टिकत नाहीत परंतु मैत्रीचं नातं असं नातं असतं जे अगदी शेवटपर्यंत सोबत राहत. मैत्रीचं नातं असं असावं की अगदी एकमेकांपासून लांब असलात तरी एकमेकांची आठवण काढल्याशिवाय दिवस जाणार नाही.

आयुष्यामध्ये एक चांगला मित्र किंवा मैत्रीण असण्यासाठी खूप नशीबवान असावं लागतं. मैत्रीमध्ये जसे दोन शब्द असतात तसेच दोन मनांना जोडणारी म्हणजे मैत्री. दोन व्यक्तींनी हृदयापासून जपलेलं नातं म्हणजे मैत्री. मैत्री एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असं काही नाही एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही पण मी तुला विसरणार नाही ही माझी खात्री आणि तुला त्याची जाणीव असावी ही आपली मैत्री. 

पु. ल. देशपांडे यांनी मैत्री या विषयावर लिहिलेली ही कविता मैत्रीच्या गोड नात्याचं सुंदर वर्णन करते. खरा मित्र कोणाला म्हणावे? खरा मित्र तो असतो ज्याच्या समोर आपण आपल्या मनातील प्रत्येक भाव लज्जा संकोच न वाटून घेता व्यक्त करतो. मैत्रीच गोड नात जर अगदी शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं असेल तर आपण आपल्या खऱ्या मित्राशी कधीच खोटं नाही बोललं पाहिजे.

मैत्रीमध्ये एकमेकांचा आदर करणे देखिल तितकच गरजेचं असतं. एकमेकांच्या विचारांचा आदर करणं. मैत्री हे एक सुंदर नात आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री सारखं सुंदर नातं असणे अतिशय गरजेचे आहे.

आम्ही दिलेल्या essay on friendship in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मैत्री वर निबंध मराठी  बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या marathi essay on my friend या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि my best friend essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maza avadta mitra nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

essay on my friend farmer in marathi

Marathi Delight

शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi

Farmer essay in Marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या या लेखामध्ये आपण शेतकरी राजावर निबंध लिहिणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो या निबंधमार्फत आपण शेतकरी राजाचा जीवन सुद्धा जाणून घेणार आहोत. शेतकरी राजा विषयी अधिक माहिती व Farmer essay in Marathi साठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi (300 words)

समाजात व संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावतात. शेतकरी हा प्रत्येक मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. मित्रांनो आज मी या निबंध लेखनामार्फत शेतकरी  राजाचे महत्त्वपूर्ण विविध प्रकारचे पैलू व शेतकरी राजाला आपण विविध प्रकारच्या दृष्टिकोनातून कसे समजू शकतो हे सांगणार आहे.

Farmer essay in Marathi-मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की शेतकरी आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्त्वाची भूमिका बजावतात? शेतकरी हा जगातील अन्नपुरवठ्याचा प्राथमिक उत्पादक असून मानवी जीवनासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारची पोषक तत्वे पोहोचविण्याचे काम शेतकरी करतात. शेतकरी राजाने आपल्या शेतीमध्ये पशुधन वाढवतात त्याच बरोबर विविध प्रकारच्या पिकांची लागवड शेतामध्ये करून चांगल्या प्रकारची उत्पादने घेऊन  मानवी जीवनाला सहाय्यक करतात.

तुम्ही कधी विचार केला आहे का की  जर आपल्याला जेवायलाच मिळाले नाही तर आपण कसे होऊ? सर्व जगात अन्नाची तीव्र टंचाई निर्माण होऊन सर्व बालके व मानवी जीवन अस्ताव्यवस्था होऊन शाकाहारी प्राणी त्याचबरोबर पृथ्वीतलावरील प्रत्येक जीव हा कुपोषित होऊन अन्नाची तीव्र  टंचाई निर्माण होईल.अर्थातच शेतकरी राजा शिवाय पृथ्वीतलावर अन्नाची तीव्र टंचाई निर्माण होईल.

या व्यतिरिक्त तुम्हाला तर माहितीच असेल की अनेक देशांची अर्थव्यवस्था ही उत्पादनावर  सुद्धा चालते. बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे महत्वपूर्ण योगदान आहे.आपल्याला नेहमीच असं वाटत होतं की शेतामध्ये जेव्हा उत्पन्न निघताय आणि त्याची व्यापाराकडे जाऊन जेवढी विक्री होत आहे फक्त आपल्याला तेवढाच फायदा होत असतो परंतु या व्यतिरिक्त सुद्धा शेतीचे विविध प्रकारचे फायदे आहेत.

कधीही डोळ्यांना दिसणारा शेतीचा हा उद्योग अन्नप्रक्रिया, वाहतूक अशा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या सर्वत्र संधी उपलब्ध करून देत आहेत. जर आपण शेतकऱ्यांची मदत करून त्यांना कृषी क्षेत्रामध्ये असलेल्या वाढत्या ज्ञानाची माहिती देऊन शेतीमध्ये जास्तीत जास्त मेहनत न घेता उत्पादन कसे काढायचे यासाठी जर आपण त्यांना मदत केली तर ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा  गरीबीतून बाहेर निघतील असे मला वाटते.छोट्या छोट्या गावांमध्ये अर्थातच संपूर्ण देशात ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रत्येक घरोघरी चालणारा व्यवसाय असतो. म्हणजेच ग्रामीण भागांना शेतकरी हा कणा असतो.

शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi (400 words)

Farmer essay in Marathi-भारत कृषी प्रधान देश आहे. भारतामध्ये ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय बहुतेक प्रमाणात चालतो. ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी कमी असून शेती हा रोजच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेती ही एक जगायचं साधन बनलेला आहे. ग्रामीण भागातील शेती करण्यामुळे शेतकरी स्थानिक अर्थव्यवस्था, शाळा व विविध प्रकारच्या सुविधा पायाभूत टिकविण्याचा प्रयत्न करणे.शेतकरी राजाच समाजामध्ये खूप मोठे योगदान आहे.

जागतिक स्तरावर अन्न संकट टाळण्यासाठी शेतकरी राजा हा नेहमी रात्रंदिवस कष्ट करत असतो. त्याचबरोबर सामाजिक स्तरावर व जागतिक स्तरावर अन्न संकट अर्थातच अन्नटंचाई निर्माण होऊ नये म्हणून शेतकरी राजा ऊन,वारा,पाऊस अशा सर्व संकटांना सामोरे जाऊन अन्नपुरवठा शेतकरी राजा करत असतो. शेतकरी राजामुळे संपूर्ण जगाला अन्नपुरवठा होत असतो. शेतकरी राजा हा खूप मेहनती असून तो पूर्ण जगाला अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ देत नाही.

शेतकरी हा आपला वारसा सुद्धा पुढे चालवत असतो. ग्रामीण भागात करा बऱ्याच ठिकाणी   पिढी दर पिढी शेती हा व्यवसाय सुरू असतो. यामध्ये विविध प्रकारचे आजच्या तांत्रिक पद्धतीचे बदल घडवून रासायनिक खतांचा कमी वापर करून जमीन कशा पद्धतीने सुपीक बनविता येईल याची काळजी घेऊन चांगल्या प्रकारची उत्पादने घेऊन शेतीमध्ये अजून चांगले कसे बदल घडविता येतील याबद्दल शेतकरी नेहमी प्रयत्नशील असतो.

शेतकरी वर निबंध

शेतकरी राजा त्याच्या शेतीमध्ये पिकविलेले अन्न हे कसे लोकांसाठी सुरक्षित असेल याची काळजी घेतात. माणसाच्या मूलभूत तीन गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा आता यामध्ये सर्वात अगोदर येतं ते म्हणजे अन्न. म्हणजेच माणूस हा अन्नाशिवाय जगू शकत नाही. आणि आज आपण आपल्या ताटामध्ये जे काही खात आहोत ते फक्त आपल्या शेतकरी राजाची  देन आहे. जरी आपण त्यांना दुकानामधून विकत आणून घरी बनवत असून तरीसुद्धा ते अन्न प्राथमिक हे शेतकरी राजाने  बनवलेला असतं. हे तर तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे. म्हणजे आपल्याला अन्नासाठी शेतकरी राजा किती महत्वपूर्ण आहे हे यावरून समजत.

Farmer essay in Marathi-तुम्हाला माहित आहे का?शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादनामुळे देशांना जागतिक बाजारपेठेत सहभागी होता येते आणि तेथून परकीय चलन कमावता येते. कृषी उत्पादनाचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जातो.आणि ह्यामुळे जागतिक स्तरावर व आर्थिक परस्परवलंबनात कृषी क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका ठरते. अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा अशीच सुरू राहणार. अगदी जुन्या काळापासून ते नव्या युगापर्यंत शेतकरी बांधवांनी सामाजिक अर्थव्यवस्थेला  मोठ्या योगदान दिलेले आहे.

माझा शेतकरी राजा रात्रंदिवस शेतीच्या कामासाठी उभे राहून जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करत त्याचबरोबर पशुपक्ष्यांची संवर्धन करत अन्नसुरक्षा, आर्थिक समृद्धी,सांस्कृतिक वारसा  व पर्यावरणाच्या समतोल या सर्व गोष्टींचे पालन पोषण माझा शेतकरी राजा हा जपतो आहे. आपल्या दैनंदिन जीवनात शेतकऱ्याचे खूप महत्त्व आहे हे तुम्हाला या निबंधावरून समजलेच असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि विनवणी करतो की तुमच्याकडून जेवढे शक्य असेल तेव्हा तुम्ही शेतकऱ्याला मदत करावी आणि शेतकरी राजाला नेहमी मानसन्मान द्यावा.

Farmer essay in Marathi (600 words)

शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi (600 words)

Farmer essay in Marathi-मला खूप आनंद होत आहे की मला आज शेतकरी राजा वर निबंध लिहायला मिळाला. शेतकरी राजा हा पृथ्वीला दिलेला सर्वात मोठा वरदान आहे असं म्हटलं तरी चालेल. शेतकरी राजा हा पृथ्वीचा संरक्षक आहे.शेतकरी राजा हा फक्त पूर्ण समाजातच नाही पोषण करत तर हा अर्थव्यवस्थेचा सुद्धा पोषण करतो. शेतकरी राजा हा संपूर्ण समाजाचा, व जगाचा कणा आहे. शेती हा एक असा व्यवसाय आहे जो हजारो वर्षांपासून चालू आहे आणि पुढेही तो चालूच राहील. त्यामुळे सर्व मानवी समाज व्यवस्थितपणे टिकून आहे.शेतकरी राजा हा आपला सर्वांसाठी अन्न व अन्न संसाधने तयार करतो.

शेतकरी राजाची सुरुवात छान उगवत्या सूर्यापासून होते.सर्व शेतकरी हे अगदी कष्टाळू असतात. शेती चांगली करण्यासाठी त्यांच्या जीवनात विविध प्रकारची उद्दिष्ट असतात आणि ते उद्दिष्ट पार पाडण्यासाठी ते सकाळी लवकर उठून आपल्या दिवसाची सुरुवात करत असतात.शेतकरी राजाचे कामे हे विविध प्रकारचे असतात. प्रत्येक ऋतूनुसार शेतकऱ्याची कामे बदलत असतात जसे की वसंत ऋतु मध्ये मातीची मशागत करून बियाणे लावणे हे काम वसंत ऋतूत केले जाते.

उन्हाळ्यामध्ये पिकांचे चांगल्या प्रकारे संरक्षण करायची कामे शेतकरी करतो व शरद ऋतूमध्ये अखेर त्याचे मेहनतीचे फळ त्याला मिळते. शरद ऋतूमध्ये शेतीमध्ये उगवलेले जी काही फळे असतात त्याची कापणी केली जाते. हिवाळ्यामध्ये सुद्धा शेतीमध्ये लागवड केलेले पिकाचे संरक्षण करणे त्याचबरोबर पुढील हंगामासाठी पिकाचे नियोजन करून ठेवू नये, पशुपालन करणे हे सर्व केले जाते. शेती हा केवळ एक व्यवसाय नसून जमीन अशी जोडले गेलेलं एक नातं आहे. सर्व शेतकऱ्यांना पर्यावरणाचे वातावरण, हवामान, व मातीच्या आरोग्य कशाप्रकारे टिकून ठेवायचे या सर्व गोष्टींचे वेगळ्या प्रकारची समज असते.शेतकऱ्याचे हे ज्ञान त्याचे पिढ्यान पिढ्या चालवत असता आणि कृषी क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवीत असतात. शेतकरी राजाला शेती करताना विविध गोष्टींचा सामना करावा लागतो.

कधी कधी शेतीमध्ये चांगले पीकही घेऊन त्यावर कीड लागते, रोगराई पसरते, हवामान बदलानुसार पिकाच्या आरोग्य ढासाळते अशा अनेक गोष्टींचे चढ-उतार शेतकऱ्यांच्या जीवनात येत असतात. आणि यामुळे शेतीमध्ये बऱ्याच नुकसान सुद्धा होत असते. परंतु बदलात या नुकसानाच्या भरपाईत शेतकऱ्याला काहीच मिळत नाही. कधी कधी तर असे होते शेतकरी रात्रंदिवस कष्ट करूनही त्याच्या हाती कोणत्याही प्रकारचे फळ मिळत नाही. परंतु  तरीही शेतकरी हताश न होता आपले कष्ट चालूच ठेवतो आणि फळाची अपेक्षा करत असतो.

Farmer essay in Marathi-काही काही शेतकऱ्यांना तर अशा परिस्थितीचा सामना करायला लागतो की शेती करताना त्याचा वेळही जातो, कष्टही फारसे लागतात, पैसाही खूप खर्च होतो, नको त्या प्रकारची कर्ज त्याच्या डोक्यावर होतात, आणि हे सर्व काही फेडण्यासाठी त्याच्याकडे काही सोडत नाही आणि अशा कारणामुळे बरेच शेतकरी आत्महत्या करणे असे टोकाचे पाऊस सुद्धा उचलून घेतात.शेती या व्यवसायात कष्ट खूप आहेत. परंतु यासाठी शेतकरी राजाचे प्रयत्न नेहमी चांगलेच असतात आणि चांगले फळ देखील त्यांना मिळत असते.

Farmer essay in Marathi - 400 words

आधुनिक काळातील तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये फारसे बदल झालेले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना जास्ती कष्ट घ्यावे लागत नाही किंवा वेळही लागत नाही. आजच्या तंत्रज्ञानामुळे शेतीची काम पटपट होऊ लागले आहेत. शेती तंत्रज्ञानामध्ये पीक सुधारक, पीक उत्पादन क्षमता, अशा विविध यंत्रांचा समावेश असून शेतीची कामे तीव्र गतीने होऊ लागली आहेत. तंत्रज्ञानामुळे आणि नवनवीन साधनांमुळे शेतीवर चांगल्या प्रकारचा प्रभाव पडताना दिसत आहे. परंतु काही ठिकाणी पर्यावरणावर अवलंबून असलेली शेती यावर जास्त भर दिला जात आहे.

मातीचे आरोग्य, जलस्रोत, यावर काम करणारी तंत्रे शेतकरी वापरत आहेत. आणि हा बदल भविष्यातील पिढीसाठी तसेच जमिनीचे संरक्षण करण्यासाठी,पर्यावरणातील शेतीचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर आहे.याचा शेतकरी राजाला मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. यामुळे शेतकरी राजाचे कष्ट कमी होतील आणि शेतकरीला त्याला कष्टाचे फळ मिळेल.

Farmer essay in Marathi-शेतकरी राजाच्या आपल्या जीवनात एक महत्त्वाचा स्थान असून शेतकरी राजा नेहमी चांगल्या फळाची अपेक्षा करत असते मला वाटते.शेतकरी राजाला आपल्याकडून जेवढे सहकार्य होत असतील तेवढे सहकार्य करावे त्यांचे जीवन सुरळीत बनवले असे मी देवाकडे मागणी मागते.आज कालच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शेतकरी राजालाही तेवढेच कष्ट घेऊन सर्व जनतेस अन्न पुरवावे लागत आहे.मला असे वाटते की ह्या जगात अधिक परिश्रम कोणी करत असेल तर तो फक्त आणि फक्त शेतकरी राजा आहे.शेतकरी राजा हा सर्व जगाचा पालनपोषण  करता आहे. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

शेतकरी वर निबंध लेखन.

भारत हा एक कृषिप्रधान देश असून, भारताची सुख-समृद्धी ही कृषी उत्पादनावर अवलंबून आहे. आणि हे सर्व घडवून आणण्यासाठी शेतकऱ्याचे यामध्ये मोलाचे सहकार्य आहे. भारत असा देश आहे की ज्यामध्ये 70 टक्के लोक शेती हा व्यवसाय करत आहेत. ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय अधिक प्रमाणात केला जात. भारतामध्ये शेतकरी रात्रंदिवस कष्ट करूनही सुखी जीवन जगत आहे. शेतकरी हा संपूर्ण समाजाचा व जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचा आधार बनला आहे. भारतामध्ये असंख्य प्रमाणात छोटे-मोठे खेडे आहे आणि या खेड्या गावांमध्ये सर्वत्र चालणारा व्यवसाय म्हणजे शेती. पिढी दर पिढी शेती हा व्यवसाय चालूच आहे.

शेतकरी आत्महत्या

शेती हा व्यवसाय करताना  पर्यावरणानुसार शेतीमध्ये पिकांचा बदल होतो. काही वेळेस पिके योग्य प्रमाणात वाढत नाही तर काही वेळेस पिकांवर किटके, रोगराई पसरते अरे यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळत नाही.शेती करताना शेतकऱ्याला पीक लागवडीसाठी, बियाणे खरेदीसाठी, जमिनीच्या मशागतीसाठी  भरपूर प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो आणि एका काळात असे होते की शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही, यामुळे काही शेतकरी हताश होऊन आत्महत्येचा पर्याय निवडतात. मित्रांनो जर आपण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केल., ज्या शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी आवश्यक ते साधने नसतील ते साधने त्यांना आणून दिले तर समाजामध्ये एक नवीन बदल घडवून व शेतकरी आत्महत्या कुठेतरी थांबेल.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of new posts by email.

माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay In Marathi

my friend essay in marathi

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay In Marathi लेखन 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

Majha Mitra Marathi Nibandh

माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay In Marathi

 वर्णनात्मक निबंध – माझा मित्र

अमोल हा माझा एक अनमोल मित्र आहे. अगदी बालपणापासून आमची दोस्ती. प्रथम आम्ही एकमेकांच्या शेजारी राहत होतो, त्यामुळे दिवसातले बरेचसे तास आम्ही एकत्रच असायचो. आता आम्ही नवीन घर घेतले ते बरेच दूर आहे. पण शाळा, वर्ग, बाक हा माझा व अमोलचा एकच.

अमोलचे हस्ताक्षर व चित्रकला अप्रतिम आहे. त्यामुळे अमोलच्या वया फार सुंदर असतात. अमोल हुशार आहे. त्याला सर्व विषयांत चांगले गुण मिळतात. वक्तृत्वस्पर्धा, नाट्यस्पर्धा यांत मात्र अमोल कधीच भाग घेत नाही; पण माझ्याप्रत्येक स्पर्धेला तो माझ्याबरोबर हजर असतो. माझ्या यशाचा त्याला खूप आनंद होतो.

अमोल अबोल आहे. म्हणून त्याला खूप कमी मित्र आहेत. मात्र तो मनाने फार मोठा आहे. म्हणून मला तो खूप आवडतो.

वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा चालेल

  • माझा मित्र  निबंध मराठी / Maza mitra nibandh marathi
  • मित्र निबंध मराठी /  mitra nibandh marathi
  • मित्रा वर मराठी निबंध / essay on friend in marathi

हे निबंध नक्की वाचा

  • मराठी विषयावरील निबंध संग्रह
  • असा रंगला सामना मराठी निबंध
  • आमची मुंबई मराठी निबंध 
  • भूक नसतीच तर मराठी निबंध
  • मी पाहिलेला समुद्र किनारा मराठी निबंध

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा  माझा मित्र मराठी निबंध  कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Marathi Salla

Essay on friends in marathi | 100, 200 आणि 500 ​​शब्दांमध्ये मित्रांवर निबंध.

December 6, 2023 Marathi Salla मराठी निबंध 0

Essay on Friends in Marathi

Table of Contents

Essay on Friends in Marathi | 100, 200 आणि 500 ​​शब्दांमध्ये मित्रांवर निबंध | Essay on true friend in Marathi | खऱ्या मित्रावरील निबंध

Essay on Friends in Marathi

हे खरे आहे की “मित्र हे कुटुंब आहे ज्यांना आपण निवडतो”. जीवनात खरा मित्र खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमच्या आयुष्यात कुटुंब असणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच मित्र असणंही महत्त्वाचं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक चांगला मित्र आपल्याला साथ देतो. मार्गात कितीही अडथळे आले तरी खरा मित्र आपल्याला नेहमी मदत करतो आणि मार्गदर्शन आणि आधार देतो. ज्याला खरा मित्र मिळाला त्याला जगातील सर्वात मौल्यवान संपत्ती मिळाली. या ब्लॉगद्वारे मराठीत मित्रांवरील निबंध जाणून घ्या (Essay on Friends in Marathi)

Essay on friends in 100 words in Marathi | मराठीत १०० शब्दात मित्रांवर निबंध

मित्र हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे भाग आहेत. ते आपल्यासोबत सुख-दु:ख शेअर करतात. मैत्री हे एक नाते आहे जे समजून, विश्वास आणि समर्थन यावर आधारित आहे. मित्र आम्हाला प्रोत्साहन देतात, आपली स्वप्ने साकार करण्यास मदत करतात आणि अडचणींवर मात करण्यासाठी आपल्या पाठीशी उभे राहतात. चांगले मित्र आपले जीवन सुंदर आणि आनंदी बनवतात. त्यामुळे वेळोवेळी मित्रांसोबत वेळ घालवला पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे.

त्यामुळे आपल्या जीवनात मित्रांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. असे म्हणतात की “जुना मित्र हा सर्वोत्तम आरसा असतो.” जुने मित्र तुम्हाला चांगले ओळखतात. मैत्रीची उणीव ज्यांना कधी जाणवली असेल तेच मित्राचे महत्त्व समजू शकतात. म्हणून, वेळोवेळी आपल्या मित्रांबद्दल प्रेम व्यक्त करत रहा.

आणखी माहिती वाचा : क्रिकेटचे मुख्य नियम | Cricket Rules in Marathi | all about Cricket in Marathi

Essay on friends in 200 words in Marathi | मराठीत 200 शब्दांत मित्रांवर निबंध

मैत्रीचे नाते सर्वात खास असते. चांगल्या मित्राचा सहवास लाभला तर आयुष्यातील सर्वात मोठे दुःख सोपे वाटते. मित्रांसोबत घालवलेला वेळ अमूल्य आहे. प्रत्येक चांगला मित्र आपल्या आयुष्यात नवीन रंग भरतो आणि आपल्याला सकारात्मक दिशेने प्रेरित करतो. आनंद द्विगुणित करतो आणि दु:ख हलके करतो. मैत्रीला खरे आणि विश्वासार्ह नाते म्हणून पूजले पाहिजे कारण ते जीवनातील सर्व अडचणींमध्ये आपली साथ देतात.

चांगले मित्र आपल्याला चांगले लोक बनवतात आणि आपल्याला सर्वोत्तम समर्थन देतात. ते आपल्या चुकांवर चेतावणी देतात आणि आपल्याला शिकण्याची संधी देतात.

मित्रांसोबतच्या नातेसंबंधांचे नूतनीकरण आणि दृढ करण्यासाठी, आपण वेळोवेळी त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. यामुळे आपले मैत्रीपूर्ण संबंध अधिक घट्ट होतात आणि आपण जीवनातील यश आणि आनंदाचा आनंद घेऊ शकतो.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण खऱ्या मित्रांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या वेळेची कदर केली पाहिजे. मैत्री ही समृद्धी आणि आनंदाचा स्त्रोत आहे ज्यामुळे आपले जीवन आनंदी होते.

आणखी माहिती वाचा : पॉडकास्ट म्हणजे काय? | What is podcast in Marathi? | मराठी सल्ला

Essay on friends in 500 words in Marathi | मराठीत 500 शब्दांत मित्रांवर निबंध

आयुष्यात चांगला मित्र मिळणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. मैत्रीचं नातं मोलाचं असतं. एक चांगला मित्र आपल्याला प्रत्येक सुख-दु:खात साथ देतो. आमच्या कठीण प्रसंगी तो नेहमी आमच्या पाठीशी उभा असतो. एक चांगला मित्र आपल्याला कठीण परिस्थितीतून जाण्यास मदत करतो. जेव्हा आपण जीवनातील अडचणींमध्ये हरवून जातो तेव्हा तो आपल्याला मार्गदर्शन करतो. मैत्रीमध्ये विश्वास, समज आणि समर्थन महत्वाची भूमिका बजावतात. या निबंधात आपण मित्रांचे महत्त्व विस्तार मध्ये समजून घेऊ आणि त्यांच्यासोबत राहण्याचे फायदे पाहू.

मित्रांचे महत्त्व | The importance of friends

मित्र हे आपल्या जीवनात रंग भरणारे सोबती असतात. ते आपल्यासोबत सुख-दु:ख शेअर करतात आणि आपल्याला एकटेपणा जाणवू देत नाहीत. खरे मित्र आपल्यासाठी मौल्यवान असतात, कारण ते आपल्या हृदयात काय आहे ते समजून घेतात आणि आपण काहीही न बोलता आपल्याला मदत करतात. मैत्री हे विश्वास आणि समर्थनाचे एक अद्भुत बंधन आहे, जे आपल्याला कालांतराने अधिक मजबूत बनवते. खरा मित्र कधीही स्वतःच्या नफा-तोट्याकडे पाहत नाही. तो फक्त आपल्याला आधार देतो.

  • मित्रांसह जीवनाचा आनंद घ्या

मित्रांसोबत वेळ घालवणे हा एक चांगला अनुभव आहे. आपण प्रवास करणे, खेळणे, मनोरंजन करणे आणि वेळ घालवणे यासारख्या विविध क्रियाकलापांमध्ये एकत्र गुंततो. मित्रांसोबत हसण्यात, मस्करी करण्यात आणि मजा करण्यात विशेष आनंद मिळतो. ते आमचे ऐकतात आणि आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच, मित्रांसोबत सण साजरे करणे आणि आनंद वाटणे हा देखील एक चांगला अनुभव आहे. मित्रांसोबत तासनतास घालवूनही काही मिनिटेच गेली आहेत असे वाटते.

मैत्रीचे योगदान | Contribution of friendship

आपल्या सामाजिक आणि आध्यात्मिक विकासात मैत्री महत्त्वाची भूमिका बजावते. मित्रांसोबत वेळ घालवल्याने आपण आनंदी आणि समाधानी आहोत. ते आपल्याला प्रोत्साहन देतात आणि आपली स्वप्ने साकार करण्यात मदत करतात. मित्रांसोबत चांगले संबंध ठेवल्याने आपले आरोग्यही चांगले राहते, कारण आपण हसत राहून मन शांत ठेवतो.

मैत्रीमध्ये विश्वास महत्त्वाची भूमिका बजावतो, जो आपल्या मनातील भावना समजून घेतो आणि आपल्याला योग्य मार्गावर चालण्यास मदत करतो. मित्र तुम्हाला चांगले काळ साजरे करण्यात आणि वाईट काळात मदत करण्यास मदत करू शकतात. मित्र एकटेपणा आणि एकाकीपणाला प्रतिबंध करतात आणि आपल्याला आवश्यक असलेले समर्थन देखील प्रदान करतात.

एकूणच, चांगल्या मित्रांचा आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. जर तुम्ही अशा लोकांशी मैत्री केलीत जे त्यांच्या वेळेत उदार असतात, इतरांना मदत करतात किंवा महत्वाकांक्षी किंवा कौटुंबिक- असतात, तर तुम्हाला ती मूल्ये स्वतः विकसित होण्याची अधिक शक्यता असते.

खर्‍या मित्रांमध्ये तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम आत्म्यामध्ये साचेबद्ध करण्याची ताकद असते. ते तुम्हाला पाहतात आणि तुम्ही खरोखर कोण आहात यासाठी ते तुमच्यावर प्रेम करतात. ते तुम्हाला प्रोत्साहन देतात आणि तुम्हाला अधिक चांगले काम करण्यासाठी आणि तुम्ही बनू इच्छित असलेली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित करतात.

आणखी माहिती वाचा : SIP म्हणजे काय? | What is SIP in Marathi | मराठी सल्ला

Essay on true friend in Marathi | खऱ्या मित्रावरील निबंध

खऱ्या मित्रावरील निबंध | Essay on true friend in Marathi  खालीलप्रमाणे आहे –

जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्टींपैकी एक म्हणजे खरे मित्र असणे. खरा मित्र तोच असतो जो सर्व ऋतूंमध्ये आपल्यासोबत असतो, जो ऐकतो आणि पाठिंबा देतो, जो एकनिष्ठ आणि विश्वासू असतो.

तुम्ही आनंदी असाल किंवा दुःखी असाल तरीही खरा मित्र तुमच्यासाठी नेहमीच असतो. ते तुमचा आनंद सामायिक करतात आणि तुमच्या दुःखात तुमचे सांत्वन करतात. चांगली बातमी असो किंवा वाईट असो ते तुमचे ऐकण्यासाठी नेहमीच तयार असतात. ते तुमचे विचार आणि भावना समजून घेतात आणि तुम्हाला भावनिक आधार देतात.

खरा मित्र नेहमीच तुमच्याशी प्रामाणिक असतो, जरी सत्य कठीण असते. ते तुमच्याशी खोटे बोलत नाहीत किंवा तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल बोलत नाहीत. ते तुमच्याबद्दल विचार करतात आणि तुम्हाला सर्वोत्तम सल्ला देतात. खरा मित्र तुमच्यासोबत एकनिष्ठ आणि विश्वासू असतो. ते तुमच्या गोपनीयतेचे रक्षण करतात आणि नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवतात. ते तुमच्याशी प्रामाणिक आहेत आणि तुमची काळजी घेतात.

खरा मित्र बनणे ही एक मोठी जबाबदारी आहे. खरा मित्र असणे म्हणजे अशी एखादी व्यक्ती असणे जी तुमच्यासाठी नेहमीच असेल, काहीही असो. खरा मित्र असणे म्हणजे तुमचे जीवन चांगले बनवणारी व्यक्ती असणे. खऱ्या मित्रांचे अनेक फायदे आहेत. ते आपल्या जीवनात आनंद, आधार आणि प्रेरणा आणतात. ते आम्हाला चांगले लोक बनण्यास मदत करतात. जर तुमचा खरा मित्र असेल तर त्याची कदर करा. ते एक मौल्यवान भेट आहेत.

मित्रावर 10 ओळी | 10 lines on a friend in Marathi

मित्रावरील 10 ओळी खालीलप्रमाणे आहेत –

  • जीवनात यशस्वी होण्याच्या मार्गावर खरे मित्र नेहमीच आपल्या सोबत असतात, जेव्हा आपण पडतो तेव्हा ते आपल्या सोबत उभे असतात.
  • मैत्री म्हणजे एकमेकांसोबत सुख-दु:ख वाटून घेणे.
  • मित्र असा असतो जो आपल्याला जसे आहोत तसे स्वीकारतो आणि आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करत नाही.
  • खरे मित्र हे आपले मौल्यवान रत्न आहेत, जे आपले जीवन उजळ करतात.
  • जीवनात कितीही संकटे आली तरी खरा मित्र नेहमीच तुमच्यासोबत असतो.
  • मित्रासाठी शब्दांना किंमत नसते.
  • मैत्री हे असे नाते आहे जे वेळेवर किंवा अंतराने विसरता येत नाही.
  • मैत्री हा एक भ्रम आहे, जो हृदयाच्या खोलात लपलेला असतो.
  • मैत्री म्हणजे जीवनाला स्वर्ग बनवणारा गोडवा.
  • खरे मित्र नेहमी एकमेकांच्या सुखाची पर्वा न करता हसतात आणि रडतात.

फ्रेंडशिप डे कधी असतो? | When is Friendship Day?

30 जुलै 2023 रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस आहे.

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 2023 ची थीम काय आहे? | What is the theme of International Friendship Day 2023?

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 2023 ची थीम आहे, ‘मैत्रीद्वारे मानवी भावना सामायिक करणे.

मित्राचे समानार्थी शब्द काय आहेत? |  What are synonyms for friend?

मित्राचे समानार्थी शब्द म्हणजे बंधू, यार, मित्र, परोपकारी, मित्र, भागीदार, मित्र, साथीदार, साथीदार, जिव्हाळ्याचा, मदतनीस, साथीदार आणि साथीदार.

मराठीत मित्रांवर निबंध हा आमचा ब्लॉग होता. अधिक समान निबंध ब्लॉग वाचण्यासाठी Marathi Salla शी संपर्कात रहा.

  • 10 lines on a friend in Marathi
  • 200 आणि 500 ​​शब्दांमध्ये मित्रांवर निबंध
  • Contribution of friendship
  • Essay on friends in 100 words in Marathi
  • Essay on friends in 200 words in Marathi
  • Essay on friends in 500 words in Marathi
  • Essay on Friends in Marathi
  • Essay on true friend in Marathi
  • The importance of friends
  • What are synonyms for friend?
  • What is the theme of International Friendship Day 2023?
  • When is Friendship Day?
  • आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 2023 ची थीम काय आहे?
  • खऱ्या मित्रावरील निबंध
  • फ्रेंडशिप डे कधी असतो?
  • मराठीत १०० शब्दात मित्रांवर निबंध
  • मराठीत 200 शब्दांत मित्रांवर निबंध
  • मराठीत 500 शब्दांत मित्रांवर निबंध
  • मित्रांचे महत्त्व
  • मित्राचे समानार्थी शब्द काय आहेत?
  • मित्रावर 10 ओळी
  • मैत्रीचे योगदान

Be the first to comment

Leave a reply cancel reply.

Your email address will not be published.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Copyright © 2024 | WordPress Theme by MH Themes

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

my best friend essay in Marathi | माझा आवडता मित्र मराठी निबंध

' src=

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

essay on my friend farmer in marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध लागला तर आपण त्याला Essay In Marathi या page वर मिळवू शकाल. या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी एखादा टॉपिक राहीला असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

essay on my friend farmer in marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

essay on my friend farmer in marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

essay on my friend farmer in marathi

  • Tips & Guides

Shetkaryachi Atmakatha in Marathi | Essay on Farmer, Nibandh Shetkari

  • by Pratiksha More
  • Mar 19, 2024 Mar 19, 2024
  • 23 Comments

farmer essay in marathi

Shetkaryachi Atmakatha Essay in Marathi Langauge

Shetkaryache manogat : शेतकर्याची आत्मकथा.

शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी, दुष्काळ, कर्जबाजारी, अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा !हो, पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली? ह्याला कोण जबाबदार? ह्याची कारणे व उपाय ह्यांचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न केला आहे का?

शेती हा व्यवसाय पावसावर मुख्यतः हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे.भारतात साधारणपणे ६० ते ७० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे व ३० ते ४० टक्के शेती हि बागायती आहे त्यामुळे पाऊस कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम शेतीवर होतो तसेच पाऊस वेळेवर न आल्यास सुद्धा होतो. अशा वेळी शेतकऱ्याची अपेक्षा सरकार कडून अनुदान,कर्जमाफी मिळवण्याची असते व ती न मिळाल्यास तो कर्जबाजारी होतो. व मग त्यातून नैराश्य येते व मग तो भलत्याच मार्गाला जातो. मी स्वतः एक शेतकरी आहे मी पण ह्याच चक्रातुन गेलो आहे. अगदी आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत येऊन ठेपलों. एवढ्यात मला एक समाजसेवक भेटला.

त्याने माझी कहाणी मन लावून ऐकून घेतली.आणि सांगितले की, आता परिस्थिती बदलू लागली आहे.आता शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर व इतर यंत्र आली आहेत. त्यामुळे मानवी श्रम खूप कमी प्रमाणात लागतात. पाण्यासाठी सरकारने व स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात छोटे छोटे बंधारे व धरणं बांधली आहेत व बांधत आहेत. तसेच आता शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचनाचा वापर करीत आहे. तसेच पाण्याचे नियोजन ही करत आहेत म्हणजेच ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ह्या मुळे पावसावर असलेले अवलंबित्व हळू हळू कमी होत आहे. ही सर्व परिस्थिती स्वतःलाच बदलावी लागेल, ह्यातून मार्ग काढावा लागेल असे तो मला म्हणाला. मी पण मनाशी ठरवले मी रडत बसणार नाही, आत्महत्या करणार नाही.

सर्व प्रथम मी शेतीला पूरक असा जोड धंदा सुरु केला. त्या साठी मी दोन गाई व दोन म्हशी घेतल्या. त्या मुळे मला दिवसाला वीस लिटर म्हशीचे वपंधरा लिटर गाईचे दूध मिळू मिळण्यास सुरवात झाली। त्यातून मला रोज १५०० ते २००० रुपये मिळू लागले. खर्च वजा जाता ८०० ते १००० रुपये रोज नफा मिळू लागला. त्यामुळे मला शेती साठी लागणारे भांडवल उभे राहू लागले. तसेच गाईच्या, म्हशीच्या शेणापासून मला खत मिळू लागले. त्यामुळे मला येणारा रासायनिक खताचा खर्च कमी झाला व सेंद्रिय खतामुळे उत्पादनाला बाजारात भाव चांगला मिळतो. अशा प्रकारे मी माझ्या कुटुंबाच्या रोजच्या जेवण्या खाण्याची सोय केली व शेतीसाठी भांडवल ही उभे केले.

नंतर मी एक छोटा ट्रॅक्टर विकत घेतला. त्यामुळे मला शेतीसाठी लागणाऱ्या मजुरीचा खर्च बऱ्याच प्रमाणात कमी झाला. तसेच मी विहीर खणून ठिबक सिंचन ही करून घेतले. त्यामुळे मला आता वर्षातून दोन पिके घेता येऊ लागली. त्यामुळे माझी वार्षिक मिळकत दुप्पट झाली. मी मागच्या व ह्या वर्षांचा विचार केला असता माझ्या असे लक्षात आले की :

१] जोडधंद्या मुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक अडचण झाली नाही. २] जोडधंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मला शेतीसाठी लागणारे भांडवल उभे राहिले. ३] भांडवल असल्यामुळे मला यांत्रिकीकरण (विहीर खणणे,ट्रॅक्टर, ठिबक सिंचन )वैगेरे करता आले. ४] यांत्रिकीकरणा मुळे होणाऱ्या मजुरीच्या खर्चात जवळपास ५०% बचत झाली. ५] सेंद्रीय खतामुळे रासायनिक खताचा खर्च पूर्णपणे वाचला. ६] सेंद्रिय खतामुळे मला सेंद्रिय धान्य मिळाले. त्याचा भाव जवळपास दुप्पट मिळाला. ७] तसेच विहीर खणल्यामुळे व ठिबकसिंचन केल्यामुळे दोन पिके घेता आली. त्यामुळे माझे आर्थिक उत्पन्न दुप्पट झाले. व रोज लागणाऱ्या खर्चाची व भांडवलाची व्यवस्था झाली. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशाची सोय झाली.

आता मी मागील वर्षी आलेल्या अडचणींचा विचार केला असता माझ्या लक्षात आले :

१] पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार. २] शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. ३] अवकाळी पावसापासून बचाव. ४] योग्य पिकाची निवड करणे.

पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मला पुढील वर्षी योग्य पीक घ्यावे लागेल. ज्याला कमी प्रमाणात पाणी लागेल. ठिबकसिंचनामुळे ते होईल ह्याची मला खात्री आहे. शेतीमालाला योग्य तो भाव मिळवण्यासाठी पारंपरिक धान्य न घेता दुसरे काही पीक म्हणजेच फळभाजी, पालेभाजी, फुलशेती वैगेरे काही घेता येईल का ह्याचा विचार करणे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळणे. तसेच शेडनेट किंवा ग्रीन नेट किंवा पॉलीहाऊसे असे काही करता येईल का ह्याचा विचार करणे. तसेच धान्याची साठवणूक करणे. म्हणजे योग्य भाव आल्यास विकता येईल ह्याचा विचार करणे.

पहिल्यांदा ही सर्व परिस्थिती मलाच बदलावी लागेल. ह्या गोष्टी बदलण्यास सरकार व अनेक स्वयंसेवी संस्था मदत करीत आहेत. तसेच आता ह्या व्यवसायात अनेक उच्चशिक्षित तरुण सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत. सरकार सुद्धा ठिबकसिंचन, विहीर, ग्रीननेट, पॉलीहाऊसे ह्या करता ५०% सबसिडी देत आहे. बँक ४% दराने कर्ज देत आहे.

ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन योग्य ते नियोजन करून मी पुढील वर्षी आणखीन चांगल्या रीतीने शेती करून परिस्थिती बदलवून दाखवीन ह्याची मला खात्री आहे. शेवटी आपले माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री म्हणाले आहेत ‘जय जवान जय किसान’.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Composition Essay on Farmer Importance in Marathi Wikipedia

Marathi nibandh shetkari, related posts, 23 thoughts on “shetkaryachi atmakatha in marathi | essay on farmer, nibandh shetkari”.

Nice thoughts

it’s a great essay

Such a useless answer I didn’t get the right answer

you are such a useless person

Thnku so much………

Nice for school essays.

I didn’t get the right answer and this is useless for me

Just useless answer

I didn’t get the right answer And this is useless

Very nice for school students

it is really good for students

It is really good for students

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

essay on my friend farmer in marathi

Shetkari Nibandh in Marathi | Essay on Farmer in Marathi | शेतकरी निबंध

शेतकरी निबंध Shetkari Nibandh in Marathi Essay on Farmer in Marathi -शेतकरी हा भारतामधील सर्वात अभागी जीव आहे. शेतकरी भारतातील सर्वांना अन्न पुरवठा करतो मात्र तो स्वतः कुपोषित आहे.  ऊन, वारा, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न करता काबाडकष्ट करून, मेहनत करून तो आपल्या पोटासाठी पैसा मिळवतो. परंतु आजपर्यत तो पैसा त्यास श्रीमंत करून शकला नाही किंवा शेतकऱ्यांची चिंता मिटवू शकला नाही. चला तर मग आज आपण शेतकरी निबंध पाहू या.

Contents hide 1 Shetkari Nibandh in Marathi 2 Essay on Farmer in Marathi 3 शेतकरी निबंध Shetkari Nibandh in Marathi

शेतकरी स्वतः कापूस पिकवतो, मात्र त्याच्या अंगावर कपडे नसतात. लाखो रुपयांच्या शेतीचा तो मालक असतो. परंतु खिशात त्याच्या दमडीही नसते.  लाखो रुपयांची स्थावर मालमत्ता असलेल्या शेतकऱ्याकडे कर्ज घेण्यावाचून पर्याय नसतो. जमीन विकला जात नाही कारण ती मुलांसाठी लागते. कसेही उसने पासने करून तो त्याचा उदरनिर्वाह करतो.

कारण दरवर्षी पीक चांगले येईलच असे नाही .उत्पादन होईलच असे नाही, आणि शेती मालास भाव मिळेल असेही नाही,   त्यामुळे भाव ठरवण्याचा अधिकार जर शेतकऱ्याला मिळाला तर शेतकऱ्यांची परिस्थिती ही वाईटाकडून चांगली होईल.

आमच्या अद्भुत माराठी ब्लॉगला पण भेट द्या

भारतातील शेतकरी फक्त शेती पिढ्यानपिढ्या पिकवत आहे त्या पिकवण्याचा मोबदला शेतकऱ्यास अजून पर्यंत मिळालेला नाही कारण शेतमालाचे भाव शेतकऱ्यांच्या मनासारखे कधीच नसतात.

सर्व वस्तूंचे भाव वाढतील परंतु शेतकऱ्याच्या मालाचे भाव कधीच वाढत नाही आणि त्यामुळे पिढ्यानपिढ्या शेतकरी हा दरिद्री राहतो ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर व्यापारी मात्र श्रीमंत होत असतो कोणताही घाम न गाळता व्यापारी कापड कष्ट न करता शेतकऱ्यांच्या जीवावर भरमसाठ पैसे कमावतात शेतकऱ्यांचा छळ करतात बियाणे कंपन्या कीटकनाशके किंवा खाते हे बोगस देतात आणि त्यामुळे उत्पादन हे कमी होते भावात असलेली चढ-उतार शेतकऱ्यांचा जीव खालीवर करते

शेतकऱ्यांकडून मातीमोल किमतीने धान्य कापूस सोयाबीन ऊस केली घेतल्या जाते. त्यातच आता वनसंरक्षण कायदा हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे कारण निघायचे कळप डुकरांचे कळप हरिणांच्या कळपावर शेतामध्ये घेऊन हजारो हेक्टर पीक फस्त करत असतात परंतु कोणीही त्याची तक्रार न करता निमुटपणे ते सहन करत राहतो.

त्यात अनियमितपणे बरसणारा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकाचे फार मोठे नुकसान करतो अतिवृष्टी आहे अवकाळी पाऊस आहे वादळ वाऱ्यासह गारपीट आहे पूर आहे पिकांवर येणारी कीड आहे विविध रोग आहेत इत्यादी कारणांमुळे पिकांचे फार मोठे उत्पन्न घटते आणि एक प्रकारे निसर्ग हा शेतकऱ्यांची परीक्षा पाहतो.

Essay on Farmer in Marathi

शेतकरी या सर्व अडचणींवर मात करून आपला आयुष्य जगत असतो अन्नाची गरज भागवत असतो आणि कष्टाने आपलं जीवन फुलवत असतो.

भारत हा खेड्यात आहे असे म्हटले जाते कारण ग्रामीण जीवन हे शेतकऱ्यांविना अपुरे आहे. त्यांच्या शिवाय ग्रामीण जीवन असू शकत नाही कारण या ग्रामीण भागातूनच मोठे कलेक्टर डॉक्टर वकील इंजिनिअर चांगले राजकारणी निर्माण झालेले आहेत यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी वर्गांचे मुल आहेत.

परंतु आपल्या भारतामध्ये सावकार वकील असतील कारकून असतील असे सर्वांकडून शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो म्हणूनच आज शेतकरीवर्गाला शिक्षणाची गरज आहे या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा उपाय आहे अशाप्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुचवला आहे.

लालबहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला आणि शेतकऱ्यांचा एक प्रकारे गौरवच केला महात्मा गांधीजींनी ही स्वातंत्र्यापूर्वीच समर्थ होतील ‘खेड्याकडे चला’ कारण खरा भारत हा खेड्यातच आहे. शेतकरी हा आता पूर्वीसारखा आला आला नाही चांगली बी-बियाणे खते वापरून बऱ्यापैकी उत्पन्न काढू शकला आहे.

शेतकरी निबंध

अशा शेतकऱ्यांच्या घरात आणि शेतीमध्ये विजा हे सौर पंपा आहेत त्यामुळे शेतकऱ्याला पाहिजे तसे उत्पन्न काढता येऊ शकते परंतु शेतकरी मित्रांनी सुद्धा नवीन आधुनिक साधनांचा वापर करून आपल्या शेतातील उत्पन्न वाढवले पाहिजे तरच ची शेतकऱ्यांकडे बघण्याची नजर आहे ती बदलेल शेतकर्‍यांकडे हि पैसे असतील त्यामुळे त्यांना सुद्धा मानपान मिळेल

शेतकरी आज जगाचा पोशिंदा म्हटल्या जाते शेतकऱ्यांमध्ये साक्षरता ही 25 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे उलेले 75 टक्के शेतकरी अजूनही अशिक्षित आहेत अंधश्रद्धाळू आहेत त्यामुळे यावर मात करणे शेतकऱ्यांना खूप आवश्यक आहे

जास्त शेती असणारे शेतकरी श्रीमंत आहेत परंतु कमी शेती असणारे शेतकरी अजूनही गरीबच आहेत. त्यांच्याकडून कवडीमोलाने माळ घेतला जातो, आणि शहरांमध्ये सोन्याच्या भावाने हे व्यापारी शेतकऱ्यांचा माल विकतात आणि त्या मालावरच ते स्वतः गर्भश्रीमंत होतात आणि त्यामुळेच शेतकरी शहराकडे वळतो आहे.

काबाड कष्ट करून, मेहनत करून आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या शेतकर्‍यास माझा मानाचा मुजरा! तुम्हाला विविध योजनांबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या शेतकरी या ब्लोग ला नक्की भेट द्या

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी । Nature Is My Friend Essay Marathi

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी । Nature Is My Friend Essay Marathi

प्रस्तावना :

आपण सकाळ पासून ते रात्री झोपे पर्यंत ज्या वातावरणात, पर्यावरणामध्ये वावरतो तो निसर्ग असतो. म्हणून आपल्याला या दैनंदिन निसर्गाला आपण मित्र मानायला पाहिजे म्हणून आज आपण निसर्ग माझा मित्र निबंध मराठी

निसर्ग ही सर्वात सुंदर देणगी देवाने आपल्याला दिलेली आहे आणि परमेश्वराने या निसर्गाला अतिशय सुंदर बनवले आहे. संपूर्ण सृष्टीवर पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर सजीव आणि मनुष्य- वस्ती स्थित आहे.

आणि या पृथ्वीवर जीवन स्थिर असण्याचे एकमेव कारण म्हणजे इथे असणारे वातावरण आणि निसर्ग. आणि या निसर्गातून मनुष्याला जीवनावश्यक गोष्टी मिळतात. म्हणून निसर्ग आणि मनुष्य या दोघांचा खूप जुना संबंध आहे.

Table of Contents

निसर्गा शिवाय आणि निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूं शिवाय मनुष्य आपले जीवन जगूच शकत नाही. निसर्ग हा मनुष्याला सर्व काही देतो पण त्या बदल्यात मनुष्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही.

आज आपण याच निसर्गावर निबंध बघणार आहोत तो म्हणजे निसर्ग माझा मित्र.

निसर्ग कशाला म्हणतात :

आपल्या आजू- बाजूला असणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे पाणी, हवा, जमीन, आकाश आणि अग्नी या पंच तत्वांनी मिळून बनलेली सृष्टी म्हणजेच ” निसर्ग ” होय. मनुष्याचा जन्म होतो तो या निसर्गातच आणि मृत्यू ही याच निसर्गात होतो.

आपण सर्व सजीव या निसर्गात जन्म घेतो, वाढतो, मोठे होतो आणि शेवटी याच निसर्गात विलीन ही होतो. आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा निसर्गातूनच होतो.

निसर्गातून आपल्याला जीवनावश्यक वस्तू तर मिळतातच पण आर्थिक मदत सुद्धा होते. आपण रोजच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या रीतीने निसर्गाशी संबंध ठेवत असतो.

निसर्गातून मिळणाऱ्या वस्तू :

निसर्ग आपल्याला सर्व गोष्टी पुरवते. आपल्या मूलभूत गरजा सुद्धा निसर्गातूनच पूर्ण होतात. अन्न, वस्त्र, निवारा आणि प्राणवायू म्हणजे हवा सुद्धा निसर्गातून आपल्याला मिळतात. फुले, फळे, भाज्या सर्व काही निसर्ग आपल्याला देतो.

आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे निसर्ग आहे. अनेक प्रसिद्ध कवी, लेखक, चित्रकार आणि कलाकार यांना निसर्गा बद्दल अनेक सुंदर रचना केल्यात अनेक चित्रपट व सिनेमातील गाणे यांमध्ये निसर्गाचे सुंदर चित्रण केल्याचे दिसते.

जंगल, पर्वत, नद्या. झाडे- झुडपे, सूर्य, चंद्र, समुद्र या सर्व गोष्टींचा मिळून निसर्ग तयार होतो. या निसर्गात लाखो सजीव निर्जीव वस्तुंचा समावेश आहे.

निसर्ग आपल्याला खाण्यासाठी अन्न, पिण्यासाठी पाणी, राहण्यासाठी निवारा म्हणजेच लाकूड देतो. निसर्गा शिवाय मनुष्य आपल्या जीवनाची सुरुवातच करू शकत नाही.

कारण मनुष्याला जे काही मिळते ती या निसर्गाचीच देण आहे. आपल्या सकाळी उठल्या पासून रात्री झोपे पर्यंतच्या वापरल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये निसर्ग चे तत्व बसलेला असतो. म्हणून निसर्ग हा आपला एक खरा मित्र आहे.

खरे, पहाता निसर्ग हा आपला खरा मित्र आहे. निसर्ग ही सर्वात मोठी शक्ती आहे. या विश्वातील सर्व काही आपल्याला निसर्ग पासूनच प्राप्त होते. निसर्गामध्ये अशी शक्ती आहे जी आपल्यातील नकारात्मक विचारांना दूर करते.

आणि याच निसर्गात अशा काही वस्तू आहेत या आपल्या विचारांना चालना देतात. निसर्गातील नजारा आपण मानसिक ताणतणाव दूर होतो. म्हणून आपल्याला कधी ही तणाव आला असल्यास आपण या निसर्गामध्ये मन मोकळे होऊन फिरले पाहिजे. निसर्गातील गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे. विविध प्रकारची फुले, प्राणी, पक्षी यांना पाहिले तर मनाला शांती आणि आराम मिळतो.

या निसर्गाने तयार केलेले ऋतुचक्र आणि यांनुसार होणारे सृष्टीतील बदल मनाला मोहवणारे आहेत. निसर्गाने आपल्या सुंदर, हिरवळ दिली आहे. डोळ्यांना भुलिवणारे रंग निसर्गातूनच मिळतात.

जगण्यासाठी आवश्‍यक असणारा प्राणवायू याच निसर्गातील झाडांपासून मिळाला आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू निसर्गाचे सुंदर देण आहे. मनुष्य, पक्षी, प्राणी सर्व सजीवांना आवडणारा पाऊस हा या निसर्गामुळे आपल्याला लाभला आहे. म्हणून निसर्ग हा फक्त मनुष्याचाचं नव्हे तर संपूर्ण सृष्टी चा मित्र आहे.

मनुष्याला सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणण्या मागेचे कारण निसर्गच आहे. कारण मनुष्याने याच निसर्गातील वस्तूंचा वापर करून प्रगती केली. याच निसर्गातील दगडांचा वापर करून अग्नीचा शोध लावला व विविध हत्यारे, अवजारे बनवले. असेच प्रगती करत आज मानवाचे स्वतःच्या गरजेच्या सर्व गोष्टींचा शोध लावला आहे. म्हणून निसर्ग हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे.

मानव आणि निसर्गाचा नातं :

मानवाचा आणि निसर्गाचं नातं हे हजारो वर्षापासूनच आहे. म्हणून मानवाच आणि निसर्गाचा नातं खूप जुना समजलं जातं. सुरुवातीला मनुष्याला कशाचे ज्ञान नाही होते. पण तो या निसर्गातील गोष्टींचा उपयोग करून प्रगती करू लागला.

आज मनुष्य मोठ- मोठ्या इमारती बांधत आहे. कपडे घालत आहे. मानवाला नव- नवीन प्रकारच्या आजारांचे निधन करणार्‍या रोगांवर औषध मिळाले आहेत. त्यामुळे तो निरोगी झाला आणि माणसाचे आयुष्य वाढू लागले.

आज लोकसंख्या अफाट वाढू लागली म्हणून नवीन समाज निर्माण होऊ लागला. भाषेची आणि लिपी ची गरज भासू लागली तसेच संस्कृती आणि नव- नवीन परंपरा निर्माण झाल्या. माणसाच्या या प्रगतीमध्ये पावलो- पावली निसर्ग मानवाच्या सोबत होता.

माणसाच्या विकासासाठी विविध प्रकारची सामग्री निसर्गाने दिली. त्यानंतर हळू- हळू प्रगती होत गेली. विजेचा शोध लावला, रस्ते बांधले, समुद्री मार्गाने प्रवास चालू झाला. आणि ही सगळी कल्पना आणि प्रेरणा मनुष्याला निसर्गाकडून प्राप्त झाली.

निसर्गातील झाडांचे महत्त्व :

निसर्गाने आपल्याला अनेक गोष्टी दिल्यात त्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आणि निसर्गाची देणगी म्हणजे झाडे आहेत. झाडांमुळे आपल्याला वेग वेगळ्या वस्तू मिळाल्या त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनावश्यक असलेला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात त्यामुळे निसर्गाचा समतोल राहतो.

तसेच झाडे आपल्याला फळ, फुले देतात. आणि काही झाडांपासून औषधे मिळतात त्यामुळे आपले स्वास्थ्य निरोगी राहते.

झाडांचा उपयोग आपण आपल्या रोजच्या जीवनात करतो. ग्रामीण भागातील लोक झाडांचा लाकडाचा उपयोग इंधन म्हणून करतात.

तसेच झाडांचा लाकडापासून दरवाजे, खिडकी आणि विविध प्रकारच्या लाकडी खेळणी तयार करतात. म्हणून निसर्गातील झाडे आपल्याला खूप महत्त्वाची आहेत. तसेच काही झाडांपासून सुगंधी वस्तू तयार करतात. कागद, रबर यांसारख्या वस्तू झाडांपासून मिळतात.

झाडांमुळे आपल्याला आर्थिक मदत ही होते. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात झाडांना खूप महत्त्व आहे. निसर्गातील झाडे ही अनमोल आहेत. परंतु आजचा मनुष्य आपली सुख सुविधा पूर्ण करण्यासाठी व स्वतःच्या स्वार्था साठी झाडांची तोड करीत आहे. पण माणसाचे असे वागणे निसर्गासाठी व संपूर्ण सृष्टीसाठी धोक्याचे ठरत आहे.

निसर्गाचा ऱ्हास :

निसर्गाने आपल्याला सर्व काही सुख सुविधा दिल्या पण माणूस आणखी, हवा त्यापोटी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी या सुंदर निसर्गाचा आपला सुख- सुविधा पूर्ण करण्यासाठी ऱ्हास करत आहे.

आज वाढते उद्योगधंदे, औद्योगिकरण यांच्या साठी जंगलतोड करून मोठ- मोठ्या इमारती बांधत आहे. त्यामुळे निसर्गातील महत्त्वपूर्ण झाडे नष्ट होत आहेत. त्यामुळे पर्यावरणातील co2 गॅसचे प्रमाण वाढून प्रदूषण वाढत आहे.

व याचा दृष्ट परिणाम म्हणजे वाढते तापमान त्याला आपण ग्लोबल वार्मिंग म्हणतो. वाढत्या ग्लोबल वार्मिंग मुळे व प्रदूषणामुळे, वृक्षतोडी मुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. निसर्गातील हिरवळ व मनाला भुलवणारा निसर्ग. डोंगर वाळून जात आहे. नद्या, तलाव कोरडवाहू होत आहे.

आजच्या मनुष्याचे निसर्गाचा ऱ्हास करून निसर्गाचे जीवन चक्र बदलून टाकले आहे.

या सृष्टी वर राहणाऱ्या सर्व सजीवांची आज निसर्ग जपणे ही महत्त्वाची गरज आहे. या निसर्गामुळे आपला जन्म झाला, आपल्या सर्व गरजा पूर्ण झाल्या आणि आज आपण याच निसर्गामुळे प्रगती केलो. पण आपण निसर्गाने दिलेल्या सर्व गोष्टी विसरलो आणि आज याच निसर्गाचा विनाश करण्याच्या मार्गावर आहोत.

जर आपण निसर्गाचा विनाश असंच करत राहिलो तर निसर्ग सुद्धा आपला विनाश नक्कीच करेल. आपण सर्वांनी मिळून निसर्गाचे संगोपन केले पाहिजे.

आणि आपला निसर्ग कसा सुंदर राहील याचा विचार केला पाहिजे. निसर्ग आपला मित्र आहे. म्हणून त्यांचे संगोपन करणे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे.

निसर्ग आपला मित्र आहे ! हे मात्र विसरू नका.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • महिला सशक्तिकरण निबंध मराठी 
  • जल प्रदूषण वर निबंध मराठी
  • उन्हाळी सुट्टी मराठी निबंध
  • साथीचे रोग यावर माहिती
  • भ्रष्टाचार वर मराठी निबंध

धन्यवाद मित्रांनो !

IMAGES

  1. शेतकरी निबंध 10 ओळी

    essay on my friend farmer in marathi

  2. {Best} शेतकरी जगाचा पोशिंदा मराठी निबंध

    essay on my friend farmer in marathi

  3. "शेतकरी जगाचा पोशिंदा" मराठी निबंध

    essay on my friend farmer in marathi

  4. Marathi Essay on Autobiography of Farmer, Autobiography of Farmer

    essay on my friend farmer in marathi

  5. भारतीय शेतकरी वर मराठी निबंध Essay On Indian Farmer In Marathi » मराठी मोल

    essay on my friend farmer in marathi

  6. एका शेतकऱ्याचे आत्मचरित्र वर मराठी निबंध Essay On Autobiography Of A

    essay on my friend farmer in marathi

VIDEO

  1. Farmer's friend poem

  2. शेतकरी निबंध मराठी / Shetkari nibandh marathi / farmar essay in marathi

  3. ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತ

  4. गाय 10 ओळी खूप सोपा मराठी निबंध

  5. माझे कुटुंब मराठी निबंध

  6. शेतकरी मराठी निबंध

COMMENTS

  1. माझा मित्र वर मराठी निबंध Essay On My Friend In Marathi

    Essay On My Friend In Marathi माझा सर्वात चांगला मित्र हा माझ्या आयुष्यातील आनंद, सांत्वन आणि सामायिक अनुभवांचा स्रोत आहे. या निबंधात आमची मैत्री, आमची जोडणी,

  2. शेतकरी मराठी निबंध

    तर मित्रांनो हे होते shetkari marathi nibandh. आपल्या देशात shetkari jagacha poshinda म्हणून ओळखला जातो. आशा करतो की हा Farmer essay in marathi तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ह्या ...

  3. भारतीय शेतकरी निबंध मराठी

    Set 5: एक भारतीय शेतकरी निबंध मराठी - Shetkari Nibandh in Marathi - Farmer Essay in Marathi. शेतकऱ्याला अन्नदाता असे म्हणतात. शेतकरी शेतात काम करतो. तो खेड्यात, लहान ...

  4. माझा मित्र निबंध मराठी

    माझा मित्र निबंध मराठी Set 1 - My Best Friend Essay in Marathi Set 1. माझा मित्र निबंध मराठी Set 2 - My Best Friend Essay in Marathi Set 2. माझा आवडता मित्र Set 3 - My Friend Essay in Marathi Set 3. माझा आवडता ...

  5. मैत्री वर निबंध मराठी Essay on Friendship in Marathi

    Essay on Friendship in Marathi - My Best Friend Essay in Marathi मैत्री वर निबंध मराठी विश्वासाचं प्रेमाचं एक निखळ नातं म्हणजे मैत्री. मैत्री हे एक असं नातं

  6. शेतकरी वर निबंध

    Farmer essay in Marathi मध्ये बघूया सेटकरी वर निबंध. Farmer essay in Marathi-शेती हा केवळ व्यवसाय नसून जमिनीशी जोडल गेलेलं एक अतूट नात आहे.

  7. माझा मित्र निबंध मराठी

    वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा चालेल. माझा मित्र निबंध मराठी / Maza mitra nibandh marathi. मित्र निबंध मराठी / mitra nibandh marathi. मित्रा वर मराठी निबंध / essay on ...

  8. My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend

    Shetkaryachi Atmakatha in Marathi | Essay on Farmer, Nibandh Shetkari. My School Essay in Marathi | माझी शाळा Mazi, Majhi Shala Nibandh. ... Aai Sampavar Geli Tar, Essay on Mother for Class 6, 7, 8th Nibandh. 7 thoughts on "My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend" ...

  9. माझा आवडता मित्र मराठी निबंध My Best Friend Essay In Marathi

    नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण माझा आवडता मित्र मराठी निबंध वर चर्चा करणार आहोत. My Best Friend Essay In Marathi मध्ये आपण हा निबंध १००, २००, ३०० ४००,

  10. Essay on Friends in Marathi

    Essay on friends in 100 words in Marathi | मराठीत १०० शब्दात मित्रांवर निबंध. मित्र हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे भाग आहेत. ते आपल्यासोबत सुख-दु:ख शेअर ...

  11. my best friend essay in Marathi

    इंग्रजीत एक म्हण आहे - "A friend in need is a friend indeed.". गरजेच्या, संकटाच्या वेळी जो कामी येतो तोच खरा मित्र. मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात तो ...

  12. शेती वर मराठी निबंध Agriculture Essay In Marathi

    शेती वर मराठी निबंध Agriculture Essay In Marathi. March 10, 2024 by Marathi Mol. Agriculture Essay In Marathi शेती हा एक मोठा विषय आहे. यात पिके, पशुपालन, माती विज्ञान, फलोत्पादन ...

  13. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  14. भारतीय शेतकरी वर मराठी निबंध Essay On Indian Farmer In Marathi

    भारतीय शेतकरी वर मराठी निबंध Essay On Indian Farmer In Marathi ( २०० शब्दांत ) कोणीतरी अगदी बरोबरच म्हटले आहे, "भारत ही खेड्यांची भूमी आहे आणि शेतकरी हा ...

  15. My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध

    My Best Friend Essay in Marathi Language माझा चांगला मित्र निबंध 100 शब्दांत. इंग्रजीत एक म्हण आहे - "A friend in need is a friend indeed.". खरोखर चांगला मित्र हा असा आहे जो इच्छित ...

  16. शेतकऱ्याची संपूर्ण माहिती Information about farmer in Marathi

    तर मित्रांनो वरील लेखात आपण farmer information in Marathi पाहिले. या लेखात आम्ही farmer बद्दल सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

  17. शेतकरी वर निबंध

    विद्यार्थी आणि मुलांसाठी शेतकरी वर निबंध farmer essay in marathi: शेतकरी हा आपल्या समाजाचा आधार आहे. आपण जे खातो त्या सर्व गोष्टी त्या त्या देतात. याचा परिणाम

  18. Shetkaryachi Atmakatha in Marathi

    Shetkaryachi Atmakatha in Marathi | Essay on Farmer, Nibandh Shetkari. by Pratiksha More; Mar 19, 2024 Mar 19, 2024; 23 Comments; ... My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend. My School Essay in Marathi | माझी शाळा Mazi, Majhi Shala Nibandh.

  19. Shetkari Nibandh in Marathi

    February 25, 2024 by marathischool. शेतकरी निबंध Shetkari Nibandh in Marathi Essay on Farmer in Marathi -शेतकरी हा भारतामधील सर्वात अभागी जीव आहे. शेतकरी भारतातील सर्वांना अन्न पुरवठा ...

  20. Nature Is My Friend Essay Marathi

    निसर्ग माझा मित्र निबंध मराठी । Nature Is My Friend Essay Marathi. निसर्ग कशाला म्हणतात : निसर्गातून मिळणाऱ्या वस्तू : मानव आणि निसर्गाचा नातं ...

  21. भारतीय शेतकरी वर मराठी निबंध Essay On Indian Farmer In Marathi

    भारतीय शेतकरी वर मराठी निबंध Essay On Indian Farmer In Marathi { ४०० शब्दांत } भारतीय शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्याला दिवसभर आपल्या शेतात ...

  22. Free Essays on Essay About Farmer In Marathi through

    Free Essays on Essay About Farmer In Marathi. Get help with your writing. 1 through 30. We've Got Lots of Free Essays ... Marathi Essay On Nature My Friend ... 12 Pages; My School Essay In Marathi The veg vs non-veg health debate April 13, 2009 | The perpetual debate that is waged about the inadequacies of a vegetarian diet versus the hazards ...