ध्वनि प्रदूषण वर निबंध | Sound pollution essay in marathi
Sound pollution essay in marathi ध्वनी प्रदुषण वर निबंध : आजच्या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, दररोज काही न काही नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सहज आणि सोपे जरी केले असले तरी पण काही समस्या देखील निर्माण केल्या आहेत. यातील ध्वनी प्रदुषण ही सध्या सर्वात गंभीर समस्या आहे.
आजच्या या पोस्टमध्ये ध्वनी प्रदुषण वर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. या निबंधातून ध्वनी प्रदुषण कसे होते, त्याची कारणे, ध्वनी प्रदूषणाचे मनुष्यावर होणारे परिणाम व तसेच ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी उपाय या विषयावर सविस्तर माहिती दिलेली आहे. हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल!
Table of Contents
ध्वनि प्रदूषण वर निबंध १०० शब्दात | Sound pollution essay in marathi in 100 words
तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन खूप सोयीचे झाले आहे. आज काही क्षणात दूर असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करणे, बोलणे संभव आहे. तसेच मोबाईलच्या माध्यमातून अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. दुचाकी वाहने, चारचाकी वाहने यामुळे वाहतूक सोयीची झाली आहे. परंतु या सर्वातून माणसांचे जीवन जगणे जरी सोपे झाले असले तरी यातून हवा प्रदूषण, ध्वनी प्रदुषण, जल प्रदूषण यासारख्या अनेक समस्या देखील निर्माण झाल्या आहेत.
ध्वनी प्रदुषण हे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे सर्वात घातक प्रदूषण आहे. यातूनच अगदी कमी वयापासूनच श्रवणाच्या समस्या जाणवत आहेत. यापासून बहिरेपणा येणे, मानसिक स्थिती बिघडणे, चिडचिड होणे यासारखे आजार जडत आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदुषण नियंत्रणात असणे खूप गरजेचे आहे.
ध्वनि प्रदूषण वर निबंध २०० शब्दात | Sound pollution essay in marathi in 200 words
भारत हा देशात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. भारताची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. वाढत्या प्रवाहात लोकांमध्ये तीव्रता वाढली आहे. सहज ऐकू न येणे आणि बहिरेपणा हे प्रदूषनाचे परिणाम दिसून येत आहेत.
- प्रदुषण एक समस्या मराठी निबंध
उच्च तीव्रतेच्या आवाजाने बहिरेपणा हा कायम स्वरूपी देखील होऊ शकतो. लग्नकार्यात, जयंत्या साजऱ्या करताना, गणेश उत्सव साजरा करताना मोठ्या आवाजाचा डीजे लावलेला जातो, कर्कश आवाज करणारा बँड देखील असतो. त्यामुळे वातावरण अगदी सुन्न होऊन जातं. इतक्या उच्च तीव्रतेच्या आवाजाने कानाचे पडदे फाटण्याची देखील वेळ येऊ शकते.
ध्वनि प्रदूषण वर निबंध ३०० शब्दात | Sound pollution essay in marathi in 300 words
ध्वनी हा हवेद्वारे प्रवेश करतो त्याची गुणवत्ता वातावरणात केली जाते. हळू आणि मृदू आवाज कानाला ऐकायला बरा वाटतो. पण हाच आवाज जर कर्कश असेल तर तो नकोसा वाटतो, त्यापासून त्रास होतो. त्यामुळेच पर्यावरणातील उच्च तीव्रतेच्या कर्कश आवाजाने आज ध्वनी प्रदुषण सारखी समस्या निर्माण झाली आहे.
उच्च आवाजाच्या तीव्रतेमुळे मनुष्याच्या श्रवण यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो. ध्वनी प्रदूषण, शहरी आवाज, वाहनांचा आवाज, उच्च तीव्रतेच्या गाण्याचा गोंगाट, कारखान्यातून निर्माण होणारा आवाज यापासून होते. मोबाईल आणि दूरध्वनी यामुळे आज आपण निसर्गाचा शांत आवाज विसरत आहोत. ध्वनी प्रदूषण हे अदृश्य आहे ते दिसत नाही.पण त्यापासून होणारे विपरीत परिणाम मात्र नक्कीच जाणवतात.
ध्वनी प्रदूषणामुळे आजारी व्यक्तींना जगणे नकोसे होते. त्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक अवस्था बिघडते. भूकंप, त्सुनामी, सोसाट्याच्या वारा, विजेचा आवाज, ढगांची गडगड यासारखे प्रदूषणाचे काही नैसर्गिक कारणे देखील आहेत. ती पर्यावरणाचे मोठे नुकसान करतात.
आपण ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी काही नियम पाळायला हवेत. जसे की बोलत असताना हळू आवाजात बोलावे, गाणे ऐकत असताना आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, आवश्यक असेल तरच वाहनांचा वापर करावा, इत्यादी.
ध्वनि प्रदूषण वर निबंध ५०० शब्दात | Sound pollution essay in marathi in 500 words
ध्वनी प्रदूषण हे निसर्गाला हानी पोहोचवणारे दुसरे सर्वात घातक प्रदूषण आहे. वेगवेगळ्या संख्येच्या शोधातून व तसेच विविध संशोधनातून असे दिसून आले आहे की अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही ध्वनी प्रदूषणाची बळी पडत आहेत. यापासून निर्माण होणारे दुष्परिणाम मानवी आरोग्यासाठी खूप घातक आहेत.
याची लवकर दक्षता घेतली गेली नाही तर याचे संपूर्ण सजीव सृष्टीवर भयानक परिणाम भविष्यात दिसून येऊ शकतात. त्यामुळे सध्या ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना करायला हव्यात. सरकारने यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी विविध मोहीम राबवून जनजागृती करायला हवी तसेच ध्वनी प्रदूषणाची विरोधात काही नियम आणि कायदे बनवून त्याची अंमलबजावणी करण्यात यायला हवी.
सरकार ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे पण नागरिकांनी देखील त्यांना सहकार्य करणे तेवढेच गरजेचे आहे. मोबाईलचा वापर शक्यतो कमी करावा. मोबाईलवर गाणी ऐकत असताना गाण्याचा आवाज कमी असावा जेणेकरून आपल्या कानाला कोणतीही हानी होऊ नये. ध्वनी प्रदूषण आपल्या आरोग्यासाठी खूप हानीकारक आहे.
वृद्ध माणसासाठी आणि गरोदर महिलांसाठी हे प्रदूषण अत्यंत घातक आहे. या कर्कश आवाजाने गर्भवती स्त्रियांनी खूप त्रास होतो तसेच वृध्द व्यक्तींना देखील यापासून हार्ट अटॅक चा धोका आहे कारण उच्च तीव्रतेच्या आवाजाने काळजाचे ठोके वाढतात. कार्यक्रमांमध्ये विविध पक्ष आयोजित करणे उपयुक्त ठरेल. गडगडणारे ढग, विजेचा आवाज, जोराचा वारा या नैसर्गिक क्रियातून देखील ध्वनी प्रदुषण होते. भूकंप, चक्री वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून ध्वनी प्रदूषणावर जास्त परिणाम होतो.
निसर्गाने आपल्याला स्वच्छ आणि निरोगी वातावरण दिले आहे. आपण या पर्यावरणात राहतो व हे पर्यावरण एका विशिष्ट आवरणाने आच्छादलेले आहे त्यात आपण सुरक्षित राहतो. पर्यावरण हे आपले जीवन आहे. पण मानवी कृतीमुळे आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे. भविष्यात मानवी जीवन निरोगी ठेवायचे असेल तर आता ध्वनी प्रदुषण सारख्या समस्या कमी कराव्या लागतील.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
ध्वनी प्रदूषण मराठी निबंध । Dhwani Pradushan Marathi Nibandh
आपल्या आसपास पर्यावरणा मध्ये अनेक प्रकारचे प्रदूषण बघायला मिळते जसे की, जल प्रदूषण, भूमी प्रदूषण, वायु प्रदूषण आणि या प्रदुषणांचा आपल्या जीवनावर अत्यंत घातक परिणाम होतो.
Table of Contents
अलीकडच्या काळात तर प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढले आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा वाढत जात आहेत.
म्हणून आपण आजच्या निबंधा मध्ये ध्वनी प्रदूषण हा निबंध मराठी भाषेत बनणार आहोत.
Sound Pollution Essay in Marathi
ध्वनी प्रदूषण म्हणजे काय :.
गरजेपेक्षा जास्त व कर्कश अवास्तव प्रमाणापेक्षा जास्त मोठा आवाज, जो माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतो आणि दैनंदिन जीवनात अडथळा आणतो त्या आवाजाला ” ध्वनि प्रदूषण ” असे म्हणतात.
आपल्या अवती- भवती रोज किती तरी प्रकारचा आवाज होत असतो. भारत हा अफाट लोकसंख्याचा देश आहे. इथे अनेक उद्योगधंदे, औद्योगीकरण मोठ मोठ्या प्रमाणात चालत असते
त्या कामासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची पुरवठा करण्यासाठी मोठ्या वाहनांची आवश्यकता असते व याच वाहनांच्या हॉर्ना पासून त्या आवाजा पासून ध्वनि प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.
जेव्हा दोन व्यक्ती संवाद साधत असतात तेव्हा त्यांच्या बोलण्याचा आवाज हा ३० ते ४० डेसिबल येवढा असतो आणि त्यापेक्षा जास्त आवाज झाल्यास त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
विविध संस्थांच्या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, सरासरी लोकसंख्येच्या एकूण अर्धा पेक्षा जास्त लोकसंख्या ही ध्वनी प्रदूषणाची बळी आहे.
आपले कान ३० ते ४० डेसिबल येवढा आवाज सहन करण्याची ताकद ठेवतो आणि याच मर्यादितील आवाज आपल्या मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो परंतु ८० डेसिबल येवढा आवाज आपण सतत आठ तासांसाठी ऐकला तर आपल्याला बहिरेपणा येण्याची शक्यता असते. यावरून आपल्याला कळते की हे ध्वनि प्रदूषण आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
ध्वनी प्रदूषणाची कारणे :
आपल्या दैनंदिन जीवनात आपण किती तरी विविध प्रकारचा आवाज ऐकतो काही आवाज आपल्याला ऐकाव असे वाटते परंतु काही आवाज एवढे कर्कश असतात की, ते आवाज ऐकु येताच आपण कानावर हात ठेवतो आणि हेच आवाज ध्वनी प्रदूषणासाठी कारणीभूत ठरतात.
आपल्या आसपासच्या जीवनात लाखो वाहने आपण बघत असतो वाहनातून निघणारा धूर पासून वायु प्रदूषण होतेच पण वाहनांच्या हॉर्न च्या आवाज यामुळे ध्वनी प्रदूषणाचे संकट वाढत आहे.
एक निदर्शना मधून असे लक्षात आले की कर्णकर्कश हॉर्न चे डेसिबल मध्ये मोजमापन केला असता त्याची पातळी १००- २०० डेसिबल एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे.
यामुळे वाहने ही ध्वनी प्रदूषणा साठी प्रमुख कारण बनत जात आहेत व या कर्कश ध्वनिचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत आहे.
ध्वनी प्रदूषणाचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे दिवाळी मध्ये फोडल्या जाणाऱ्या फटाकड्या. फटाक्यांमुळे ध्वनि- प्रदूषण व वायू प्रदूषण या दोन्ही प्रकारचे प्रदूषण होत असल्याचे दिसते. या फटाक्यांचा ध्वनि हा १४० ते १६० डेसिबल एवढ्या मोठ्या प्रमाणात ध्वनी निर्माण होतो आणि हा ध्वनी हानिकारक आहे.
मोठ्या आवाज करणारे रेडिओ, लग्नामध्ये व इतर कार्यक्रमांच्या वेळी लावले जाणारे D.J. व फोडले जाणाऱ्या फटाकड्या, बॉम्ब यांमुळे ध्वनी प्रदूषण मध्ये आणखी भर घातली आहे. वाढत जाणारे कारखाने आणि या कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मशिनरी व त्यामुळे होणारा ध्वनि खूप मोठ्या प्रमाणात होणारा आवाज यांमुळे ध्वनी प्रदूषण वाढत चालले आहे.
इतरांच्या शांतपणे जगण्याच्या व झोपण्याच्या अधिकारावर आक्रमण करणारी कर्णकर्कश संगीताच्या नावावर नवीन वर्ष साजरा करण्यासाठी स्पर्धात्मक मोठा आवाज करून गाणे वाजवणारी पिढी. ध्वनी प्रदूषणा साठी कारणीभूत ठरत आहे.
भारतीय संस्कृतीने अनेक सणे, जयंती साजऱ्या केल्या जातात त्यामुळे गणपती उत्सव, शिव जयंती, बसवा जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात त्यामध्ये D.J. डान्स मोठ्याने ओरडणे, भांडण या सर्व गोष्टींमुळे ध्वनी प्रदूषण वाढत आहे.
मोठ्या आवाजात वाजवलेली गाणे, T.V. यांच्या संपर्कात जास्त वेळ राहिले असते मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याचा धोका असतो व सोबतच ध्वनी प्रदूषण सुद्धा होते.
ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम :
अतिरिक्त ध्वनी प्रदूषणाचे परिणाम आज आपल्या संपूर्ण पर्यावरणावर होत असल्याचे दिसून येत आहे.
ध्वनी हा हवेच्या माध्यमाने प्रसारित होऊन प्रवास करत असतो म्हणून ध्वनीचे मापन हवेच्या गुणवत्ता पातळी मध्ये केले जाते. ९० डेसिबल पेक्षा अतिरिक्त जोराचा आवाज वारंवार आपल्या कानावर पडत असल्यास बधिरत्व ( बहिरेपणा ) येण्याची शक्यता आहे.
ध्वनी प्रदूषण निष्कर्ष मराठी माहिती
ध्वनी प्रदूषणा मुळे सर्वात जास्त परिणाम होतो तो म्हणजे मानवी आरोग्यावर होतो. जास्त जोराचा आवाजा मुळे शरीराच्या नाडी तंत्रात कायमस्वरूपी बदल होतो आणि ऍड्रेलिन प्रवाह वाढायला लागतो व त्यामुळे शरीरातील हृदयाच्या कार्याची गती वाढली जाते. सतत आवाज येत असल्याने जोराच्या आवाजा मुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल ची पातळी वाढते व त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या संकुचित होऊन कायमच्या कमजोर होतात. ज्यामुळे हृदयाघात आणि हार्ट स्ट्रोकचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढतो.
अतिरिक्त आवाजामुळे व प्रमाणापेक्षा जास्त ध्वनी मुळे न्यूरोसिस आणि नर्व्हस ब्रेक डाऊन देखील होतो असे काही संशोधकांनी सांगितले आहे.
प्रमाणापेक्षा जास्त ध्वनी कानावर पडल्यास रक्तदाब वाढतो. व डोकेदुखी सुरू होते. ध्वनी प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा सर्वात घातक परिणाम म्हणजे बहिरेपणा होय.
अतिरिक्त आवाजामुळे बहिरेपणा येण्याची शक्यता आहे. ऐकायला कमी येणे व कानात सतत बेल वाजत राहिल्या सारखा आवाज येणे, झोप बिघडून अचानक जाग येणे यामुळे व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होऊन स्वास्थ्य बिघडते व वेदना होणे,
थकवा होणे, अस्वस्थता वाटणे, कुठल्याही कामामध्ये मन न लागणे, बोलण्यात अडथळा येणे व हार्मोन्स मध्ये बदल होणे यांसारखे घातक परिणाम मानवी आरोग्यावर ध्वनी प्रदूषणामुळे होतात.
तसेच, गरोदर स्त्रियांनाही अतिरिक्त ध्वनी मुळे त्रास होतो, त्यांचे मानसिक ताण वाढून संप्रेरकांचे प्रमाण वाढत जाते त्यामुळे अकाली प्रसूती होण्याचे प्रकार अलीकडे बघायला मिळत आहेत.
ध्वनी प्रदूषणामुळे आजारी व्यक्तींना खूप मानसिक त्रास होतो. ज्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा होऊन त्यांना जगणे नकोसे वाटते. शहरी भागामध्ये अतिरिक्त आवाज जास्त असल्याने तेथील लोकांचे पाचेंद्रिये निकामी होत आहेत. अशाप्रकारे ध्वनि प्रदूषणाचे घातक परिणाम आपल्या दैनंदिन जीवना मध्ये होत आहेत.
अशा प्रकारे ध्वनी प्रदूषणाचे अत्यंत वाईट परिणाम होताना दिसत आहेत.
ध्वनी प्रदूषण चे उपाय :
१) ध्वनी प्रदूषणाचा पहिला घात हा कानावर होतो म्हणून कानाच्या क्षमतेवर होणाऱ्या परिणामा पासून बचाव करण्यासाठी रोजच्या रोज व्यायाम केला पाहिजे. सोबतच पोषक आहार असणे गरजेचे आहे आणि योग्य प्रमाणात झोप असणे गरजेचे आहे.
२) शाळा, महाविद्यालये व दवाखाने हे ” ध्वनि- प्रदूषण” निषिद्ध भाग आहेत. या ठिकाणी अतिरिक्त ध्वनि निर्माण होऊ नये याचे सर्वांनी पालन केले पाहिजे.
३) मोबाइलचा कमीत कमी वापर करावा. मोबाईल वर गाणे, चित्रपट बघताना व ऐकताना आवाज हा आपल्या पुरताच मर्यादित असावा याचे भान ठेवावे.
४) वाहनांच्या हॉर्नचा आवाज अनावश्यक ठिकाणी न वाजवावा. गरज आहे त्या पुरताच हॉर्न वाजवला पाहिजे.
५) डीजे सारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांचा आवाज योग्य डेसिबल पातळी मध्ये ठेवून वापर करावा जेणेकरून त्यांच्या आवाजामुळे कोणाला त्रास होणार नाही.
६) कर्णकर्कश आवाज असलेल्या ठिकाणी इअर प्लगचा वापर करावा जेणेकरून त्या आवाजाचा परिणाम आपल्या स्वास्थ्य वर होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.
७) दिवाळी मध्ये उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांचा वापर कमी करावा कारण ह्या फटाकड्या ध्वनी प्रदूषण साठी कारणीभूत ठरत आहेत.
८) रात्रीच्या वेळी ध्वनिक्षेपक वापरावर उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आलेली आहे तरी या नियमांचे सर्वांनी पालन केले पाहिजे.
९) रात्रीच्या वेळी सर्व वातावरण शांत असते त्यामुळे रात्री कोणीही कुठल्याही प्रकारचा आवाज आपल्या आसपासच्या परिसरा मध्ये करू नये.
१०) आपल्या टीव्ही, संगीत प्रणाली इत्यादी साधनांचा आवाज कमी ठेवावा, लाऊड स्पीकर वापरापासून इतरांना परावृत्त करावे.
११) लग्न समारंभामध्ये बँड, ताशा यांचा वापर करणे टाळावे. वरील काही उपाय व नियमांचे पालन आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्यास चालू केल्यास ध्वनी प्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून वंचित राहण्यास मदत होईल.
त्यामुळे आपले मानवी आरोग्य निरोगी राहील व सोबतच पर्यावरण सुद्धा स्वच्छ व निर्मळ राहील. म्हणून ध्वनी प्रदूषण थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.
* ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- वेळेचे महत्व निबंध मराठी
- जर मी शिक्षक झालो तर
- कचऱ्याचे व्यवस्थापन निबंध
- माझे बाबा या विषयावर मराठी निबंध
- संगणक ची माहिती मराठी मध्ये
- Marathi Quotes
- Success Story
- Today इतिहास
“पर्यावरण रक्षण…काळाची गरज”
Pradushan Nibandh in Marathi
आज पर्यावरण प्रदूषणाची समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नसून ही समस्या संपूर्ण विश्वाला भेडसावते आहे. आज प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना प्रदूषणाचे विविध प्रकार, प्रदूषणाची कारण, त्यावरचे उपाय याविषयी अवगत करायला हवे.
आज आपण रहातो त्या जगाची सर्वात मोठी समस्या प्रदूषण ही झाली आहे. आपल्या आसपास जे घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यातून हे प्रदूषण जन्मास येते. या प्रदूषणाच्या विळख्यात केवळ मनुष्य प्राणी अडकलाय असे नव्हे तर समस्त जीवजंतू आणि अवघी जीवसृष्टी याच्या दुष्परिणामांचा सामना करते आहे.
गेल्या काही दशकांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण इतके वाढले आहे की मानवी जीवनच संकटात सापडले आहे. या समस्येवर गांभीर्याने विचार केला गेला नाही तर तो दिवस दूर नाही जेंव्हा दररोज प्रदूषणामुळे कुणा न कुणाचा मृत्यू होईल आणि एक दिवस या जगाचे अस्तित्वच नामशेष होईल.
“या मित्रांनो प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधूया…प्रदूषणाला हद्दपार करूया” – Essay on Environmental Pollution in Marathi
प्रदूषण म्हणजे काय? – Definition of Pollution
जेंव्हा दुषित तत्व प्रकृतीच्या परिघात प्रवेश करतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात, त्यामुळे नैसर्गिक संतुलन पूर्णतः बिघडून मनुष्याला शुद्ध वायू, शुद्ध पाणी आणि शांत वातावरण मिळत नाही तेंव्हा त्याला प्रदूषण असं म्हंटलं जातं.
या प्रदुषणामुळे अनेक गंभीर समस्या जन्म घेतात. याचा दुष्परिणाम केवळ आपल्या दैनंदिन जीवनावरच होतो असे नव्हे तर अनेक गंभीर आजार प्रदुषणामुळे निर्माण होतात. ग्लोबल वार्मिंग सारखी समस्या यातूनच निर्माण झाली आहे. आज मनुष्य आपल्या सुखासीन जीवना करता अनेक आरामदायक, सुखसुविधा देणाऱ्या उपकरणांचा वापर करतो आहे, परंतु त्यामुळे निसर्गाचे संतुलन ढासळते आहे आणि प्रदूषण आपल्या चरमसिमे पर्यंत पोहोचले आहे.
आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मनुष्य या उपकरणांच्या सुखसुविधेत गुरफटला गेला आहे. त्याला या क्षणिक सुख देणाऱ्या उपकरणांची इतकी सवय झाली आहे की याच्याशिवाय तो आपल्या आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही.
परंतु या मानव निर्मित उपकरणांमुळे निसर्गाची अपरिमित हानी होत असून प्रदूषणाची समस्या निरंतर वाढते आहे. त्यामुळे आज या प्रदूषणाच्या समस्येवर अंकुश निर्माण करण्याची आणि समाजाचे लक्ष याकडे केंद्रित करण्याची नितांत आवश्यकता आहे.
स्वच्छ शुद्ध वातावरणात राहिल्याने केवळ मनुष्याचा विकास होतो असे नव्हे तर स्वस्थ समाजाची देखील निर्मिती होते. शुद्ध वातावरण म्हणजे-प्रदूषण रहित वातावरण होय!
आपण सर्वजण मिळून जोवर वातावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत केवळ अस्वच्छता आणि प्रदूषण पसरत राहील. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी याचे दुष्परिणाम आणि त्यापासून वाचण्याचे उपाय याविषयी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तेंव्हाच या प्रदूषणाच्या समस्येवर आळा बसू शकेल.
खरंतर आपण काहीही विचार न करता आपल्या प्राकृतिक साधन संपत्तीचे हनन करत असतो, त्यामुळे प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्याला आपले ज्ञान वाढवावयास हवे आणि विचारांची व्याप्ती वाढवायला हवी. विविध प्रकारचे प्रदूषण, त्याची कारणं आणि मानवी जीवनावर आणि निसर्गावर त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
प्रदूषणाचे प्रमुख प्रकार – Types of Pollution in Marathi
- वायू प्रदूषण – Air Pollution
- जल प्रदूषण – Water Pollution
ध्वनी प्रदूषण – Sound Pollution (Noise pollution)
- रेडीयोधर्मी प्रदूषण – Radioactive Pollution
- रासायनिक प्रदूषण – Chemical Pollution
- प्रकाश प्रदूषण – Light Pollution
- दृश्य प्रदूषण – Visual pollution
- थर्मल प्रदूषण – Thermal Pollution
काही प्रमुख प्रदुषणाबद्दल आपण विस्तृत माहिती घेऊया – Main types of Pollution
वायू प्रदूषण – air pollution.
आज पूर्ण पृथ्वीवर वायू प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वायू प्रदुषणामुळे मानवाला शुद्ध हवा मिळत नाही आणि परिणामी दमा, अस्थमा, सारख्या श्वसना संबंधित अनेक आजारांचा त्याला सामना करावा लागतो. वास्तविक जेंव्हा आपल्या वायुमंडलात जैविक, रासायनिक, सूक्ष्म असे अनेक तऱ्हेचे विषारी पदार्थ प्रवेश करतात तेंव्हा त्याला वायू प्रदूषण असं म्हंटल्या जातं.
या दुषित तत्वांमुळे वायू दुषित होतो, आपल्या वायुमंडलात एका निश्चित मात्रेत अनेक गैस असतात पण जेंव्हा दुषित तत्व या वायुमंडलात प्रवेश करतात तेंव्हा या गैसचे संतुलन बिघडते, आणि त्यामुळे वायूप्रदूषण होण्यास सुरुवात होते. वाढते औद्योगिकीकरण, अनियंत्रित लोकसंख्या, कमी होत जाणारे जंगल आणि वाहनांचा अत्याधिक वापर यामुळे वायुप्रदूषणाची समस्या सतत वाढते आहे.
जल प्रदूषण – Water pollution
जल प्रदुषणामुळे केवळ मानवी जीवनच नव्हे तर सागरी जीव-जंतू आणि असंख्य वनस्पती देखील प्रभावित झाल्या आहेत. ज्यावेळी नैसर्गिक जल-स्त्रोतांमध्ये विविध प्रकारचे दुषित पदार्थ मिसळले जातात तेंव्हा जल प्रदुषणाची समस्या उग्र रूप धारण करते.
मोठमोठ्या उद्योगक्षेत्रांमधून निघणारा कचरा, रसायन जलस्त्रोतांमध्ये फेकण्यात येतो तेंव्हा पूर्ण पाणी विषारी होऊन जाते. अनेक सागरी जीवजंतू त्यामुळे मृत्युमुखी पडतात. या दुषित पाण्याच्या सेवनाने मनुष्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. जल प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. या समस्येवर गंभीर प्रयत्नांची खूप आवश्यकता आहे.
मोठ्या आवाजाने होणाऱ्या प्रदूषणाला ध्वनी प्रदूषण म्हंटल्या जातं. वाहने, यंत्र, रेडियो, डीजे, लाउडस्पीकर, टेलीविजन सारख्या असंख्य उपकरणांमधून ध्वनी प्रदूषण होते.या ध्वनी प्रदूषणामुळे माणसाची ऐकण्याची क्षमता कमी होते.
कित्येकदा या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा, हार्ट अटैक, तणाव, यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत असतात. याविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. तेंव्हाच या समस्येचे निराकरण होऊ शकते.
निष्कर्ष – Conclusion
- कोणत्याही प्रकारचे प्रदूषण असो, ते हानिकारकच असते. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्येवर चिंतन करण्याची आवश्यकता आहे आणि हे तेंव्हाच संभव होईल जेंव्हा संपूर्ण समाज एकजुटीने पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करेल आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपल्या पृथ्वीला हिरवीगार करेल.
- वाहनांचा वापर शक्य तितक्या कमी प्रमाणात करणे देखील आवश्यक आहे.
- मोठमोठे उद्योग कारखाने शहराच्या जवळ सुरु न करता शहरा बाहेर उभारले जावे जेणे करून नगर वासियांना प्रदूषणाच्या समस्येला कमी प्रमाणात तोंड द्यावे लागेल.
- आपल्या परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून ते वृक्ष मोठे होईपर्यंत त्याची काळजी घ्या.
- कचऱ्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावणे देखील फार गरजेचे आहे.
- कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळण्यास शेतकरी बांधवाना प्रोत्साहीत करा.
- पर्यावरणाला स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा.
- मोठमोठ्या उद्योगांकरता कठोर नियम (पर्यावरणाला अनुसरून) बनवावे.
प्रदूषण ही आजच्या युगाची सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. पिण्याचे जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. प्रदूषणाच्या समस्येवर वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही तर येणाऱ्या काळात फार मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल.
त्यामुळे वेळ असता सजग सावध होऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करून लोकांना एकत्र करून जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रोत्साहीत करा. वातावरण स्वच्छ ठेवा, आपल्या पृथ्वीला निरामय करा!
Vaibhav Bharambe
खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!
Related Posts
“होळी” या सणावर निबंध
Essay on Holi in Marathi होळीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या दिवशी होळीचे दहन केले जाते. होळीच्या...
माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
Essay on Cricket in Marathi Essay on Cricket in Marathi माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध - Essay on Cricket in...
“माझी शाळा” मराठी निबंध
Majhi Shala Nibandh in Marathi प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेच वेगळच महत्व असते. ती शाळा ज्यामध्ये लहानपणी न जाण्यासाठी रडायचं आणि मोठ...
Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved
- Application
ध्वनी प्रदूषण महत्व मराठी निबंध Noise sound pollution essay in Marathi
ध्वनी प्रदूषण मराठी माहिती याबाबत मोठ्या प्रमाणावर ती आपण माहिती संकलित करून बघणार आहोत. ध्वनीचा आपल्या जीवनावर ती पण खूप मोठा परिणाम होतो.
ध्वनी प्रदूषणाचे महत्त्व
Noise sound pollution ध्वनी प्रदूषण ही प्रत्येक वेळी आपण मानवनिर्मितच होतो असं नाहीये यांत्रिक निर्मित सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत राहते. यामुळे आपल्याला प्रदूषणाचा वाढता प्रादुर्भाव पाहिला भेटतोय.
Noise pollution essay in Marathi ध्वनी प्रदूषण महत्व मराठी निबंध
ध्वनी प्रदूषणाचे महत्त्व -मराठी निबंध.
मानव निर्मिती यांत्रिक निर्मितीनं होणार ध्वनी प्रदूषण मानवाला पशु पक्षी प्राणी सृष्टी यांना अतिशय धोकादायक असल्यामुळे जीव सृष्टी प्रदूषण केल्यामुळे धोक्यात आलेली आहे
ध्वनी प्रदूषण म्हणजे काय -
यांत्रिक मानव निर्मित अशा प्रकारचे आपल्या कानाला कर्कश्य आवाज निर्माण होतात त्या आवाजाला ध्वनी असं म्हणतात.मनुष्य प्राणी यांत्रिक पर्यावरणामुळे याच्या पलीकडे तयार होतो त्याला ध्वनिप्रदूषण असं म्हटलं जातं.
ध्वनी चा आवाज( तीव्रता )कसा मोजला जातो.
ध्वनी चा आवाज डीबी म्हणजे डेसिबल या एककात मोजली जातो.
आवाजाची तीव्रता
याठिकाणी मानवाची वर्दळ जास्त आहे त्या ठिकाणी पाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वृद्धी होत राहते मानव वस्ती आहे बांधकाम शेती चालतं आहे या ठिकाणी दोन्ही प्रदूषण मोठ्या प्रमाणावर ती आवाजात वाढत राहते.
ध्वनी प्रदूषणचा मनुष्य प्राणी यांच्या आरोग्यावर वर्तमान वर परिणाम होतो
1)ध्वनीची पातळी वाढणे.
माणसाच्या मनावर डोक्यावरती ताण येऊन हृदयावर ती धडधड वाढते.
2) रक्तदाब वाढतो-
प्रदूषणाची तीव्रता वाढली तर मानवाच्या आरोग्यावरही परिणाम जाणवायला हळू सुरुवात होते मानवाचा रक्तदाब वाढला जातो.
3) हृदयाचे विकार जडू शकतात
ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची हालचाल कमी होऊन हृदयामध्ये ब्लॉक तयार होतात त्यामुळे हृदयाचे विकार जडू शकतात.
4) लक्ष विचलित होते -
सतत वारंवार आवाज येत राहीले तर आपले लक्ष विचलित होईल आपण जे लक्ष केंद्रित केलेला आहे ते लक्ष पूर्णपणे विचलित होतं उदा विद्यार्थ्यां अभ्यासावरील लक्ष विचलित होतं तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात शिकवणी वरचं लक्ष कमी होतं.
5) चिडचिड होते
ध्वनीची तीव्रता वाढल्यामुळे डोक्यात सतत घुमणारा आवाज वाढतो आणि त्यामुळे मनामध्ये डोक्यामध्ये चिडचिड मोठ्या प्रमाणावर होते.
6) कार्यक्षमता कमी होते
आवाजाच्या सतत बदलत्या वापरामुळे किंवा आवाजामुळे आपण जे काम करतो त्या कामांमध्ये बदल होऊन कामाची वेळ किंवा कामांमध्ये होणारा बदल यामुळे आपल्या जो काम करतो त्या क्षमतेमध्ये पूर्णपणे बदल होतो
7) पचनक्रियेत बदल होतो .
आपण जे अन्न खातो ते अन्नाचं पचन होणार महत्व महत्त्व असतं त्यामुळे वारंवार होणाऱ्या आवाजामुळे पचनक्रिया मुळे आपल्या शरीरावर ती खूप मोठ्या प्रमाणावर ती बदल होत राहतो.
8) सतत होणाऱ्या आवाजामुळे बहिरेपणा येतो.
सतत भुंगाट आवाज यामुळे विमानाचा आवाज असेल वाहनांचा वर असेल रेल्वे चा आवाज असल्यामुळे आपल्याला बहिरेपणा येऊ शकतो कानांना बहिरेपणा येऊ शकतो.
ध्वनी प्रदूषणाचे प्राण्यांवर होणारे परिणाम.
1) अन्नधान्य मिळवण्यासाठी बदल.
ध्वनी प्रदूषणाचे पशुपक्षी प्राणी यांच्यावर ती खूप मोठे परिणाम होत राहतात अन्नधान्य मिळवण्यासाठी पक्षांमध्ये स्पर्धा तयार होऊन मनुष्यवस्तीत पशुपक्षी घुसू लागतात.
2) प्रजनन क्षमतेत बदल
पशुपक्षी यांच्यात प्रजनन संस्थेमध्ये ध्वनिप्रदूषणामुळे आवाजाच्या विविध बदलामुळे प्रजनन क्षमतेत बदल होत गेलेला असल्यामुळे त्यांना प्रजनन क्षमतेचा तुटवडा जाणवू लागतो परिणामी आपल्याला पशू-प्राणी यांचा यांची तुटवडा आपल्याला अभयारण्यामध्ये जाणवायला सुरूवात झाली.
3) दिशा ओळखण्यात बदल
पशुपक्षी प्राणी यांचे यांच्या यांच्या ध्वनिप्रदूषणामुळे आवाज ओळखण्यात बदल झालेला आहे आणि दीशा सुद्धा त्यांना दोन्ही प्रदूषणामुळे कळत नाहीये त्यामुळे एकमेकांच्या चुका होऊन कळत-नकळत कळप एकमेकांपासून दूर जात आहेत
4) अधीवास जागा बदलणे
पशुपक्षी प्राणी यांची राहण्याची जागा ध्वनिप्रदूषणामुळे बदलत गेलेली आहे त्यामुळे अधिवास त्यांचा कुठेही होऊ लागलेला आहे अगदी मनुष्यवस्तीत सुद्धा पशू प्राणी पक्षी आपले वास्तव्य करू लागलेला आहेत.
5) आवाजात बदल
ध्वनिप्रदूषण झाल्यामुळे पशुपक्षी प्राणी यांच्या आवाजामध्ये बदल झालेला आहे या आवाजामुळे जी शांतता आहे त्या शांततेचा भंग झालेला आहे त्यामुळे एकमेकांपासून दूर गेलेले पशू-प्राणी हे आवाजामुळे जवळ येतात तर हे त्यांच्यापर्यंत आवाज न गेल्यामुळे एकमेकांपासून खूप दूर जातात.
ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करणे -
ध्वनी प्रदूषणाची तीव्रता आपल्याला कमी करता येईल त्यामध्ये व वाहतूक क्षेत्र असेल रस्त्यावरील शेत्र असे जड वाहने असतील यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर ती बदल करून तीव्रता कमी करू शकतो.
1)रस्त्यावरील वाहतुकी ध्वनी प्रदूषण
रस्त्यावरील वाहतूक असेल तर तिथे वाहतूक पोहोचला असेल तर इंजिनचा आवाज कमी करून वाहतुकीतील ध्वनी प्रदूषण टाळता येऊ शकते.
ध्वनी प्रदूषणाची पातळी ध्वनी-अडथळे उभारून
वाहनांचा वेग मर्यादित ठेवून कमी करता येऊ शकतो.
2)रस्त्यांच्या पृष्ठभागांमध्ये बदल -
ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यांच्या पुस्तक बाबा मध्ये बदल करून तो बदल ध्वनी प्रदूषण हा साठी कमी करण्यासाठी आपण उपयुक्त ठरू शकतो
3) जड वाहनांवर मर्यादा घालून
रस्त्यावरील वाहतूक वाहतूक जड वाहनांना मूर्ती मर्यादा घालून जड वाहनांचा इंजिनचा आवाज असतो आपल्याला कमी होऊन ध्वनिप्रदूषण कमी करता येईल
4) टायरच्या रचनेत बदल
टायरच्या रचनेमध्ये बदल करून घेणे प्रदर्शन सुद्धा कमी करता येऊ शकते
5)विमानांमुळे निर्माण होणारा ध्वनी सुधारित एंजिने बदलून
विमानांच्या कर्कश आवाजामुळे चुकला दोन्ही प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असते सुधारित इंजिन तयार करून ते इंजिने बदलून नवीन मार्गातील मध्ये इंजिनचा वापर करून होणाऱ्या आवाजामध्ये कमी करून यांच्या ध्वनी मध्ये बदल करता येऊ शकतो
तसेच त्यांच्या मार्गात बदल करून कमी करता येतो.
दैनंदिन व्यवहारातील ध्वनी तीव्रता
1)शक्यतो हळू आवाजात बोलणे .
शक्यतो आपल्याला दोन्ही प्रदूषण जर टाळायचा असेल तर आपण स्वतःहून हळू आवाजात संवाद साधला पाहिजे एकमेकांबरोबर हळू आवाजात बोललं पाहिजे
2)गाणी ऐकताना
पण गाणे ऐकताना हेडफोन लावून गाणे ऐकणे मोठे डीजे लावून इतरांना त्रास होईल असं गाणी ऐकू नयेत
3) आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन
आपल्या सभोवताली असणाऱ्या विविध मानवाला त्रास होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घेऊन आपल्या दोन्ही प्रदूषण टाळता येईल तसेच पशु पक्षी प्राणी यांच्यावर ती ध्वनिप्रदूषणाचा वापर करता येऊ नये आणि त्यांना ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे
4)विविध उपकरणांची व वाहनांची नियमित देखभाल करून
पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपकरणे आहेत वाहन आहे यांची नियमित देखभाल करणे गरजेचे आहे नेहमी वेळच्यावेळी ऑइल बदली करणे साफ करणे यामुळे वाहनांची देखभाल केल्यामुळे आवाजात बदल होऊन आवाज कमी होऊ शकतो
5) गरज असेल तरच हॉर्नचा वापर
वाहतुकीच्या ठिकाणी वर्दळीचे ठिकाण असतील उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणावर ती बाजारपेठ असेल आणि तिथे शेर वस्ती लागून असलेल्या ठिकाणी हॉर्नचा वापर न करता आपण हळुवारपणे आपल्याला मार्ग काढत जाणे हेच गरजेच आहे गरज असेल तरच हार्न चा वापर करावा.
6)फटाक्यांचा वापर टाळून
दिवाळी असेल गणपती उत्सव असेल भारतातील प्रमुख भारतीय सण असल्यामुळे या वेळेस आपला आनंद हर्ष आनंदात लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील हे फटाक्यांचा वापर सण उत्सवात किंवा बर्थडे पार्टी असतील या ठिकाणी लग्न समारंभ असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ती फटाक्यांचा वापर करत असतात हा वापर तुम्ही टाळून प्रदूषणाला आळा घालू शकता.
अशा प्रकारे आपण सर्व जणांनी ध्वनी प्रदूषणाची काळजी जर घेतली तर ध्वनिप्रदूषण होण्यापासून आपण वाचू शकतो आणि आपला आरोग्य सुद्धा व्यवस्थित ठेवू शकतो दोन्ही प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतोच पण पशुपक्षी प्राणी यांच्यावर ती स्वतः आरोग्यावरही परिणाम होतो परिणामी सृष्टीवर ती खूप मोठ्या प्रमाणावर ती परिणाम जाणवायला ध्वनिप्रदूषणाचा लागलेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
संपर्क फॉर्म.
Sound Pollution Information in Marathi Essay | Dhwani Pradushan in Marathi
Sound pollution in marathi, dhwani pradushan marathi nibandh : जल प्रदूषण निबंध.
Noise Pollution in Marathi Project / ध्वनी प्रदूषण :
• ध्वनी प्रदूषण मोठ्या व अनुपयोगी आवाजाला म्हणतात, व याचा त्रास माणूस व जनावरे दोघांनाही होतो. • ध्वनी प्रदूषण हि जास्त करून मानवनिर्मित समस्या आहे. • ध्वनी प्रदूषण हे शहरी भागात जास्त असते. • निरंतर वाढणाऱ्या ध्वनी प्रदुषणामुळे आपण वर्तमान आणि भविष्य पिढीचे जीवन धोख्यात घालत आहोत.
ध्वनी प्रदूषणाची कारणे -:
• वाहतुकीदरम्यान होणारा आवाज हे ध्वनी प्रदुषणाचे मुख्य कारण आहे. • दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे वाहने व त्यामुळे होणारी वाहतूकही वाढत आहे. व त्याचाच परिणाम ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे • जगभरात सगळ्यात जास्त ध्वनी मोटार वाहन यात विमानाचा आवाज आणि रेल्वेचाआवाज यांचा समावेश आहे. • खराब शहरी नियोजनामुळे ध्वनी प्रदूषणास हातभार लागतो. • मोठमोठे कारखाने, मिलमधूनही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असते. • दैनिक जीवनात घरेलू उपकरणांचा उपयोगातही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. • भारतात शहरीकरण आणि औद्योगीकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण वाढले आहे. • सामान्य जीवनातील उत्सवात उदा. लग्न, पार्टी, पब, क्लब तसेच पूजा स्थान, मस्जिद तथा आदिवासी भागात ध्वनी प्रदूषण होत असते.
ध्वनी प्रदुषणाचे परिणाम -:
• आवाजामुळे माणसाची ऐकण्याची शक्ती कमी होण्याचा धोका असतो. • नको असलेले मोठे आवाज शारीरिक आणि मानसिक नुकसान पोहोचऊ शकतात. • ध्वनी प्रदुषणामुळे उच्च रक्तदाब, चिडचिड आणि आक्रमकता, ताण पातळी, टस, सुनावणी तोटा, झोप न लागणे, इत्यादी आजार मोठ्या होऊ शकतात. • तसेच ध्वनी प्रदुषणामुळे हृदय रोगालाही निमंत्रण असते. • वृद्ध माणसांना आणि लहान मुलांना ध्वनी प्रदुषणाचा जास्त परिणाम होतो. • प्रतिदिन वाढणाऱ्या ध्वनी प्रदुषणामुळे माणसाच्या काम करण्याच्या क्षमतेवर आणि गुणवत्तेवर परिणाम करते. • ध्वनी प्रदुषणामुळे एकाग्रता नष्ट होते. • गर्भवती महिलांवर याचा जास्त परिणाम होतो, त्या चिडचिड्या बनतात व यामुळे गर्भपातही उद्भवू शकतो. • आवाजाची तीव्रता ८० डेसिबल ते १०० डेसिबल असल्यास माणसाला किंवा प्राण्यांना बहिरेपण येऊ शकते. • मोठ्या आवाजाने जुन्या पुराण्या इमारती, जुने पूल कोसळण्याची भीती संभवते. • मोठ्या ध्वनी प्रदुषणामुळे पशु-पक्षी आपल्या मेंदूवरील नियंत्रण गमावतात आणि ते खतरनाक बनू शकतात. • मोठा आवाज सजीवांच्या नर्व्हस सिस्टिमला हानी पोहोचवू शकते.
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी उपाय -:
• ध्वनी प्रदूषणाविरोधात लोकांमध्ये जनजागृती करणे. • ध्वनी प्रदूषणाचा प्रत्येक नियम गंभीरतेने पाळणे. • कमी आवाज करणाऱ्या वाहनांचा वापर करणे. • रुग्णालये, शाळा-विद्यालये इत्यादी ठिकाणी वाहनांचा आवाज करू नये. • घरात किंवा बाहेर बाहेर मोठा आवाज करणारी उपकरणांचा कमी प्रमाणात उपयोग करावा. • आवाजाच्या योग्य नियोजनाने ध्वनी प्रदूषणापासून मुक्ती मिळू शकते.
Click Here for the Full List of Essays on Marathi.TV
Sound Pollution Information in Marathi Language Wikipedia / Mahiti Essay Nibandh
Related posts, 3 thoughts on “sound pollution information in marathi essay | dhwani pradushan in marathi”.
Sound prdushan in Marathi
Tell me mahatwa
WALGAON ROAD
Leave a Comment Cancel Reply
Your email address will not be published. Required fields are marked *
प्रदूषण मराठी निबंध | Essay on Pollution in Marathi
Table of Contents
नमस्कार मित्रांनो आम्ही इथे प्रदूषण मराठी निबंध / Essay on Pollution in Marathi दिला आहे तसेच आम्ही या निबंधामध्ये प्रदुषणाचे सर्व प्रकार दिले आहेत तसेच यामध्येच आम्ही प्रदूषण एक समश्या हा निबंध पण दिला आहे, सोबत प्रदूषणामुळे होणारे नुकसान आणू प्रदूषण टाळण्यासाठीच उपाय देखील या लेखात मी दिले आहे त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.
प्रदुषण वरती काय लिहायचे जेवढे लिहील तेवढेच कमी आहे. प्रदूषण हि सर्व जगातीलच एक मोठी समस्या आहे आज आपण याचीच माहिती घेणार आहोत. प्रदुषण या राक्षसाला माणसानेच अन्न पाणी देऊन मोठा केला आहे. जर माणसाने सुरूवातीच्या काळातच या राक्षसाचे मुंडके दाबले आसते तर आज ही वेळच आली नसती. पण अजुनही उशीर झाला नाही आत्ताच आपण या राक्षसाचे मुंडके दाबु आणि याला जमीनीत गाढुन टाकु आणि आपल्या पृथ्वीचे रक्षण या राक्षसापासुन करू.
पण जसे की पुराणात सांगितल्याप्रणाणे एखाद्या शञुसी युद्ध करायचे असेल तर त्याची आधी माहिती घ्या म्हणजे त्याला हारवायला सोपे जाईल त्यामुळे या राक्षसाला हरविण्यासाठी आधी आपण त्याची माहिती घेऊ आणि हो हि माहिती फक्त घ्यायची नाही तर आपल्या जवळच्या आपल्या सैन्याला म्हणजेच नातेवाईक मिञ, भाऊ, बहिण यांना पण सांगायची आणि त्यांना पण या राक्षसाच्या लढाईत समाविष्ट करून घ्यायचे.
सगळ्यात आधी प्रदुषण म्हणजे काय आणि ते कशामुळे होते. साध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर निसर्गाच्या एखाद्या गोष्टीत मानवाने हस्तक्षेप करून त्यात वाईट बदल घडवुन आणने म्हणजे प्रदुषण होय. जसे की सांगायचे झाले तर स्वच्छ नदीत गहाण, दुषीत किंवा कारखान्यातील केमीकल युक्त पाणी सोडणे होय. यामुळे काय होते तर पाण्याचा नैसर्गिक स्ञोत आहे त्याचे प्रदुषण होते व ते पाणी प्राणी पक्षी व मानव यांना वापरण्याच्या लायक राहत नाही म्हणजे प्रदुषण फक्त पाण्याचेच होते का आणि त्याचे प्रकार आपण आपण पाहु.
प्रदुषाचे प्रकार / Pollution Types in Marathi
- पाणी प्रदुषण
- हवा प्रदुषण
- भुमी प्रदुषण
- ध्वनी प्रदुषण
1. पाणी प्रदुषण / Water Pollution in Marathi
या मधे मागे पाहिल्याप्रमाणे नैसर्गिक पाणीसाठ्या मधे कारखान्याचे पाणी, मनुष्यवस्तीतील पाणी सोडल्याणे पाणी प्रदुषण होते अनेक कारखाने दुषित पाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडुन देतात, तसेच मनुष्य वस्तीतील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर सोडल्यामुळे खुप मोठ्या प्रमाणावर पाणी प्रदुषण होते.
यामुळे नदी, समुद्र, तलाव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळेच महाराष्ट्रातील अनेक समुद्र किनार्यावर मासे मृत्यमुखी पडले आहेत. आता आपण पाणी प्रदुषण कमी करण्याचे उपाय पाहु.
पाणी प्रदुषणावरील उपाय – नदीत किंवा समुद्रात सोडल्या जाणार्या दुषीत पाण्याला आळा घालणे. जर एखादा कारखाना किंवा कंपनी विनाप्रक्रीया दुषीत पाणी नदीत सोडत आसेल तर आपण शासकीय यंञनेच्या निदर्शणास आणुन देणे तसेच मिडीयाद्वारे त्या प्रश्नास वाचा फोडणे ही आपली जबाबदारी आहे, तसेच आपल्या घरातुन येणारे पाणी गटारीत न सोडता शक्य आसल्यास शोसखड्यात सोडणे.
2. हवा प्रदुषण / Air Pollution in Marathi
हवा ही माणसाला लागणारा अविभाज्य घटक आणि त्यात जर प्रदुषण झाले तर माणसाचे जीवणच अवघड होईल आता हे हवा प्रदुषण होते कशाने याचे मुख्य कारण आहे वाहणातुन निघणारा धुर, तसेच कंपन्यातुन निघणारा धुर, तसेच कचरा जाळणे यामुळे हवा प्रदुषण होते. वाहणामुळे वातावरणात कार्बण डायऑक्साईड हवेत सोडला जातो त्यामुळे तापमाण वाढते. तसेच हा कार्बण डायऑक्साईड ओझोन च्या थरालाही हाणी पोहचवतो.
प्रदुषण मुख्य करून शहरी भागात मोठ्या प्रमाणात आहे दिल्ली सारख्या शहरात हे प्रमाण हाताबाहेर गेले आहे. तसेच जगातील सर्वात ष्रदुशित शहरे भारतात आहेत.
हवा प्रदुषणावरील उपाय – सरकारी यंञना हे प्रदुषण थांबवण्यासाठी प्रयत्न करतेय पण जो पर्यंत्न आपण मनावर घेणार नाही तो पर्यंत त्यांना यश मिळणार नाही म्हणुन आपण पण त्यांना मदत करावी लागेल.
मग आपण काय करायचे जर तुम्ही शहरात राहात असाल तर गाडीचा वापर कमी करायचा शक्यतो सार्वजनिक बस वापरायची आठवड्यातुन एक दिवस तरी गाडी वापरायचे टाळायचे.
जर पर्यायच नसेल तर बॅटरीवर चालणारी वाहणे वापरायची किंवा सायकलचा वापर करायचा आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे जास्तीत जास्त झाडे लावायची शक्य आसेल तिथे घराजवळ आणि इतरञ झाडे लावा व इतरांना पण सांगा.
3. भुमी प्रदुषण / Land Pollution in Marathi
भुमी प्रदुषणाचे प्रमाण शहरी भागात जास्त आहे कारण शहरात काही ठिकाणी कचर्याची व्यवस्था नसल्यामुळे कचरा इतरञ टाकला जातो आणि भुमी प्रदुषण होते यामुळे जमिणीचा स्तर खालावला जातो आणि या जमिनीची पिके उगवण्याची क्षमता कमी होते.
भुमी प्रदुषणावर उपाय – कचरा शक्यतो कचरा कुंडीतच टाकणे ओला व सुका कचरा वेगळा करणे.
वेगळे ठेवणे घंटा गाडी मध्ये कचरा टाकणे तसेच इतरत्र कचरा टाकणे कटाक्षाने पाळणे तर भुमी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल तसेच मेडिकल कचरा वर लक्ष ठेवणे जर कचरा इतरत्र दिसला तर शासकीय यंत्रणेला कळवणे.
4. ध्वनी प्रदूषण / Noise Pollution in Marathi
प्रदूषणामुळे होणारे नुकसान.
- हवेच्या प्रदूषणामुळे माणसांना, प्राण्यांना व पक्ष्यांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.
- मानवांना श्वासोच्छवास, दमा, खोकला, त्वचेचे रोग इत्यादी रोगांचा सामना करावा लागत आहे.
- प्रदूषणामुळे ओझोन थर खराब होत चालला आहे, कारण अल्ट्राव्हायोलेट किरण शोषून घेण्याची शक्ती आता कमी होत चालली आहे.
- सूर्यापासून किरणांमुळे लोकांना त्वचेचा कर्करोग होत आहे.
- हववतील प्रदूषणामुळे जगातुल लोकांना फुफ्फुसांशी(LUNGS) संबंधित आजार होऊ लागले आहेत.
- हिवाळ्यामध्ये धुके आणि वायू प्रदूषणामुळे लोकांना नीट दिसत नाही आणि डोळ्यात जळजळ होते.
- वायू प्रदूषण आणि सूर्याच्या उष्णतेमुळे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड वायू, नायट्रोजन ऑक्साईड गॅस इत्यादींचा प्रमाण वाढत आहे, जे आपल्या सर्वांसाठी हानिकारक आहे.
- हवेच्या प्रदूषणामुळे ऍसिड रेन बघायला भेटत आहे, जो मानवी जीवनासाठी समस्येची बाब बनली आहे.
प्रदूषण हे एका दिवसात किंवा एखाद्या व्यक्तीकडून ठीक कोण्यासारखी समस्या नाही आहे. मुळापासून प्रदूषण दूर करण्यासाठी, संतुलित लढाई जागतिक स्तरावर लढावी लागेल. जेणेकरून प्रभावी परिणामांची जगात अपेक्षा केली जाऊ शकते. तथापि, बदल घरापासून सुरू होतो, म्हणून जर आपल्याला निसर्ग रडताना पाहू इच्छित नसाल तर आजपासूनच नवीन झाडे लावायला सुरवात करा, धूम्रपान करणे बंद करा, नदी नाल्यांचे पाणी दूषित करू नका व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी जोरजोराने हॉर्न वाजवायचे बंद करा. अशीच छोटी छोटी पावले जर सगळ्यांनी उचलली तर प्रदूषणावर आला घातला जाऊ शकतो.
मित्रांनो प्रदूषणावर आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. तुमच्या कडे सुद्धा प्रदूषण टाळण्यासाठीचे उपाय असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Related Posts:
- माझी शाळा मराठी निबंध | My School Essay in Marathi
- Job application letter in marathi | नोकरी अर्ज नमुना…
- दहावी नंतरचे करिअर | Dahavinantar Pudhe kay krayche?
- जंगली प्राण्यांची नावे | Name Of Wild Animals In Marathi
- घटस्फोट कसा घ्यावा | घटस्फोट प्रक्रिया | Divorce…
- पोलीस भरती कागदपत्रे | Police bharti document
- शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Importance of…
- Examples of viram chinh in Marathi | Punctuation…
- MPSC Mains Syllabus in Marathi | MPSC Subjects in…
- Talathi Bharti Previous Year Question Papers with…
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
प्रदूषण वर मराठी निबंध | Pollution Essay in Marathi | प्रदूषण एक समस्या निबंध
प्रदूषण या जगातील एक वाढती समस्या आहे प्रदूषण एक समस्या निबंध आणि या विषया वर हा निबंध लिहला आहे. हा प्रदूषण वर मराठी निबंध (Pollution Essay in Marathi) तुम्हाला नक्की पसंद पडेल.
सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.
प्रदूषण निबंध
प्रदूषण निबंध pdf.
भारतीय माणूस व्यक्तिगत स्वच्छतेचा जेवढा विचार करतो, त्याच्या शतांशाने देखील तो सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. स्वतःच्या घरातील कचरा तो रस्त्यावर टाकतो. पानाच्या पिचकाऱ्या टाकतो वा निरुपयोगी कागदांचे कपटे कोठेही फेकून देतो. आपल्याकडील भाजीविक्रीच्या मंडया या कचऱ्याच्या ढिगांनी भरलेल्या दिसतात. हे सारे हवेच्या प्रदूषणाला आमंत्रण ठरते. त्यामुळे निसर्गाचा समतोल आपण बिघडवत आहोत , याची आम्हांला जाणीवच नसते.
कारखान्यांमुळे वायुप्रदूषण होते. तसेच, कारखान्यातील दूषित, मलीन पाण्यामुळे नद्या व समुद्र यांचे पाणी दूषित होते. समुद्रातील या दूषित पाण्यामुळे त्यातील मासे प्रचंड प्रमाणात मरतात. नद्यांतील पाणी दूषित झाल्यामुळे पिण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी ते निरुपयोगी ठरत आहे. पाणी दूषित झाल्यावर ते स्वच्छ करण्याचा आटापिटा करण्याऐवजी ते दूषित न होण्याची काळजी आपण घ्यायला नको का?
हवा, पाणी यांबरोबर ' ध्वनिप्रदूषण ' ही आज एक मोठी ज्वलंत समस्या ठरली आहे. विशेषत: शहरांतील गर्दी, गोंगाट यांमुळे ध्वनिप्रदूषण वाढत आहे. आपली उत्सवप्रियता फार अजब आहे. हे सारे उत्सव ध्वनिवर्धकांबाचून साजरे होत नाहीत. मोठमोठ्या आवाजात गाणी लावणे, बँड वाजवणे, अँटमबॉम्बसारखे मोठ्या आवाजाचे फटाके लावणे व शहरांतील वाहनांची वाढती संख्या यांमुळे ध्वनिप्रदूषण व हवेचे प्रदूषण होते. प्लास्टिकच्या पिशव्या व शहरात तयार होणारा घनकचरा ही एक वेगळीच डोकेदुखी झाली आहे.
पृथ्वीच्या भोवती असलेल्या वायूंच्या आवरणात ओझोन वायूचा एक थर आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी हा वायू आवश्यक आहे. पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. हा वायु ओझोनवर अतिक्रमण करीत आहे आणि या हल्ल्यात ओझोन नष्ट झाला, तर सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण पृथ्वीवर येतील ब येथील जीवसृष्टी पार नष्ट होईल, अशी भीती वाटते.
या प्रदूषणांवर उपाय म्हणून समाजाने म्हणजेच सरकारने काही ठाम निर्णय घेतले पाहिजेत आणि व्यक्तिगत पातळीवर आपण प्रत्येक नागरिकाने आपल्या काही सवयी बदलल्या पाहिजेत. झाडे तोडणे हा सरकारने मनुष्यबधाइतकाच गंभीर गुन्हा मानला पाहिजे. कारखान्यांतून व वस्त्यांतून वाहून येणाऱ्या सांडपाण्यावर सक्तीने प्रक्रिया करायला लावले पाहिज. अशा तर्हेने प्राप्त झालेले पाणी बागेसाठी, शेतीसाठी वा गाड्या धुण्यासाठी वापरता येऊ शकते. प्लास्टिकच्या वापरावर कठोर बंधने आणली पाहिजेत. आपणही प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरण्याची सवय लावून घतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धक वापरण्यास बंदीच घातली पाहिजे. आनंद व्यक्त करण्याच्या आपल्या पद्धतीतही आपण बदल केला पाहिजे.
ध्वनिवर्धकावर गाणी वाजवणे वा फटाके वाजवणे या प्रकारांनीच आनंद व्यक्त होता, हे आपण विसरले पाहिजे. शाळा-महाविद्यालयंनी जवळपासच्या उघड्याबोडक्या डोंगरांवर, मोकळ्या जागी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे उपक्रम : राबवले पाहिजेत. हे सर्ब कठीण वाटले तरी आपण केले पाहिजे; कारण आता आपल्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे.
प्रदूषण मराठी निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Click Here To Download
तुम्हाला प्रदूषण वर मराठी निबंध (Pollution Essay in Marathi) कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.
पाणी वाचवा मराठी निबंध
झाडाचे महत्त्व मराठी निबंध
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध
अंधश्रद्धा मराठी निबंध
You might like
Post a comment, contact form.
Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या
- Chetan Jasud
- January 30, 2023
- मराठी निबंध , Trending
Essay on Pollution in Marathi आपण ह्या पोस्टमध्ये, प्रदूषण वर आधारित निबंध – प्रदूषण एक जागतिक समस्या हा निबंध पहाणार आहोत. प्रदूषण हि एक जगाला भेडसावणारी महत्वाची समस्या आहे, ह्या गोष्टीचा मानवजातीवर खूप परिणाम होत आहेत. Essay on Pollution in Marathi मध्ये आपण बहुतांश समस्या आणि निवारण यावर बोलणार आहोत.
सध्या जगासमोर थैमान घालणारी एक समस्या आहे ती म्हणजे प्रदूषण, याला पर्यावरणीय प्रदूषण असेही म्हणतात. प्रदूषण म्हणजे कोणताही पदार्थ (घन, द्रव किंवा वायू) किंवा ऊर्जा कोणत्याही स्वरूपात (जसे की उष्णता, ध्वनी किंवा किरणोत्सारी) वातावरणात पुनर्वापर, निरुपद्रवी स्वरूपात साठवून किंवा विघटित करण्यापेक्षा वेगाने सोडणे होय. .
खरंतर प्रदूषण ही आपल्या जीवनातील एक प्रमुख समस्या आहे, ज्याचा आपल्या पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. हा एक मुद्दा आहे ज्यावर दीर्घकाळ चर्चा होत आहे आणि त्याचे घातक परिणाम 21 व्या शतकात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. आणि याचे परिणाम रोखण्यासाठी विविध देशांच्या सरकारांनी अनेक मोठी पावले उचलली असली तरी अजून मात्र ही समस्या मोठया प्रमाणात भेडसावत आहे.यामुळे अनेक नैसर्गिक जीवांना त्रास होतो. एवढेच नाही तर आज अनेक वनस्पती आणि प्राणी एकतर नामशेष झाले आहेत किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
प्रदूषणाच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाल्यामुळे, प्राणी केवळ त्यांचे घरच नाही तर राहण्यासाठी निसर्ग देखील गमावत आहेत. जगभरातील अनेक प्रमुख शहरांवर प्रदूषणाचा परिणाम झाला आहे. यातील बहुतांश प्रदूषित शहरे भारतातच आहेत. जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली, कानपूर, बामेंडा, मॉस्को, हेझ, चेरनोबिल, बीजिंग यांचा समावेश आहे. या शहरांनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अनेक पावले उचलली असली तरी त्यांना अजून बराच .पल्ला गाठायचा आहे. या ठिकाणची हवेची गुणवत्ता खराब असून जमीन आणि जलप्रदूषणाची प्रकरणेही वाढत आहेत. या शहरांतील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आताच्या प्रशासनाने ठोस धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.
एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) हा एक निर्देशांक आहे जो सरकारी एजन्सीद्वारे वायू प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी वापरला जातो जेणेकरुन सामान्य लोकांना हवेच्या गुणवत्तेची जाणीव होऊ शकेल. जसजसा AQI वाढतो, त्याचा अर्थ असा होतो की मोठ्या लोकसंख्येला आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होणार आहेत.
एअर क्वालिटी इंडेक्स ( AQI ) लोकांना स्थानिक हवेच्या गुणवत्तेचा त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यात मदत होते. पर्यावरण संरक्षण एजन्सी (EPA) पाच प्रमुख वायू प्रदूषकांसाठी AQI ची गणना करते ज्यासाठी सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय वायु गुणवत्ता मानके स्थापित केली गेली आहेत.
प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी विविध शहरांचे अधिकारी प्रयत्नशील असले तरी अशा परिस्थितीत या प्रक्रियेत हातभार लावणे हे नागरिकांचे आणि सर्वसामान्यांचे कर्तव्य आहे. सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी खालील काही महत्वाचे उपाय आहेत.
फटाके वापरणे थांबवा: जेव्हा तुम्ही दसरा, दिवाळी किंवा इतर कोणतेही सण साजरे करता तेव्हा फटाक्यांना नाही म्हणा. त्यामुळे ध्वनी, माती तसेच प्रकाश प्रदूषण होते. तसेच त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
वाहनांच्या वापरावर मर्यादा घाला : वाहने हे प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. वाहनांचा वापर कमीत कमी करा. शक्य असल्यास, वैयक्तिक वापरासाठी त्यांना इलेक्ट्रिक वाहनांसह बदलण्याचा प्रयत्न करा. प्रवासासाठी शक्य तितक्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.
आपला परिसर स्वच्छ ठेवा : एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कचरा इकडे-तिकडे टाकण्यापेक्षा तो डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे.
रीसायकल आणि पुनर्वापर – अनेक नॉन-बायोडिग्रेडेबल उत्पादने जसे की प्लास्टिकपासून बनवलेल्या दैनंदिन वापरातील वस्तू आपल्या पर्यावरणाला हानी पोहोचवतात. आम्हाला त्यांचे योग्य प्रकारे विघटन करावे लागेल किंवा पुनर्वापरासाठी पाठवावे लागेल. आजकाल, सरकार प्लॅस्टिकच्या पुनर्वापरासाठी अनेक योजना राबवत आहे, जेथे नागरिक केवळ त्यांच्या प्लास्टिकचा कचरा दान करू शकत नाहीत, तर इतर वस्तूंसाठी त्याची देवाणघेवाण देखील करू शकतात.
झाडे लावा: रस्त्यांचे रुंदीकरण, घरे बांधणे आदी विविध कारणांमुळे झाडे तोडल्याने विविध प्रकारचे प्रदूषण वाढले आहे. वातावरणातील कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड इत्यादी हानिकारक वायू वनस्पती शोषून घेतात. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेदरम्यान ते ऑक्सिजन सोडत असल्याने, आपल्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे आणि त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
प्रदूषण ही अशीच एक समस्या आहे जी आपण लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहे जेणेकरून मानव या ग्रहावर सुरक्षितपणे जगू शकतील. ही समस्या टाळण्यासाठी आम्ही सुचवलेल्या उपायांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. आपले घर राहण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवणे ही आपली जबाबदारी आहे. पृथ्वी जिवंत ठेवायची असेल तर तिचे प्रदूषण थांबवले पाहिजे.
मराठी निबंध- प्रदूषण (कमी शब्दात)
प्रदूषण म्हणजे पर्यावरणातील हानिकारक पदार्थ किंवा कचऱ्याची उपस्थिती, ज्यामुळे सजीवांना आणि नैसर्गिक जगाला हानी पोहोचते. हे पदार्थ रसायने, वायू किंवा अगदी आवाज असू शकतात. कारखाने, कार आणि घरातील कचरा यासारख्या अनेक स्रोतांमधून प्रदूषण होऊ शकते.
प्रदूषणाचे परिणाम गंभीर आणि व्यापक आहेत. यामुळे लोक आणि प्राणी दोघांच्याही आरोग्याच्या समस्या, नैसर्गिक अधिवासांचे नुकसान आणि जैवविविधतेचे नुकसान होऊ शकते. याव्यतिरिक्त, प्रदूषणामुळे पिके आणि अन्न पुरवठ्यालाही हानी पोहोचू शकते, ज्यामुळे अन्न सुरक्षा आणि संसाधनांच्या प्रवेशामध्ये आणखी समस्या निर्माण होतात.
प्रदूषणाचा सामना करण्यासाठी, व्यक्ती आणि सरकार कारवाई करू शकतात. उदाहरणार्थ, लोक कचरा कमी करून आणि संसाधनांचे संरक्षण करून स्वतःचा प्रभाव कमी करू शकतात, तर सरकार उद्योगांचे नियम तयार करू शकतात आणि प्रदूषण कमी करण्यासाठी कायदे लागू करू शकतात. स्वच्छ तंत्रज्ञान आणि पुनर्निर्मिती करता येणारे म्हणजेच रिनेव्हेबल ऊर्जा स्रोत देखील प्रदूषण पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.
प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, कारण ते पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सध्याच्या पिढीला पुरेल इतके संसाधनांचा वापराची चालना देण्यासाठी पावले उचलून, आम्ही स्वतःसाठी आणि ग्रहासाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करू शकतो.
Essay on Pollution in Marathi । प्रदूषण- एक जागतिक समस्या – मित्रानो आशा आहे कि तुम्हाला वरील निबंध नक्की आवडले असतील. जर तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवे असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की सुचवा.
फटाके वापरणे थांबवा: जेव्हा तुम्ही दसरा, दिवाळी किंवा इतर कोणतेही सण साजरे करता तेव्हा फटाक्यांना नाही म्हणा. त्यामुळे ध्वनी, माती तसेच प्रकाश प्रदूषण होते. तसेच त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वाहनांच्या वापरावर मर्यादा घाला : वाहने हे प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. वाहनांचा वापर कमीत कमी करा. शक्य असल्यास, वैयक्तिक वापरासाठी त्यांना इलेक्ट्रिक वाहनांसह बदलण्याचा प्रयत्न करा. प्रवासासाठी शक्य तितक्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आपला परिसर स्वच्छ ठेवा : एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कचरा इकडे-तिकडे टाकण्यापेक्षा तो डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे. रीसायकल आणि पुनर्वापर : अनेक नॉन-बायोडिग्रेडेबल उत्पादने जसे की प्लास्टिकपासून बनवलेल्या दैनंदिन वापरातील वस्तू आपल्या पर्यावरणाला हानी पोहोचवतात. आम्हाला त्यांचे योग्य प्रकारे विघटन करावे लागेल किंवा पुनर्वापरासाठी पाठवावे लागेल. आजकाल, सरकार प्लॅस्टिकच्या पुनर्वापरासाठी अनेक योजना राबवत आहे, जेथे नागरिक केवळ त्यांच्या प्लास्टिकचा कचरा दान करू शकत नाहीत, तर इतर वस्तूंसाठी त्याची देवाणघेवाण देखील करू शकतात.
इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :
१. शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer
२. माझा आवडता नेता निबंध-हिंदुहृदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे
३. झाडे लावा झाडे जगवा निबंध Zade Lava Zade Jagva Essay in Marathi
४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये
मी एक पूर्ण-वेळ डिजिटल मार्केटर आणि अर्धवेळ ब्लॉगर आहे ज्याला लिहायची, प्रवासाची तसेच या टेकनॉलॉजीच्या युगात अपडेटेड राहायची आवड आहे.
Related articles
- मराठी निबंध
New Rakshabandhan Essay in Marathi । रक्षाबंधन मराठी निबंध
- May 7, 2023
- मराठी स्पेशल
Baby Girl Names in Marathi Starting A to Z | 700+ Unique Marathi
- April 1, 2023
माझा आवडता खेळाडू-महेंद्रसिंग धोनी मराठी निबंध
- February 5, 2023
वाढती लोकसंख्या Loksankhya Vadh : मराठी निबंध
शेतकरी जगाचा पोशिंदा,शेतकरी निबंध मराठीमध्ये Essay on Farmer
- January 28, 2023
- इंग्रजी प्रो
Quarter Meaning in Marathi | Quarterly meaning in Marathi
- January 27, 2023
वाढते प्रदूषण निबंध मराठी Essay On Pollution In Marathi
Essay On Pollution In Marathi – Vehicle Pollution Essay in Marathi वाढते प्रदूषण निबंध मराठी वाहन प्रदूषण निबंध आज आपण या लेखामध्ये वाहन प्रदूषण या विषयावर निबंध लिहिणार आहोत. सध्याच्या आधुनिक काळामध्ये वाहनांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आपण जिकडे पाहू तिकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारची वाहने पाहायला मिळतात. आपल्याला सर्वांना प्रश्न पडतो कि वाहन प्रदूषण म्हणजे काय, पण वाहन प्रदूषण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वाहनांच्या मधून येणाऱ्या प्रदूषित धुरामुळे पर्यावरणातील वातावरण बिघडते किंवा हवा अशुध्द होते किंवा मग वायू प्रदूषण होते आणि त्यालाच वाहन प्रदूषण (vehicle pollution) म्हणतात.
कोणत्याही प्रकारची वाहने जसे कि दुचाकी, चारचाकी, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या असतात आणि त्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ये जा करण्यासाठी, मालाची वाहतूक करण्यासाठी तसेच इतर कामांच्यासाठी उपयुक्त असल्या तरी हि वाहने आपल्यासाठी तितकीच घटक देखील असतात.
वाढते प्रदूषण निबंध मराठी – Essay On Pollution In Marathi
Pollution essay in marathi.
सध्या जगामध्ये तसेच भारतामध्ये देखील वाहनांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि वाहनाशिवाय मनुष्याला जगणे मुश्कील झाले आहे आणि जगातील प्रत्येक मनुष्याला वाहन वापरल्याशिवाय कोणतेच काम करता येत नाही म्हणजेच मनुष्याला वाहची खूप सवय लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहनांच्या वापरामध्ये झपाट्याने वाढ होत गेली आणि वापरात असणाऱ्या वाहनांची संख्या हि २०२० मध्ये १.४ अब्ज इतकी झाली आणि सध्या त्यापेक्षा अधिक झाली असावी.
अश्या प्रकारे दिवसेंदिवस वाहनांचा वापर हा वाढतच चालला आहे. वाहनांच्या अधिक वापरामुळे वायू प्रदूषण म्हणजेच हवा प्रदूषण तर होताच आहे परंतु वाहनाच्या अति वापरामुळे नैसर्गिक इंधन देखील खूप संपत आहे म्हणजेच वाहने चालण्यासाठी त्यामध्ये पेट्रोल, डीझेल घालावे लागते आणि हे दोन्हीहि नैसर्गिक इंधन आहे.
वाहनांच्या मधून बाहेर पडणारा धूर हा हवे मध्ये मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड बाहेर टाकते आणि त्यामुळे हवेचे प्रधुषण होते म्हणजेच हवेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात असतो आणि याचा परिणाम मनुष्याच्या शरीरावर होऊ शकतो म्हणजे प्रत्येक मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजन महत्वाचा असतो म्हणजेच आणि हा ऑक्सिजन आपल्याला शुध्द हवेपासून मिळत असतो.
आणि आपण हवेतील ऑक्सिजन घेवून कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडतो पण सध्या वाहनांच्या मुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे वातावरणातील सर्व हवा अशुध्द झाली आहे आणि लोकांना अनेक तब्येतीच्या तक्रारीला सामोरे जावे लागत आहे. वाहने हि वायू प्रदूषणाची मुख्य स्त्रोत्र आहेत आणि वाहनांच्या मुळे वायू प्रदूषण हे कोणकोणत्या कारणामुळे होत असे तर ते वाहनांच्या अपुऱ्या देखभाली मुळे, वाहनांच्या मध्ये असणारे जुने ऑटोमेटीव्ह तंत्रज्ञान, जुनी वाहने, २ स्ट्रोक इंजिन, खराब रस्ता या वाहनांच्या कारणांच्या मुळे वायू प्रदूषण होते.
तसेच वाहनांच्या मधून बाहेर पडणारा कार्बन मोनोऑक्साईड हा देखील एक प्रदूषणाचा स्त्रोत्र आहे ज्यामुळे रंगहीन आणि गंधहीन वायू निर्माण होतो. तसेच कार्बन मोनोऑक्साईड हा आपल्या शावासाद्वारे आपल्या शरीरामध्ये गेला तर आपल्याला हृदयाला, मेंदूला आणि शरीराच्या काही इतर अवयवांना ऑक्सिजनची वाहतूक रोखली जाते. त्याचबरोबर कार ट्रक, गॅस पंप आणि इतर संबंधित स्त्रोतांमधून सल्फर डायऑक्साइड उत्सर्जित होतो.
सल्फर डायऑक्साइड हे वातावरणात सोडले जाणारे आणखी एक प्रमुख प्रदूषक आहे. वाहनांच्या मुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते आणि याचा परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर तसेच निसर्गावर देखील होतो. सध्या आपण सामोरे जात असलेला एक प्रदूषणाचा परिणाम म्हणजे ग्लोबल वर्मिग. या यामुळे मनुष्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे म्हणजेच वातावरणामध्ये अचानक बदल घडून आलेले दिसतात, तसेच एकाद्या वर्षी खूप जास्त पाऊस पडतो किंवा एकाद्या वर्षी काहीच पाऊस पडत नाही, भूकंप , वादळ, सुनामी यासारख्या अनेक नैसर्गिक समस्यांना मनुष्याला सामोरे जावे लागते आहे.
Vehicle Pollution Essay in Marathi
वाहनांच्या प्रदूषणामध्ये मोटार वाहने किंवा कोणत्याही ऑटोमोबाईलद्वारे पर्यावरणामध्ये हानिकारक धूर आणि इतर सामग्रीचा समावेश होतो. प्रदूषक म्हणून ओळखल्या जाणार्या या पदार्थांचे मानवी आरोग्यावर आणि सामान्य परिसंस्थेवर अनेक वाईट परिणाम होतात. शहरी भागामध्ये वाहनांच्यामुळे होणारे वायू प्रदूषण हे जास्त प्रमाणात आहे कारण ग्रामीण भागामध्ये वाहने वापराचे प्रमाण हे खूप कमी असते आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये वायू प्रदूषण हे खूप कमी असते.
मोठ्या महानगरांमधील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचे मुख्य कारण उद्योगांव्यतिरिक्त वाहनाद्वारे होणारे प्रदूषण आहे. अधिक लोक लहान शहरांमधून मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत असल्याने, वाहनांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होत आहे. मोठ्या शहरांमध्ये विविध आजार वाहनांच्या प्रदूषणामुळे होत आहेत.
आपण जरी वायू प्रदूषण पूर्णपणे नष्ट करू शकत नसलो तरी आपण त्याचे प्रमाण कमी करू शकतो. म्हणजेच गाड्यांचा वापर हा गरजेनुसार केला पाहिजे तसेच आपण जास्त प्रमाणात झाडे लावली पाहिजेत कारण झाड हे माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे कारण झाड आपल्याला ऑक्सिजन देते आणि गाड्यांच्या मधून येणारा कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेते त्यामुळे वातावरण शुद्ध राहते.
पण आपल्याला जर शुद्ध वातावण हवे असेल तर झाडे लावणे गरजेचे आहे कारण ते दुषित वायू शोषून घेवून त्याचे रुपांतर ऑक्सिजन मध्ये करतात आणि आपल्याला शुद्ध हवा देतात म्हणूनच आपल्या आजूबाजूला झाडांची हिरवळ असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच ग्रामीण भागामध्ये झाडे जास्त असल्यामुळे तेथील हवा शुध्द असते. सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
म्हणजेच बसेसची संख्या वाढवली आहे, विविध शहरांमध्ये मेट्रो, पायाभूत सुविधांचा विकास, रस्त्यांच्या जाळ्यात सुधारणा. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वाहनाचा प्रचार करणे तसेच इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्यांच्या जास्त वापर करणे. मोठ्या शहरातून जुनी किंवा जास्त प्रदूषित वाहने बाहेर काढणे त्यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी होयील. अश्या प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण वाहनांच्या मुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अश्या प्रकारे आपण वाहनांच्यामुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्याचा सर्व बाजूनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे आपल्यावर येणाऱ्या नैसर्गिक संकटांचा म्हणजेच भूकंप, सुनामी, पर्यावरनामध्ये होणारे बदल या सारख्या सर्व गोष्टींचा धोका कमी केला पाहिजे. अश्या प्रकारे आपण आपला निसर्ग जपला पाहिजे आणि आपले चांगले आयुष्य घडवले पाहिजे.
आम्ही दिलेल्या vehicle pollution essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर वाढते प्रदूषण निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Essay On Pollution In Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि vehicle pollution essay in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट
Share this:
Leave a comment उत्तर रद्द करा..
पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.
Notify me of follow-up comments by email.
Notify me of new posts by email.
ध्वनी प्रदूषण मराठी निबंध | noise pollution essay in marathi
नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये ध्वनी प्रदूषण या विषयी मराठी निबंध लिहिला आहे. ही माहिती तुम्ही ध्वनी प्रदूषण मराठी निबंध , noise pollution essay in marathi , essay on noise pollution in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.
Table of Contents
ध्वनी प्रदूषण म्हणजे कर्कश आवाज किंवा ज्याची तीव्रता जास्त आहे असा होय. जो आवाज गाडीचा हॉर्न , कारखान्यातील मशिनरीचा आवज किंवा जेट विमानाचा आवाज असू शकतो . जेव्हा आपण झोपलेले असू किंवा एवढ्या व्याख्यांना मध्ये मग्न असू अश्यावेळी आपल्या कामामध्ये अडथळा आणणारा आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण होय.
इ स. १९७२ पासून जागतिक आरोग्य संघटनेने ध्वनि प्रदूषण हे एक प्रदूषण होण्या मागचे प्रमुख कारण जाहीर केले आहे.
औद्योगिक प्रदूषण
ज्यामध्ये बांधकामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारी अवजड यंत्रसामग्री, खाणकामाची उपकरणे, खोदकाम करणारी उपकरणे, जनरेटर, ग्राइंडर, रस्ते दुरुस्ती उपकरणे आणि गिरण्यांचा समावेश होतो.
वाहतुकीचा आवाज
ज्यामध्ये वाहने , विमाने, रेल्वे आणि मास ट्रान्झिट यांचा समावेश आहे. खराब शहरी नियोजनामुळे वाहनांचा आवाज वाढतो, ज्यामुळे ट्रॅफिक जाम आणि इतर गंभीर समस्या निर्माण होतात.
शेजारी किंवा आजूबाजूंचा आवाज
मोठ्या आवाजात संगीत, इलेक्ट्रॉनिक्स, क्रीडा कार्यक्रम, मैफिली, राजकीय रॅली, घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स, पार्ट्या आणि मैदानी मेळे इ. सुद्धा मोट्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करण्यास हातभार लावतात.
ध्वनी प्रदूषण ही गंभीर समस्या का आहे?
माणसाचे कान अतिशय संवेदनशील आहे. आमच्या जागरणाच्या वेळेत, ते नेहमी कार्यरत असते. श्रवणविषयक माहितीसाठी हे सतत खुले माध्यम आहे. आपले शरीर सतत आवाजाला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते जसे की कोणी आपणास पाठीमागून आवाज दिला किंवा आपले लक्ष दुसरीकडे असताना देखील आपण दाद देतो, ज्याची आपल्याला सवय झाली आहे. आपण झोपत असतानाही कान हे आवाज ग्रहण करत असतात जे मेंदूद्वारे प्रक्रिया करतात ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयाची गती वाढू शकते. मोठ्या आवाजामुळे आतील कानाचे नुकसान होऊ शकते आणि कायमचे श्रवण कमी होऊ शकते, ज्यामुळे संभाषण आणि आपण रोज करणारी कामे अधिक कठीण होतात.
आवाजाच्या जास्त किंवा दीर्घकाळापर्यंत प्रदर्शनामुळे विविध प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ध्वनी प्रदूषणावरील अभ्यासावरून असे दिसून येते की त्याचा आरोग्याच्या प्रतिकूल परिस्थितींमध्ये परिणाम होतो. उदरणार्थ उच्च रक्तदाब, श्रवण कमी होणे, झोप न लागणे, तणाव, चिंता, नैराश्य, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि प्रौढांमधील उत्पादकता कमी होणे. मुलांमध्ये, उच्च पातळीचा आवाज त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर तसेच त्यांच्या वर्तनावर आणि शिकण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकतो.
कर्कश आवाज हा फक्त उपद्रव नाही, तर तो आरोग्यासाठीदेखील धोकादायक आहे, ज्यामुळे श्रवण कमी होणे, हायपरॅक्युसिस (सामान्य आवाज पातळी असहिष्णुता) आणि गैर-श्रवणविषयक आरोग्यावर परिणाम होतो: तणाव संप्रेरकांमध्ये वाढ, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि त्यामुळे होणारे मृत्यू उध्दभवू शकतात.
जागतिक आरोग्य संघानेचे असे म्हणणे आहे कि , “पर्यावरणातील कर्कश आवाजाच्या संपर्कात आल्याने लोकसंख्येवर विपरित परिणाम होतो , याचे पुरावे देखील यांच्याकडे आहेत.” त्याचप्रमाणे वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण हे प्रथम आणि ध्वनी प्रदूषण हे दुसऱ्या क्रमांकाचे अतिशय घातक असे प्रदूषण आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
ध्वनी प्रदूषण कोणासाठी धोकादायक आहे ?
कारखान्यातील कामगार पक्षी जेष्ट नागरिक नवजात बालके झाडे आणि वनस्पती
धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला ध्वनी प्रदूषण मराठी निबंध , noise pollution essay in marathi , essay on noise pollution in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
वायू प्रदूषण मराठी माहिती – उपाय, परिणाम, कारणे, PDF
Table of Contents
वायू प्रदूषण मराठी माहिती Air Pollution Information in Marathi
- डिजिटल स्वाक्षरी माहिती
- डिजिटल बँकिंग बद्दल माहिती
- दुर्गा स्तोत्र मराठी
- महालक्ष्मी स्तोत्र मराठी
- गर्भवती आहार चार्ट मराठी
- वजन वाढवण्यासाठी आहार तक्ता
वायू प्रदूषणाचे मानवावर होणारे परिणाम Effects of Air Pollution on Human Health
वायू प्रदूषणाची कारणे causes of air pollution.
- रामरक्षा स्तोत्र मराठी
- गणपती स्तोत्र मराठी
- कलौंजी मराठी माहिती
- कबड्डी ची माहितीे
वायू प्रदूषण कमी करण्याचे उपाय How to Reduce Air Pollution
- सरकारने अशी धोरणे बनवावीत की कर्मचारी घरून काम करतील. आठवड्यातून फक्त एक दिवस ऑफिसला जा. आणि आता माहिती तंत्रज्ञानाच्या आगमनाने हे देखील शक्य झाले आहे. उदाहरणार्थ, यूएस कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे 35% लोक आठवड्यातून फक्त एक दिवस कार्यालयात जातात. बाकीची कामे घरी बसून करा. त्यामुळे त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्चही होत नाही आणि वायू प्रदूषणही वाढत नाही. ये-जा करताना लागणारा वेळ हे लोक इतर कामांसाठी वापरतात.
- अधिकाधिक सायकल वापरा.
- सार्वजनिक वाहतूक वापरा.
- मुलांना गाडीने शाळेत सोडू नका, तर त्यांना शाळेच्या वाहतुकीत जाण्यासाठी प्रोत्साहित करा.
- तुमच्या घरातील लोकांना कारपूल तयार करण्यास सांगा जेणेकरून ते त्याच कारने ऑफिसला जाऊ शकतील. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणही कमी होईल.
- तुमच्या घराभोवती झाडे आणि रोपांची योग्य काळजी घ्या
- गरज नसताना वीज वापरू नका.
- ज्या खोलीत कूलर फॅन किंवा एअर कंडिशन आवश्यक असेल ती खोली चालवा, बाकीची जागा बंद ठेवा.
- तुमच्या बागेत कोरडी पाने असल्यास, त्यांना जाळू नका, परंतु त्यातून खत तयार करा.
- दर तीन महिन्यांनी तुमच्या कारचे प्रदूषण तपासा.
- फक्त शिसे मुक्त पेट्रोल वापरा. बाहेरच्या तुलनेत घरांमध्ये प्रदूषणाचा प्रभाव कमी असतो, त्यामुळे जेव्हा प्रदूषण जास्त असेल तेव्हा घराच्या आत जा.
कबड्डी ची माहितीे Kabaddi Information in Marathi
लस घेतल्या नंतर काय खबरदारी घ्यावी Precautions After COVID19 Vaccine in Marathi
Leave a reply cancel reply.
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Dussehra Wishes in Marathi दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी 2023
सुप्रभात मराठी शुभेछा | Good Morning Quotes in Marathi
होळीच्या शुभेच्छा मराठी संदेश, इमेज, होळी सणाची माहिती
गणपती आरती Ganpati Arti in Marathi
गुरु पौर्णिमा 2023 Guru Purnima Quotes in Marathi
खजूर खाण्याचे फायदे | Khajur Benefits in Marathi
- Health Tips
- Recipe in Marathi
Latest Posts
गणपती स्तोत्र मराठी ganpati stotra in marathi, श्री महालक्ष्मी स्तोत्र मराठी mahalaxmi stotra in marathi, durga stotra in marathi दुर्गा स्तोत्र मराठी 2023.
मराठीत प्रदूषणावर निबंध | Essay on Pollution in Marathi
Essay on Pollution in Marathi :प्रदूषण हा शब्द ऐकताच आपल्या मनात विविध प्रकारचे प्रश्न धावू लागतात आणि आपण इतके घाबरून जातो की आता या समस्येवर निदान काहीतरी उपाय तरी सापडेल. आपला देश नेहमीच नैसर्गिक आपत्ती, जागतिक महामारी, प्रदूषण इत्यादी गंभीर समस्यांना तोंड देत आला आहे.
शहरातील प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. प्रदूषणाने शहरांवर इतके वर्चस्व गाजवले आहे की आता तेथे राहणाऱ्या लोकांसाठी यातून सुटणे म्हणजे सिंहाच्या पिंजऱ्यातून जिवंत होणे होय. प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत, ज्यांचे हिंदीतील प्रदूषणावरील निबंधात तपशीलवार वर्णन केले आहे. पूर्ण पोस्ट वाचा.
Table of Contents
मराठीत प्रदूषणावर निबंध | Essay on Pollution in Marathi (300 शब्दात)
आपल्या कोणत्या कार्यामुळे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे आणि पर्यावरणात असंतुलन पसरत आहे हे आपण प्रथम जाणून घेतले पाहिजे.
पूर्वी माझ्या गावात अनेक तलाव असायचे, पण आता एकही नाही. आज आपण आपले घाणेरडे कपडे धुवून, जनावरांना आंघोळ घालणे, दूषित व सांडपाणी, कचरा इत्यादी तलावात टाकून ते घाण केले आहे. आता त्याचे पाणी कुठेही आंघोळीसाठी किंवा पिण्यास योग्य नाही. त्याचे अस्तित्वच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
प्रदूषण म्हणजे काय?
आपल्या देशात प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे या वस्तुस्थितीबद्दल आपण सर्वजण चिंतित आहोत. मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या अधिक वाढली आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांवर प्रदूषणाने इतके वर्चस्व गाजवले आहे की आता त्यांचे आरोग्यही बिघडू लागले आहे. त्यामुळेच शहरांमधील वाढते प्रदूषण पाहता आता तेथील लोकांमध्ये प्रदूषणाबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. प्रदूषणामुळे केवळ मानवच नाही तर झाडे, झाडे, प्राणी, हवा, पाणी, माती, अन्न आणि पेय इत्यादी सर्व नैसर्गिक गोष्टींचे नुकसान होत आहे. नैसर्गिक घटना , आपत्ती, साथीचे रोग इत्यादींना वेळोवेळी आपला रोष दाखविण्यासाठी प्रदूषणाला जबाबदार धरणे चुकीचे ठरणार नाही.
प्रदूषणाचे परिणाम आणि प्रतिबंध
प्रदूषणामुळे निसर्गाची आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. प्रदूषणाचा विपरीत परिणाम जगातील सर्व नैसर्गिक गोष्टींवर दिसून येतो. प्रदूषणामुळे निसर्गातही असंतुलन निर्माण होत आहे. अनेक कारणांनी मिळून प्रदूषणाला जन्म दिला आहे. जंगल आणि झाडे सतत कमी होण्याचे कारण देखील प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण आहे. प्रदूषण कमी करायचे असेल तर अधिकाधिक झाडे लावून प्रदूषणावर विजय मिळवला पाहिजे. प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या गावांचे रक्षण करावे लागेल, तेथील हिरवळ नष्ट होऊ नये आणि शुद्ध हवा आणि पाणी दूषित होण्यापासून वाचवावे लागेल. या छोट्याशा प्रयत्नांमुळे आपण प्रदूषण दूर करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करू शकू.
प्रदूषण रोखणे फार महत्वाचे आहे. पर्यावरण प्रदूषण ही आजची मोठी समस्या आहे, ती वेळीच रोखली नाही तर संपूर्ण विनाशापासून कोणीही वाचवू शकणार नाही. पृथ्वीवरील कोणताही प्राणी त्याच्या प्रभावापासून अस्पर्श राहू शकत नाही. आपल्यामुळे झाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी इत्यादींचे जीवन धोक्यात आले आहे. त्यांच्या जीवाचेही रक्षण केले पाहिजे. त्यांच्या अस्तित्वामुळेच आपले अस्तित्व शक्य आहे.
मराठीत प्रदूषणावर निबंध | Essay on Pollution in Marathi (500 शब्दात)
आजच्या काळात प्रदूषण ही जागतिक समस्या बनली आहे. यामुळे आपली पृथ्वी पूर्णपणे बदलली आहे आणि दिवसेंदिवस पर्यावरणाची हानी होत आहे, ज्यामुळे आपले जीवन आणखी कठीण होत आहे. प्रदूषणाच्या या घातक परिणामांमुळे अनेक प्रकारचे जीव आणि प्रजाती हळूहळू नामशेष होत आहेत.
प्रदूषणाचे प्रकार
- वायू प्रदूषण
वायू प्रदूषण हे सर्वात धोकादायक प्रदूषण मानले जाते, या प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे उद्योग आणि वाहनांमधून निघणारा धूर. या स्त्रोतांमधून निघणाऱ्या हानिकारक धुरामुळे लोकांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. दिवसेंदिवस वाढणारे उद्योग आणि वाहने यामुळे वायू प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. ज्यामुळे ब्राँकायटिस आणि फुफ्फुसांशी संबंधित अनेक आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत.
उद्योग आणि घरांमधील कचरा कधीकधी नद्या आणि इतर जलकुंभांमध्ये मिसळतो, ज्यामुळे ते प्रदूषित होते. एकेकाळी स्वच्छ आणि पवित्र मानल्या जाणार्या आपल्या नद्या आज अनेक रोगांचे माहेरघर बनल्या आहेत कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सामग्री, रासायनिक कचरा आणि इतर अनेक प्रकारचा नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा आढळून आला आहे.
- माती प्रदूषण
तो औद्योगिक आणि घरगुती कचरा ज्याची पाण्यामध्ये विल्हेवाट लावली जात नाही, तो जमिनीवर पसरतो. त्याचा पुनर्वापर आणि पुनर्वापर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असले तरी त्यात विशेष यश मिळत नाही. या प्रकारच्या जमिनीच्या प्रदूषणामुळे त्यामध्ये डास, माश्या आणि इतर कीटक वाढू लागतात, ज्यामुळे मानव आणि इतर सजीवांमध्ये अनेक आजार होतात.
- ध्वनी प्रदूषण
कारखान्यांमध्ये चालणाऱ्या मोठ्या आवाजातील यंत्रे आणि इतर मोठा आवाज करणाऱ्या यंत्रांमुळे ध्वनी प्रदूषण होते. यासोबतच रस्त्यावरील वाहनांमुळे निर्माण होणारा आवाज, फटाके फोडणे, लाऊड स्पीकर यामुळे ध्वनिप्रदूषण वाढते. ध्वनी प्रदूषण हे मानवातील मानसिक तणावाचे मुख्य कारण आहे, ज्यामुळे मेंदूवर अनेक दुष्परिणामांसह ऐकण्याची शक्ती देखील कमी होते.
- प्रकाश प्रदूषण
एखाद्या भागात जास्त आणि जास्त प्रकाश निर्मितीमुळे प्रकाश प्रदूषण होते. शहरी भागात प्रकाशाच्या वस्तूंच्या अतिवापरामुळे प्रकाश प्रदूषण होते. गरज नसताना जास्त प्रकाश निर्माण करणाऱ्या वस्तू प्रकाश प्रदूषण वाढवतात, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
- किरणोत्सर्गी प्रदूषण
किरणोत्सर्गी प्रदूषण म्हणजे वातावरणात अवांछित किरणोत्सर्गी घटकांमुळे निर्माण होणारे प्रदूषण. किरणोत्सर्गी प्रदूषण स्फोट आणि शस्त्रे, खाणकाम इत्यादींच्या चाचणीमुळे निर्माण होते. यासोबतच अणुऊर्जा केंद्रांमध्ये कचऱ्याच्या स्वरूपात निर्माण होणारे घटकही किरणोत्सर्गी प्रदूषण वाढवतात.
- थर्मल प्रदूषण
अनेक उद्योगांमध्ये पाण्याचा शीतलक म्हणून वापर केला जातो, जे थर्मल प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तापमानातील बदल, पाण्यात ऑक्सिजनची कमतरता अशा समस्यांना जलचरांना सामोरे जावे लागत आहे.
- व्हिज्युअल प्रदूषण
आपल्या दृष्टीवर परिणाम करणाऱ्या मानवनिर्मित वस्तू दृश्य प्रदूषणात येतात जसे की बिल बोर्ड, अँटेना, डस्टबिन, विजेचे खांब , टॉवर, तारा, वाहने, बहुमजली इमारती इ.
जगातील सर्वात प्रदूषित शहर
एकीकडे जगातील अनेक शहरांनी प्रदूषणाची पातळी कमी करण्यात यश मिळवले आहे, तर काही शहरांमध्ये ही पातळी झपाट्याने वाढत आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत कानपूर, दिल्ली, वाराणसी, पाटणा, पेशावर, कराची, सिजिझुआंग, हेझ, चेरनोबिल, बेमेंडा, बीजिंग आणि मॉस्को या शहरांचा समावेश आहे. या शहरांतील हवेच्या गुणवत्तेची पातळी अत्यंत खालावलेली आहे आणि त्यासोबतच या शहरांतील जल आणि जमीन प्रदूषणाची समस्याही दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे या शहरांतील राहणीमान अत्यंत दयनीय झाले आहे. हीच वेळ आहे जेव्हा लोकांनी शहरांचा विकास करण्याबरोबरच प्रदूषणाची पातळी नियंत्रित करण्याची गरज आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी टिप्स
आता प्रदूषणाची कारणे, परिणाम आणि प्रकार माहित असल्याने ते थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यापैकी काही उपायांचे पालन करून आपण प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवू शकतो.
- फटाक्यांना नाही म्हणा
- रीसायकल/पुनर्वापर
- आपला परिसर स्वच्छ ठेवणे
- कीटकनाशके आणि खतांचा मर्यादित वापर
- कंपोस्ट खत वापरा
- प्रकाशाचा जास्त आणि जास्त वापर न केल्याने
- किरणोत्सर्गी पदार्थांच्या वापराबाबत कठोर नियम बनवून
- कडक औद्योगिक नियम आणि कायदे करून
- योजनाबद्ध करून
प्रदूषणामुळे आपले पर्यावरण दिवसेंदिवस नष्ट होत आहे. हे थांबवण्यासाठी, आपल्या पृथ्वीचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. आताही ही समस्या सोडवण्याऐवजी आपण दुर्लक्ष करत राहिलो तर भविष्यात त्याचे घातक परिणाम आपल्याला भोगावे लागतील.
भारतातील सर्वात प्रदूषित राज्य कोणते आहे?
भारतातील सर्वात प्रदूषित राज्याची राजधानी नवी दिल्ली आहे.
वायू प्रदूषणाचे मुख्य घटक कोणते आहेत?
ऑक्साइड, हायड्रोकार्बन्स, धूलिकण, बाष्प कण, धूर इत्यादी वायु प्रदूषणाचे मुख्य घटक आहेत.
जलप्रदूषणाचे प्रमाण कसे मोजले जाते?
जलप्रदूषणाचे प्रमाण बीओडी (बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड) द्वारे मोजले जाते.
जगातील सर्वात कमी प्रदूषित देश कोणता?
जगातील सर्वात कमी प्रदूषित देश डेन्मार्क आहे.
अंतिम विचार | Finale Thought
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख खूप आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल Essay on Pollution in Marathi आणि त्यासोबत तुम्हाला इतर मनोरंजक माहिती देखील आवडली असेल.
तुम्हाला या संदर्भात आणखी काही माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर लवकरच देऊ आणि तुम्हाला हा लेख आवडला तर लाईक आणि शेअर करा.
हे पण वाचा-
मराठीत फुटबॉल निबंध माझे आवडते पुस्तक निबंध मराठी त आईवर निबंध होळी निबंध मराठीत
नमस्कार मित्रांनो माझे नाव “Rajesh Pahan” आहे मी learningmarathi.in वेबसाइटचा संस्थापक आहे. मी गेली ३ वर्षे ब्लॉगिंग करत आहे, ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की मी मराठीत सर्व लोकांना योग्य माहिती देऊ शकेन.
Leave a comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Marathi Salla
प्रदूषणावर निबंध मराठीमध्ये | essay on pollution in marathi.
February 28, 2024 Marathi Salla मराठी निबंध 0
Table of Contents
प्रदूषणावर निबंध मराठीमध्ये | Essay On Pollution in Marathi | Pradushan var Nibandh Marathi | Pollution var Nibandh Marathi
Essay On Pollution in Marathi : काही वर्षांपूर्वी आम्ही आमच्या कुटुंबातील कोणाच्याही घरी जायचो तेव्हा आजूबाजूला हिरवळ, झाडे, झुडपे आणि पक्ष्यांचे आवाज दिसायचे आणि आम्ही मैदानात आणि बागेत खेळायचो. सध्याच्या काळात अशा गोष्टी पाहणे फार दुर्मिळ आहे. असे देखावे हे आजच्या मुलांसाठी स्वप्नवत बनले आहे.झाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी, मानव, पाणी, हवा, जमीन आदींच्या संयोगाने पर्यावरणाची निर्मिती होते, या सर्वाना पर्यावरणात महत्त्वाचे स्थान आहे.
प्रदुषणाचा प्रत्येक प्रजातीवर, मानवावर आणि पृथ्वीवरील प्रत्येक जीवावर घातक परिणाम होतो.पर्यावरणातील प्रदूषणामुळे त्याचे मानवी शरीरावर विविध प्रकारे घातक परिणाम होत असतात.पर्यावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे मानवी शरीराला विविध आजारांना बळी पडत आहेत.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वर्ग या प्रदूषणाच्या परिणामांना बळी पडतात.
प्रदूषणामुळे हवा, पाणी, जमीन हे सर्व प्रदूषित झाले असून त्यामुळे आपल्याला शुद्ध पाणी मिळत नाही आणि हे दूषित पाणी प्यायल्याने अनेक प्रकारचे आजार जडतात. विविध प्रकारच्या कारखान्यांमधून रासायनिक धूर बाहेर पडतात जे हवेत मिसळतात आणि जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा तीच हवा आपल्या शरीरात हृदयविकारांना कारणीभूत ठरते. आपण सर्वत्र कचरा टाकतो त्यामुळे डास आणि माश्या जन्माला येतात आणि ज्यांच्या चावण्याने अनेक आजार होतात.
आपल्या भावी पिढ्यांचे जीवन सुरक्षित करायचे असेल तर त्यांना स्वच्छ वातावरण द्यावे लागेल.त्यासाठी निसर्गाने दिलेल्या संसाधनांचा योग्य वापर करावा लागेल.प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा त्यामुळे आपलेच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीचे नुकसान होईल. हे लोकांचे काम आहे जेणेकरून पृथ्वीवरील येणाऱ्या पिढ्यांना आरामदायी जीवन जगता येईल.
सूर्यमालेत अनेक प्रकारचे ग्रह उपलब्ध आहेत, परंतु पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यामध्ये हवा, माती आणि पाणी यांसारखी नैसर्गिक संसाधने उपलब्ध आहेत. त्यांचा निकृष्ट वापर करणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे. प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजेच प्रदूषणावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर सर्व मानवांना एकत्रितपणे योगदान द्यावे लागेल.
पर्यावरण प्रदूषणाची कारणे | Causes of Environmental Pollution in Marathi
पर्यावरण प्रदूषणाची काही मुख्य कारणे खाली दिली आहेत, ती काळजीपूर्वक वाचा:-
आधुनिकीकरण : सध्या आधुनिकीकरण दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत आहे परंतु त्याचा आपल्या पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होत आहे.
जंगलतोड : सध्या जंगलतोड अतिशय वेगाने होत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे झाडे आणि वनस्पतींची कमतरता दिवसेंदिवस वाढत आहे आणि फक्त झाडे आणि झाडे पर्यावरण शुद्ध करत आहेत. कारण झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात.
नैसर्गिक कारणे : कधीकधी पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती येतात जसे की भूकंप, पूर, इ. या सर्व आपत्तींमुळे प्रदूषण वाढते.या आपत्तींमुळे वायू प्रदूषण, जल प्रदूषण, जमीन प्रदूषण इ.
वाहतुकीचा विस्तार : सध्या जलमार्ग, हवाई मार्ग, रस्ते मार्ग या तिन्ही मार्गांवर वाहतुकीचा मोठा विस्तार झाला आहे, त्यामुळे या कुटुंबांकडून उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे वायूप्रदूषण होते आणि यामुळे वाहतुकीचा विस्तार झाला आहे. ही प्रक्रिया दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाचे मोठे संकट आपल्यासमोर निर्माण झाले आहे.
पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी उपाय किंवा सूचना खालीलप्रमाणे आहेत, ज्याद्वारे आपण पर्यावरण प्रदूषण रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी होऊ शकाल, जे खालीलप्रमाणे आहेत:-
- जंगलतोडीवर बंदी घालावी
- झोपडपट्ट्यांवर बंदी घालण्यात यावी आणि योग्य निवास व्यवस्था करण्यात यावी.
- वृक्ष लागवडीसाठी लोकांमध्ये जनजागृती करावी लागेल.
- पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने अनेक प्रकारचे नियम लागू केले पाहिजेत.
- शाळांमध्ये पर्यावरणाशी संबंधित शिक्षण सुरू करावे
- सायकलला प्राधान्य दिले पाहिजे
- शेतात रासायनिक खतांचा वापर करून सेंद्रिय शेतीला चालना द्यावी.
पर्यावरण प्रदूषणाचा भविष्यावर होणारा परिणाम | Impact of environmental pollution on the future in Marathi
पर्यावरणीय प्रदूषणाचा परिणाम आपल्या जीवनात खूप घातक ठरू शकतो.पर्यावरण प्रदूषणामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो, ज्यासाठी प्रत्येक व्यक्तीला नेहमी आपल्यासोबत ऑक्सिजन किट सोबत ठेवावी लागेल.स्वच्छ पाणी पिण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतील.
याशिवाय मानवाचे आयुर्मान कमी होऊन ते अनेक घातक आजारांना बळी पडतील.आपल्याला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.
पर्यावरणातील वाढते प्रदूषण ही कोणा एका विशिष्ट देशाची समस्या नसून ती संपूर्ण जगाची समस्या आहे.सध्याच्या काळात नवीन आधुनिकीकरणामुळे आपल्याला आराम आणि आनंद वाटतो पण दुसरीकडे त्याचा परिणाम अत्यंत घातक आहे कारण त्यामुळे आपल्या कुटुंबात प्रदूषण वाढते आहे, त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलली पाहिजेत.
आणखी माहिती वाचा : Essay on Mother in Marathi | माझी आई निबंध मराठीमध्ये
- Causes of Environmental Pollution in Marathi
- Essay On Pollution in Marathi
- Impact of environmental pollution on the future in Marathi
- Pollution var Nibandh Marathi
- Pradushan var Nibandh Marathi
- पर्यावरण प्रदूषणाचा भविष्यावर होणारा परिणाम
- पर्यावरण प्रदूषणाची कारणे
- प्रदूषणावर निबंध मराठीमध्ये
Be the first to comment
Leave a reply cancel reply.
Your email address will not be published.
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Copyright © 2024 | WordPress Theme by MH Themes
IMAGES
VIDEO
COMMENTS
Sound pollution essay in marathi ध्वनी प्रदुषण वर निबंध : आजच्या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, दररोज काही न काही नवीन तंत्रज्ञान विकसित होत
Essay on Sound Pollution in Marathi - Noise Pollution Essay In Marathi ध्वनी प्रदूषण मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये ध्वनी प्रदूषण Dhwani Pradushan Marathi Nibandh या विषयावर निबंध लिहिणार आहोत. . जगामध्ये अनेक ...
ध्वनी प्रदूषण वर मराठी निबंध Noise Pollution Essay In Marathi { २०० शब्दांत } ध्वनी प्रदूषण ही मानवाकडून निसर्ग आणि स्वत:ला एक धोकादायक भेट आहे ...
ध्वनी प्रदूषणाची कारणे - Sound Pollution Causes. ध्वनी प्रदूषण कश्यामुळे होत या मागे काही कारणे आहेत. त्यापैकी काही खाली दिलेली आहेत.
ध्वनी प्रदूषण मराठी निबंध । Dhwani Pradushan Marathi Nibandh. Sound Pollution Essay in Marathi. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय : ध्वनी प्रदूषणाची कारणे : ध्वनी प्रदूषणाचे ...
Essay On Pollution In Marathi नमस्कार मित्रांनो ! आज मी तुम्हाला प्रदूषण वर मराठी मध्ये निबंध लिहून देणार आहोत . हा निबंध वेगवेगळ्या शब्दांत लिहिल्या गेलेला
Essay on Pollution in Marathi. ... Sound Pollution (Noise pollution) मोठ्या आवाजाने होणाऱ्या प्रदूषणाला ध्वनी प्रदूषण म्हंटल्या जातं. वाहने, यंत्र, रेडियो, डीजे, लाउडस्पीकर ...
प्रदूषण आणि तसेच त्यावरील उपाय वर मराठी निबंध Essay on Pollution and its solutions in Marathi (200 शब्दात). प्रदूषणाची समस्या जगभरात व्यापक आणि तसेच गंभीर आहे आणि तसेच त्याकडे आपण ...
ध्वनी प्रदूषण महत्व मराठी निबंध Noise sound pollution essay in Marathi. by All in one • सप्टेंबर १६, २०२१. 0. ध्वनी प्रदूषण मराठी माहिती याबाबत मोठ्या प्रमाणावर ती ...
ध्वनी प्रदूषण मराठी निबंध, essay on sound pollution in Marathi. ध्वनी प्रदूषण मराठी ...
Dhwani Pradushan Marathi Nibandh : जल प्रदूषण निबंध. Noise Pollution in Marathi Project / ध्वनी प्रदूषण : • ध्वनी प्रदूषण मोठ्या व अनुपयोगी आवाजाला म्हणतात, व याचा त्रास माणूस व ...
प्रदुषाचे प्रकार / Pollution Types in Marathi; 1. पाणी प्रदुषण / Water Pollution in Marathi 2. हवा प्रदुषण / Air Pollution in Marathi; 3. भुमी प्रदुषण / Land Pollution in Marathi ; 4. ध्वनी प्रदूषण / Noise Pollution in Marathi
तर हा होता ध्वनी प्रदूषण वर मराठीत माहिती निबंध, मला आशा आहे की आपणास ध्वनी प्रदूषण या विषयावर मराठी निबंध (essay on Noise Pollution in Marathi) आवडला असेल.
हा प्रदूषण मराठी निबंध (Pollution Essay in Marathi) तुम्हाला नक्की पसंद प प्रदूषण या जगातील एक वाढती समस्या आहे आणि या विषया वर मी हा निबंध लिहला आहे.
Essay on Pollution in Marathi आपण ह्या पोस्टमध्ये प्रदूषण वर आधारित निबंध - प्रदूषण एक जागतिक समस्या हा निबंध पहाणार आहोत. प्रदूषण हि एक जगाला
Rahul. Essay On Pollution In Marathi - Vehicle Pollution Essay in Marathi वाढते प्रदूषण निबंध मराठी वाहन प्रदूषण निबंध आज आपण या लेखामध्ये वाहन प्रदूषण या विषयावर निबंध ...
Sound Pollution Essay In Marathi Language Sound Pollution Essay In Marathi Language 2. Essay On Thiazide Diuretics According to the Mayo Clinic there are many medication treatment options that are available to anyone who has high blood pressure. Thiazide diuretics is one of the medication treatment option.
जर आपल्याला ध्वनी प्रदूषण मराठी निबंध , noise pollution essay in marathi , essay on noise pollution in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की ...
Sound Pollution Essay In Marathi Sound Pollution Essay In Marathi 2. Essay about The music industry-globalizing in many ways Edi K. THE MUSIC INDUSTRY GLOBALIZING IN MANY WAYS The music industry is in a time of growth at this very moment. The environment for its growth has been increasing rapidly on many geographical boundaries and has been ...
Air Pollution Information in Marathi वायू प्रदूषण मराठी माहिती बद्दल जाणून घ्या संपूर्ण. आजच्या जगात वायू प्रदूषण Air Pollution ही एक मोठी चिंताजनक बाब आहे. आपण ...
Essay on Pollution in Marathi:प्रदूषण हा शब्द ऐकताच आपल्या मनात विविध प्रकारचे प्रश्न धावू लागतात आणि आपण इतके घाबरून जातो की आता या समस्येवर निदान ...
Essay On Air Pollution In Marathi वायू प्रदूषण हा आपल्या वातावरणाचा एक प्रमुख मुद्दा आहे. प्रदूषण ही जागतिक घटना आहे, म्हणून प्रत्येक देशाने याबद्दल गंभीर
Essay On Pollution in Marathi : काही वर्षांपूर्वी आम्ही आमच्या कुटुंबातील ...